शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
2
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
3
परभणीत खासदार संजय जाधव अन् मतदान निरीक्षकांत वाद; दोन प्रभागांतील उमेदवारांतही बाचाबाची
4
IMF चं कर्ज फेडायचंय, पैसे द्या; सैन्यासमोर मुस्लीम देशाने पसरले हात; भारताकडेही मागितली मदत
5
शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, कारण...; मार्कर पेन वादावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
Retail Therapy: नियमितपणे शॉपिंगला जाणाऱ्या महिला दीर्घायुष्य जगतात, संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर
7
Municipal Corporation Election 2026 LIVE Updates: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०८ टक्के मतदान; पहा कुठे किती मतदान झाले?
8
सावधान! तुमच्या 'या' ५ चुकांमुळे स्मार्टफोन लवकर होऊ शकतो खराब; आजच बदला आपल्या सवयी
9
'ट्रम्प' धोरणांचा दुहेरी फटका! व्हिसा स्टॅम्पिंगमध्ये होणाऱ्या विलंबामुळे भारतीयांना नोकऱ्या जाण्याची भीती
10
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
11
"हे बोगस मतदानासाठी तर नाही ना", व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी संपूर्ण प्रक्रियेवर उपस्थित केली शंका
12
रशियाच्या रडारवर दोन युरोपियन देश; पुतीन यांच्या डोळ्यात का खुपत आहेत ब्रिटन आणि जर्मनी?
13
धुळे महापालिका निवडणूक: प्रभाग १८ मध्ये राडा, EVM ची तोडफोड, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
14
I-PAC Raid Case: सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना दणका; आय-पॅक प्रकरणात धाडली नोटीस!
15
ही कसली लोकशाही? निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा; उद्धव ठाकरे कडाडले
16
BSNL चा 'महाधमाका'! हाय-स्पीड WiFi प्लॅनवर २०% सवलत; ५००० GB डेटासोबत OTT देखील मोफत!
17
संसार मोडला अन् आयुष्यही संपवलं! पत्नी ४ मुलांसह गायब; संतापलेल्या पतीने सासरच्या दारातच स्वतःला पेटवले
18
'या' महाराणीनं भारत-चीन युद्धात देशासाठी दान केलेलं ६०० किलो सोनं, खासगी विमानं, विमानतळ; घराण्याकडे होती अफाट संपत्ती
19
"मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात', मतदानाच्या दिवशीच सुभाष देशमुखांचा भाजपाला घरचा आहेर
20
IND vs PAK T20 World Cup: तिकीट बुकिंगसाठी चाहत्यांची ऑनलाईन गर्दी; वेबसाइटच झाली क्रॅश; अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘कनेक्टिव्हिटी’ने गुहागर पर्यटनाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:37 IST

संकेत गोयथळे । लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : १५ वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवा गुहागरच्या पर्यटन ...

संकेत गोयथळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगुहागर : १५ वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवा गुहागरच्या पर्यटन वाढीचा टर्निंग पॉर्इंट ठरला होता. यापुढील काळात होणारे मुंबई-गोवा चौपदरीकरण व गुहागर-विजापूर महामार्ग हे पुन्हा एकदा गुहागर पर्यटनवाढीसाठी टर्निंग पॉर्इंट ठरणार आहेत. तालुक्याची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढल्याने गुहागरातही पर्यटन प्रवाहात आले आहे.१५ वर्षांपूर्वीचा विचार करता गुहागरमध्ये फक्त हेदवी, वेळणेश्वर, व्याडेश्वरसाठी येणारा भाविक पर्यटकच येत होता. गुहागरला यायचे झाल्यास तसेच चिपळूणहून अन्यत्र कुठे जायचे झाल्यास पुन्हा चिपळूणला मागे फिरुन जावे लागत असे. यामुळे गुहागरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोजकी होती. मात्र, पंधरा वर्षांपूर्वी झालेला राई-भातगाव पूल व धोपावे फेरीबोट सेवेमुळे रत्नागिरी व दापोली असे दोन तालुके जोडले गेले. येथूनच खºया अर्थाने गुहागरचे पर्यटन वाढू लागले. दापोली तालुका मुंबई, पुणेहून येण्यासाठी जवळचा आहे. यामुळे दापोलीत यापूर्वीच पर्यटनाची सुरुवात झाली, तर गणपतीपुळे हे अनेक वर्षांपासून सर्वांनाच परिचित होते. पर्यटनतज्ज्ञांच्या मतानुसार पर्यटनदृष्ट्या गुहागरपेक्षा दापोली दहा वर्षांनी, तर गणपतीपुळे पन्नास वर्षांनी पुढे आहे. गुहागरशी या तालुक्यांची कनेक्टिव्हिटी वाढल्याने या दोन तालुक्यांबरोबरच गुहागरही पर्यटन प्रवाहात झाले.गुहागर शहराचा विचार करता वारंवार गुहागर नाक्यात होणारी वाहतूक कोंडी गुहागर शहराच्या पर्यटनवाढीचा मुख्य अडसर बनत आहे. गेली अनेक वर्षे हा विषय वादाचा ठरत आहे. या ठिकाणी शासकीय जागेत असलेली बांधकामे अधिकृत की अनधिकृत यावर शासन कारवाई का करत नाही, असा सवाल ग्रामस्थांतून नेहमी केला जात आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन अनेकवेळा स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक याच्यात शाब्दिक वादापासून हाणामारीपर्यंतची वेळ आली आहे.नव्याने गुहागर - विजापूर महामार्गासाठी रस्ता मोजणीचे काम गेली काही महिने सुरु आहे. या रस्त्याचा झिरो पॉर्इंट गुहागर नाक्यातून सुरु होतो. यावेळी सुरु होणारे काम गुहागर नाक्यातून सुरु व्हावे, अशी गुहागरातील ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.गुहागरनंतर पालशेत बाजारपेठेतील अरुंद रस्त्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. बारभाईमार्गे बायपास रस्ता करुनही वाहतूक कोंडी टळली जाऊ शकते. यासाठी गुहागर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंत्रालयात पाठवलेला प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.