शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

कोरोनामुळे शैक्षणिक कामकाजही थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. पहिली ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. पहिली ते नववी व अकरावीच्या वर्गाच्या परीक्षा रद्द करून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर गुणांकन देण्याची सूचना केली आहे. अध्यापन बंद असले तरी अशैक्षणिक कामकाज मात्र सुरू होते; परंतु लाॅकडाऊनमुळे सध्या अशैक्षणिक कामकाजही बंद ठेवण्यात आले आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा मे व जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. अद्याप त्याबाबतही पुढील सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. पहिली ते चाैथीपर्यंतचे अध्यापन ऑनलाइन सुरू होते. पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले होते. नववी व अकरावीच्या परीक्षा सुरू असतानाच शासनाने परीक्षा रद्द करून गुणांकनाच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे ज्या शाळांमध्ये प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आल्या, त्या शाळांमध्ये पेपर तपासणीचे काम सुरू होते. शिवाय पहिली ते नववी व अकरावीचे गुणांकन शाळा स्तरावर देण्याचे घोषित केल्याने शाळांमधून निकाल/गुणपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. वर्गनिहाय प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करण्यात येणार असून, १ मे पर्यंत निकाल घोषित करण्यात येणार होता; मात्र लाॅकडाऊनमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही शाळांमध्ये येणे शक्य नाही. त्यामुळे शाळांनी निकाल १ मे नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे घोषित केले असून, पालकांना त्याबाबत सूचना करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून दहावी व बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येण्यापूर्वी शाळा अध्यापनासाठी बंदचे आदेश आल्यानंतर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन अध्यापन सुरू केले आहे. त्यासाठी दररोज शिक्षक शाळेत येत असत. अध्यापनासमवेत गुणपत्रिकेचे काम सुरू होते; मात्र सद्यस्थितीत ऑनलाइन अध्यापन करण्यात येणार असून, गुणपत्रिका तयार करण्याचे कामही शिक्षक घरूनच करणार आहेत. शासनाकडून कडक संचारबंदी शिथिल केल्यानंतरच शिक्षक शाळेत येणार आहेत. त्यामुळे यावर्षीही परीक्षा रद्द झाली असली तरी गुणपत्रके मेच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे; मात्र त्यासाठी शासनाकडून येणाऱ्या आदेशाची शाळांना प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात २५७४ प्राथमिक शाळा, ४५४ माध्यमिक शाळा, १४१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत; मात्र सध्या नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ग तर अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू असले तरी अन्य सर्व वर्गातील विद्यार्थी शासनाच्या पासच्या निर्णयामुळे निर्धास्त झाले आहेत.