शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

कोरोनाने तिघांचा मृत्यू, ६७ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात ६७ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. ५० रुग्ण ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात ६७ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. ५० रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. सद्यस्थितीत १,२१६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. बाधित रुग्णांपैकी ३९ रुग्ण रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २,३८२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दर कमी झालेला असून, तो ३.८ टक्के आहे. जिल्ह्यात दिवसभरात चिपळूण तालुक्यातील २ आणि रत्नागिरी तालुक्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. मागील आठवड्यात बाधितांच्या मृत्यूचा दर २.१३ टक्के होता. जिल्ह्यात आतापर्यंत ७३,६४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा बरे होण्याचा दर ९५.३४ टक्के आहे.

जिल्ह्यात ३,४१५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात आरटीपीसीआर चाचणीत २७ रुग्ण, तर अँटिजन चाचणीत ४० रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये राजापूर आणि मंडणगड तालुक्यातील प्रत्येकी ३ रुग्ण असून, दापोलीतील ८, खेडमधील ५, गुहागरातील ६, चिपळुणातील २१, संगमेश्वरमधील १२, रत्नागिरीतील ८ आणि लांजातील एका रुग्णाचा समावेश आहे. बाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,२४६ झाली आहे.