शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ आता सारीचे संकट, एकूण ११६ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:42 IST

कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही धुमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सारीचे ११६ रुग्ण आढळून आले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे सारी आजाराने जिल्हावासियांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे़.

ठळक मुद्देकोरोनापाठोपाठ आता सारीचे संकटजिल्ह्यात एकूण ११६ रूग्ण, आतापर्यंत १३ रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी : कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही धुमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सारीचे ११६ रुग्ण आढळून आले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे सारी आजाराने जिल्हावासियांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे़.सारीच्या तापामध्ये अनेक आजारांचा समावेश असून, हा समूहरोग म्हणून गणला जातो़ सारी आणि कोरोना हे दोन वेगवेगळे आजार असले तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. सारीच्या रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन सूज येते़ त्याचबरोबर न्युमोनिया होऊन रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण खालावते़ त्यामुळे हृदय, मेंदू, किडनी निकामी होतात़ शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने आजाराचे वेळेवर निदान होत नाही़ त्यामुळे तापाचे जीवाणू, विषाणू रक्तात मिसळतात़ रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही़ त्यामुळे त्याचे रूग्ण लवकर लक्षात येत नाहीत.

मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात सारीचे आतापर्यंत ११६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे़

जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळत असले तरी आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आली आहे़. जे कन्टेन्मेंट झोन नाहीत, अशा ठिकाणी ५० घरांचे सर्वेक्षण करण्याची सूचना देण्यात आलेली आहे़ लोकांनी गणेशोत्सवात काळजी घ्यावी़ १ मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवावे तसेच मास्कचा वापर करावा़- डॉ़ बबिता कमलापूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी़

काय आहेत लक्षणेया आजारामध्ये कोरोनाप्रमाणेच सर्दी, खोकला, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ही लक्षणे असतात़ दवाखान्यात दाखल करून उपचार केले, तरच सारीच्या रुग्णांचे निदान होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी