शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ आता सारीचे संकट, एकूण ११६ रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 14:42 IST

कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही धुमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सारीचे ११६ रुग्ण आढळून आले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे सारी आजाराने जिल्हावासियांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे़.

ठळक मुद्देकोरोनापाठोपाठ आता सारीचे संकटजिल्ह्यात एकूण ११६ रूग्ण, आतापर्यंत १३ रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी : कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही धुमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सारीचे ११६ रुग्ण आढळून आले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे सारी आजाराने जिल्हावासियांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे़.सारीच्या तापामध्ये अनेक आजारांचा समावेश असून, हा समूहरोग म्हणून गणला जातो़ सारी आणि कोरोना हे दोन वेगवेगळे आजार असले तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. सारीच्या रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन सूज येते़ त्याचबरोबर न्युमोनिया होऊन रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण खालावते़ त्यामुळे हृदय, मेंदू, किडनी निकामी होतात़ शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने आजाराचे वेळेवर निदान होत नाही़ त्यामुळे तापाचे जीवाणू, विषाणू रक्तात मिसळतात़ रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही़ त्यामुळे त्याचे रूग्ण लवकर लक्षात येत नाहीत.

मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात सारीचे आतापर्यंत ११६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे़

जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळत असले तरी आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आली आहे़. जे कन्टेन्मेंट झोन नाहीत, अशा ठिकाणी ५० घरांचे सर्वेक्षण करण्याची सूचना देण्यात आलेली आहे़ लोकांनी गणेशोत्सवात काळजी घ्यावी़ १ मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवावे तसेच मास्कचा वापर करावा़- डॉ़ बबिता कमलापूरकर,जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी़

काय आहेत लक्षणेया आजारामध्ये कोरोनाप्रमाणेच सर्दी, खोकला, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ही लक्षणे असतात़ दवाखान्यात दाखल करून उपचार केले, तरच सारीच्या रुग्णांचे निदान होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी