शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श गाव घडविण्यात सर्वांचा समन्वय

By admin | Updated: July 13, 2014 00:22 IST

देवडेतील समन्वय : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

रत्नागिरी : देवडे गावाने शासनाच्या विविध योजनांमध्ये नोंदविलेला सहभाग कौतुकास्पद असून गावकरी आणि प्रशासन यांच्या समन्वयाने देवडे हे गाव इतरांना आदर्श ठरु शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले. संगमेश्वर तालुक्यातील देवडे येथे समाधान योजनेंतर्गत आयोजित गावभेट कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे, तहसिलदार वैशाली माने, गटविकास अधिकारी कुलकर्णी, सरपंच हरिभाऊ घुमप आदि उपस्थित होते. शासनाच्या कल्याणकारी योजना थेट गावकऱ्यांच्या दारापर्यंत नेण्यासाठी समाधान योजना राबविण्यात येत आहे. यामुळे गावकरी व प्रशासन यांच्या थेट संवाद होऊन त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यास मदत होत आहे. शासनाच्या विविध विभागाबाबतच्या अडचणी सोडवून घेण्यास गावकऱ्यांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, शेती, आरोग्य या क्षेत्रातील योजनांची माहिती घेऊन गावकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शासन समाधान योजनांसारख्या उपक्रमातून लोकाभिमुख होण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे गावकऱ्यांचे वेळ व श्रम वाचून प्रशासनावरील ताण देखील कमी होत असल्याचे उकार्डे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध दाखले, आम आदमी विमा योजनेचे प्रमाणपत्र, संगणकीकृत ७/१२ उतारा, अंत्योदय योजनेंतर्गत धान्यांचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.यावेळी महसूल, आरोग्य, कृषि, पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली. तसेच पात्र लाभार्थ्यांना आवश्यक अर्जांचे वितरण देखील करण्यात आले. (प्रतिनिधी)