शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

कनेक्शन माेफत, पण गॅस विकत; ‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पंतप्रधान उज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून काही अटींमध्ये सवलतही देण्यात आली आहे.. कोणतीही ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पंतप्रधान उज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून काही अटींमध्ये सवलतही देण्यात आली आहे.. कोणतीही अनामत रक्‍कम न भरता अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र, नंतर या कुटुंबांना गॅस भरावा लागणार आहे. गॅसच्या किमती वाढल्याने अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस सिलिंडर परवडणारा नसल्याने दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबे आता चुलीकडे वळली आहेत.

केंद्र सरकारने ग्रामीण जनतेची चूल बंद व्हावी, या उद्देशानेही योजना दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी सुरू केली होती. या लोकांना जोडणी आणि सिलिंडर मोफत दिला असला तरी गॅसचा वापर त्यांना करावा लागणार आहे. सद्य:स्थितीत एका सिलिंडरसाठी ८३५ रुपये मोजावे लागत आहे. अल्प उत्पन्न असलेल्यांना गॅस वापरणे परवडणारे नाही. त्यामुळे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी चुलीकडे वळले आहेत.

..............................

सिलिंडर भरणे कसे परवडणार?

आम्ही रोजगारावर जगणारी माणसं. सरकारने मोफत सिलिंडर दिला. मात्र, आता गॅस भरण्यासाठी एवढे पैसे कुठून आणणार? रोज दर दिवशीच मिळतो, असे नाही. त्यामुळे सरकारने कनेक्शन मोफत दिले असले तरी गॅस भरण्यासाठी पैसे कुठून आणणार?

त्यापेक्षा चूलच परवडली.

- सावित्री वडके, करबुडे, ता. रत्नागिरी

..........................

चार-पाच वर्षांपूर्वी सरकारने गावांमध्ये राॅकेल आणि चुलीचा वापर होऊ नये, म्हणून उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी आणि सिलिंडर दिले होते. त्यावेळी सबसिडीही मिळत होती. मात्र, आता सबसिडीही नसल्याने नुसता गॅस सिलिंडर घेऊन करणार काय, गॅस भरायला एवढे पैसे आणायचे कुठून? त्यामुळे आता चूलच परवडते.

- आशा जाधव, देवरूख

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीRatnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्र