शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
4
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
5
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
6
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
7
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
8
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
9
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
10
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
11
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
12
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
13
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
14
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
15
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
16
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
17
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
18
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
19
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
20
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?

‘कनेक्टिव्हिटी’ने गुहागर पर्यटनाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:37 IST

संकेत गोयथळे । लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : १५ वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवा गुहागरच्या पर्यटन ...

संकेत गोयथळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगुहागर : १५ वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवा गुहागरच्या पर्यटन वाढीचा टर्निंग पॉर्इंट ठरला होता. यापुढील काळात होणारे मुंबई-गोवा चौपदरीकरण व गुहागर-विजापूर महामार्ग हे पुन्हा एकदा गुहागर पर्यटनवाढीसाठी टर्निंग पॉर्इंट ठरणार आहेत. तालुक्याची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढल्याने गुहागरातही पर्यटन प्रवाहात आले आहे.१५ वर्षांपूर्वीचा विचार करता गुहागरमध्ये फक्त हेदवी, वेळणेश्वर, व्याडेश्वरसाठी येणारा भाविक पर्यटकच येत होता. गुहागरला यायचे झाल्यास तसेच चिपळूणहून अन्यत्र कुठे जायचे झाल्यास पुन्हा चिपळूणला मागे फिरुन जावे लागत असे. यामुळे गुहागरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोजकी होती. मात्र, पंधरा वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवेमुळे रत्नागिरी व दापोली असे दोन तालुके जोडले गेले. येथूनच खºया अर्थाने गुहागरचे पर्यटन वाढू लागले. दापोली तालुका मुंबई, पुणेहून येण्यासाठी जवळचा आहे. यामुळे दापोलीत यापूर्वीच पर्यटनाची सुरुवात झाली, तर गणपतीपुळे हे अनेक वर्षांपासून सर्वांनाच परिचित होते. पर्यटनतज्ज्ञांच्या मतानुसार पर्यटनदृष्ट्या गुहागरपेक्षा दापोली दहा वर्षांनी, तर गणपतीपुळे पन्नास वर्षांनी पुढे आहे. गुहागरशी या तालुक्यांची कनेक्टिव्हिटी वाढल्याने या दोन तालुक्यांबरोबरच गुहागरही पर्यटन प्रवाहात झाले.गुहागर शहराचा विचार करता वारंवार गुहागर नाक्यात होणारी वाहतूक कोंडी गुहागर शहराच्या पर्यटनवाढीचा मुख्य अडसर बनत आहे. गेली अनेक वर्षे हा विषय वादाचा ठरत आहे. या ठिकाणी शासकीय जागेत असलेली बांधकामे अधिकृत की अनधिकृत यावर शासन कारवाई का करत नाही, असा सवाल ग्रामस्थांतून नेहमी केला जात आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन अनेकवेळा स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक याच्यात शाब्दिक वादापासून हाणामारीपर्यंतची वेळ आली आहे.नव्याने गुहागर - विजापूर महामार्गासाठी रस्ता मोजणीचे काम गेली काही महिने सुरु आहे. या रस्त्याचा झिरो पॉर्इंट गुहागर नाक्यातून सुरु होतो. यावेळी सुरु होणारे काम गुहागर नाक्यातून सुरु व्हावे, अशी गुहागरातील ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.गुहागरनंतर पालशेत बाजारपेठेतील अरुंद रस्त्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. बारभाईमार्गे बायपास रस्ता करुनही वाहतूक कोंडी टळली जाऊ शकते. यासाठी गुहागर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंत्रालयात पाठवलेला प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.