शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
2
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
3
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
4
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
5
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
6
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
7
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
8
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
9
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
10
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
11
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
12
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
13
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
14
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
15
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
16
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
18
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
19
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
20
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

प्रशासनाला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये सामंत सतत धडपडत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांवर त्यांनी सुरुवातीपासून लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये सामंत सतत धडपडत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांवर त्यांनी सुरुवातीपासून लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारीही कोरोना महामारीमध्ये जोमाने काम करीत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची आज गरज आहे. लोकांचे जीव जात असताना राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या बरोबरीने काम करण्याची आवश्यकता आहे. उगाच राजकारण करून जिल्ह्याला अडचणीत आणण्यापेक्षा या महामारीच्या वर्षभराच्या कालावधीत प्रत्येकाने स्वत: आपण काय केले आणि आपणाला पुढे काय करायला पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. एकमेकांचे पाय खेचण्याचे काम बंद करावे, अशी प्रत्येक जण अपेक्षा व्यक्त करीत आहे. खेकडा वृत्ती सोडून सामंत यांना आणि प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेऊन लोकांचे जीव कसे वाचतील, यावर लक्ष केंद्रित करावे, अन्यथा अशा लोकांना उद्ध्वस्त झालेेले कुटुंबीय कधीच माफ करणार नाही, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात २०० कोविड केअर केंद्रे उभारण्यासाठी प्रत्येकाने राजकीय हेवेदावे सोडून प्रशासनाला कसे सहकार्य करता येईल, याकडे लक्ष द्यावे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. त्याचबरोबर कोरोना बाधितांची संख्याही वाढत चालली आहे. ही संख्या कमी करण्यासाठी प्रशासनासह सर्वच यंत्रणा दिवस-रात्र मेहनत घेत आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मंत्री सामंत यांनी ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये कोविड केअर केंद्र उभारणीला दिलेले प्राधान्य हे वाढलेले कोरोना रुग्ण आणि तिसरा लाटेशी सामना करण्यासाठी उचललेले पाऊल आहे. त्यामुळे आज कोरोनाविरोधातील लढाईत सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी राजकारण विसरून एकत्रितपणे लढा देणे जिल्हावासीयांसाठी फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी राजकारण्यांनी राजकारण न करता समाजकारणाला महत्त्व देण्याची फार आवश्यकता आहे. राजकारण कायम करतच राहणार आहात; पण वाचलात तर. यामध्ये गरीब, सर्वसामान्य कोरोनाचे बळी ठरताहेत, असे नाही. तर प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी राजकारण करण्यापेक्षा राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी कोरोनाबाधितांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कसे सहकार्य करता येईल, याकडे लक्ष द्यावे. कारण आज कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देणे गरजचे आहे.

जिल्ह्यावर वाईट वेळ आहे. त्यासाठी राजकारण कुठे करावे आणि कितपत करावे, यालाही मर्यादा आहे. या बाबीचे भान सुटले की एखादा राजकीय पक्ष आणि नेत्याविषयी लोकांमध्ये असलेली आपुलकी, सहानुभूती कमी होऊ लागते. जिल्ह्यात सध्या कोरोना महामारीशी दोन हात करण्याऐवजी राजकीय पक्ष व त्यांच्या काही पुढाऱ्यांकडून आतापर्यंत दोषारोप ठेवण्यावरच भर देण्यात आला असून हे अयोग्य आहे. चुका या प्रत्येकाकडून होतच असतात. त्याप्रमाणे प्रशासन चुकत असेल तर त्याबाबत जाब विचारलाच पाहिजे. केवळ त्यांचे दोष काढत बसून चालणार नाही तर त्यांच्याकडून काम करवून घेणे आवश्यक आहे. आज अशी परिस्थिती आहे की कोरोनामुळे गेलेल्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांना सहकार्य कसे करता येईल, याकडे लक्ष केंद्रित करून त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. या उलट राजकारण करीत बसणे, हे जिल्हावासीयांसाठी तोट्याचे असून, त्यासाठी जे काम करताहेत, त्यांच्या मदतीसाठी पुढे येऊन आपणही समाजासाठी काय तरी करीत आहोत, असे समजून मनापासून सहकार्य करावे.

- रहिम दलाल