शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

corona in ratnagiri-कोरोनातही हापूसची आखाती देशात वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 15:43 IST

कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट जगभरातील देशांवर आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालासह विविध व्यवसायांना बसला असताना, पणन विभाग व कृषी विभागाच्या प्रयत्नाने हापूस निर्यातीला चालना मिळाली आहे. जलवाहतुकीव्दारे १०५ टन हापूस गेल्या आठवड्यात आखाती प्रदेशात निर्यात करण्यात आला. त्यानंतर बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी नवी मुंबईतील वाशी मार्केट येथून २८२ मेट्रिक टन हापूस संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत याठिकाणी निर्यात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोरोनातही हापूसची आखाती देशात वारीशेतमालाला आखाती प्रदेशातून मागणी

रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट जगभरातील देशांवर आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालासह विविध व्यवसायांना बसला असताना, पणन विभाग व कृषी विभागाच्या प्रयत्नाने हापूस निर्यातीला चालना मिळाली आहे. जलवाहतुकीव्दारे १०५ टन हापूस गेल्या आठवड्यात आखाती प्रदेशात निर्यात करण्यात आला. त्यानंतर बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी नवी मुंबईतील वाशी मार्केट येथून २८२ मेट्रिक टन हापूस संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत याठिकाणी निर्यात करण्यात आला आहे.यावर्षी हापूस हंगाम नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाला आहे. मात्र, आंबा हंगाम सुरू होत असतानाच कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. उष्म्यामुळे आंबा तयार होऊ लागला आहे. बहुतांश शेतकरी वाशी, नवी मुंबई येथील मार्केटमध्येच आंबा विक्रीसाठी पाठवितात. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आंबा खरेदीसाठी ग्राहक नसल्याचे मुंबईतील व्यापारी सांगत आहेत.

शिवाय ग्राहकांअभावी दरही गडगडले आहेत. त्यावर पर्याय म्हणून पणन मंडळ, कृषी विभाग, आत्मा यासह काही खासगी व्यापाऱ्यांनी हापूसच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले. अन्य जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी चर्चा करून शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री व्यवस्था सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात ४४० पेट्या सातारा जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.मुंबई मार्केटवर भिस्त ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. यावर पर्याय म्हणून आखाती प्रदेशातील निर्यात जलवाहतुकीव्दारे सुरू करण्यात आली आहे. आखाती देशातून आंब्याला मागणी आहे. मात्र, हवाई वाहतूक बंद असल्याने समुद्रमार्गे वाहतूक करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.

गेल्या आठवड्यात १०५ मेट्रिक टन आंबा आखाती प्रदेशात पाठविण्यात आला. बुधवारी पुन्हा २०५ मेट्रिक टन आंब्याची निर्यात वाशी मार्केटमधून बहरीन, कुवेत व संयुक्त अरब अमिरातकडे करण्यात आली आहे. निर्यात वाढली तर वाशी मार्केटमधील साठणाऱ्या आंबा पेट्यांची साठवणूक कमी होऊन दर स्थिर राहणार आहेत. सध्या ग्राहकांअभावी पेटीला पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत दर देण्यात येत आहे. निर्यात वाढली तर दरही वाढण्याची शक्यता आहे. जलवाहतुकीव्दारे निर्यात होणाऱ्या मालासाठी खर्च कमी येत आहे.वाढती मागणीशेतमालाला आखाती प्रदेशातून मागणी वाढत आहे. बुधवारी २८६४ शेतमालाची निर्यात करण्यात आली आहे. त्यामध्ये १५०० मेट्रिक टन कांदा, २८२ मेट्रिक टन आंबा, ६०० मेट्रिक टन भाजीपाला, ४८२ मेट्रिक टन द्राक्ष, ८५५ मेट्रिक टन केळी निर्यात करण्यात आली. कांदा, भाजीपाला, द्राक्ष, केळ्यांसह आंबा निर्यात करण्यात आला आहे. आंब्याची निर्यात वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMangoआंबाRatnagiriरत्नागिरी