शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

आदर्श गाव घडविण्यात सर्वांचा समन्वय

By admin | Updated: July 13, 2014 00:22 IST

देवडेतील समन्वय : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

रत्नागिरी : देवडे गावाने शासनाच्या विविध योजनांमध्ये नोंदविलेला सहभाग कौतुकास्पद असून गावकरी आणि प्रशासन यांच्या समन्वयाने देवडे हे गाव इतरांना आदर्श ठरु शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले. संगमेश्वर तालुक्यातील देवडे येथे समाधान योजनेंतर्गत आयोजित गावभेट कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे, तहसिलदार वैशाली माने, गटविकास अधिकारी कुलकर्णी, सरपंच हरिभाऊ घुमप आदि उपस्थित होते. शासनाच्या कल्याणकारी योजना थेट गावकऱ्यांच्या दारापर्यंत नेण्यासाठी समाधान योजना राबविण्यात येत आहे. यामुळे गावकरी व प्रशासन यांच्या थेट संवाद होऊन त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यास मदत होत आहे. शासनाच्या विविध विभागाबाबतच्या अडचणी सोडवून घेण्यास गावकऱ्यांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, शेती, आरोग्य या क्षेत्रातील योजनांची माहिती घेऊन गावकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शासन समाधान योजनांसारख्या उपक्रमातून लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे गावकऱ्यांचे वेळ व श्रम वाचून प्रशासनावरील ताण देखील कमी होत असल्याचे उकार्डे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध दाखले, आम आदमी विमा योजनेचे प्रमाणपत्र, संगणकीकृत ७/१२ उतारा, अंत्योदय योजनेंतर्गत धान्यांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.यावेळी महसूल, आरोग्य, कृषि, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अर्जांचे वितरण देखील करण्यात आले. (प्रतिनिधी)