शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्शन माेफत, पण गॅस विकत; ‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पंतप्रधान उज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून काही अटींमध्ये सवलतही देण्यात आली आहे.. कोणतीही ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पंतप्रधान उज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून काही अटींमध्ये सवलतही देण्यात आली आहे.. कोणतीही अनामत रक्‍कम न भरता अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र, नंतर या कुटुंबांना गॅस भरावा लागणार आहे. गॅसच्या किमती वाढल्याने अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस सिलिंडर परवडणारा नसल्याने दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबे आता चुलीकडे वळली आहेत.

केंद्र सरकारने ग्रामीण जनतेची चूल बंद व्हावी, या उद्देशानेही योजना दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी सुरू केली होती. या लोकांना जोडणी आणि सिलिंडर मोफत दिला असला तरी गॅसचा वापर त्यांना करावा लागणार आहे. सद्य:स्थितीत एका सिलिंडरसाठी ८३५ रुपये मोजावे लागत आहे. अल्प उत्पन्न असलेल्यांना गॅस वापरणे परवडणारे नाही. त्यामुळे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी चुलीकडे वळले आहेत.

..............................

सिलिंडर भरणे कसे परवडणार?

आम्ही रोजगारावर जगणारी माणसं. सरकारने मोफत सिलिंडर दिला. मात्र, आता गॅस भरण्यासाठी एवढे पैसे कुठून आणणार? रोज दर दिवशीच मिळतो, असे नाही. त्यामुळे सरकारने कनेक्शन मोफत दिले असले तरी गॅस भरण्यासाठी पैसे कुठून आणणार?

त्यापेक्षा चूलच परवडली.

- सावित्री वडके, करबुडे, ता. रत्नागिरी

..........................

चार-पाच वर्षांपूर्वी सरकारने गावांमध्ये राॅकेल आणि चुलीचा वापर होऊ नये, म्हणून उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी आणि सिलिंडर दिले होते. त्यावेळी सबसिडीही मिळत होती. मात्र, आता सबसिडीही नसल्याने नुसता गॅस सिलिंडर घेऊन करणार काय, गॅस भरायला एवढे पैसे आणायचे कुठून? त्यामुळे आता चूलच परवडते.

- आशा जाधव, देवरूख

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीRatnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्र