शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांच्या समस्या सोडविण्यास सहकार्य

By admin | Updated: July 23, 2014 21:53 IST

जितेंद्र आव्हाड : रत्नागिरीत फलोत्पादन विभागाची आढावा बैठक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फलोत्पादनासाठी महत्त्वाचा जिल्हा असून, येथील फळबागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन फलोत्पादन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी बी. जी. बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, शेखर निकम यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोकणातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सोप्या पद्धतीने मिळावी, यासाठी लाभार्थींनी दिलेल्या हमीपत्रावर रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा कोकणातील शेतकऱ्यांना होत असून, नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुलभ झालेली आहे.तसेच फळबागायतदारांच्या इतर समस्या सोडवण्यासाठीदेखील शासन कटिबद्ध आहे. यानुसार तापमानातील होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील चढ उतार लक्षात घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत कृषी विभागाने प्रस्ताव सादर करावा. कोकणातील वणव्यामुळे फळबागांच्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्याबाबतदेखील प्रस्ताव सादर केल्यास पुढील बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले.पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वणव्यामुळे होणारे नुकसान आणि फळपीक विमा यासंदभातील प्रश्न सोडवण्यासाठी फलोत्पादन मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच पीक विम्याची भरपाई जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने गणेशोत्सवाच्या काळात विशेष जनजागृती करावी, अशी सूचना केली.शहा यांनी जिल्ह्याच्या फलोत्पादनाच्या माहितीचे सादरीकरण केले. फलोत्पादन मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय हॉर्टिकल्चर बोर्डकडून तारांकित दर्जा प्राप्त करणाऱ्या कृषी विभागाच्या रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी नर्सरी, हातखंबा नर्सरी, जुवाठी (ता. राजापूर) येथील नर्सरींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध अधिकाऱ्यांसोबत तालुका कृषी अधिकारी आणि नर्सरीचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)