शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

बागायतदारांच्या समस्या सोडविण्यास सहकार्य

By admin | Updated: July 23, 2014 21:53 IST

जितेंद्र आव्हाड : रत्नागिरीत फलोत्पादन विभागाची आढावा बैठक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फलोत्पादनासाठी महत्त्वाचा जिल्हा असून, येथील फळबागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन फलोत्पादन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिष जगताप, कोकण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी बी. जी. बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, शेखर निकम यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोकणातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम सोप्या पद्धतीने मिळावी, यासाठी लाभार्थींनी दिलेल्या हमीपत्रावर रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा फायदा कोकणातील शेतकऱ्यांना होत असून, नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया सुलभ झालेली आहे.तसेच फळबागायतदारांच्या इतर समस्या सोडवण्यासाठीदेखील शासन कटिबद्ध आहे. यानुसार तापमानातील होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील चढ उतार लक्षात घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत कृषी विभागाने प्रस्ताव सादर करावा. कोकणातील वणव्यामुळे फळबागांच्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्याबाबतदेखील प्रस्ताव सादर केल्यास पुढील बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले.पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वणव्यामुळे होणारे नुकसान आणि फळपीक विमा यासंदभातील प्रश्न सोडवण्यासाठी फलोत्पादन मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच पीक विम्याची भरपाई जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने गणेशोत्सवाच्या काळात विशेष जनजागृती करावी, अशी सूचना केली.शहा यांनी जिल्ह्याच्या फलोत्पादनाच्या माहितीचे सादरीकरण केले. फलोत्पादन मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय हॉर्टिकल्चर बोर्डकडून तारांकित दर्जा प्राप्त करणाऱ्या कृषी विभागाच्या रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी नर्सरी, हातखंबा नर्सरी, जुवाठी (ता. राजापूर) येथील नर्सरींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध अधिकाऱ्यांसोबत तालुका कृषी अधिकारी आणि नर्सरीचालक उपस्थित होते. (प्रतिनिधी)