शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

केवळ स्वार्थासाठीच जप्ती

By admin | Updated: October 16, 2015 22:45 IST

गुहागर तालुका : मयुरेश कचरेकर यांचा सरपंचांवर आरोप

गुहागर : आरजीपीपीएलकडून करापोटी एक कोटी वीस लाख न आल्याने सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीवर जप्तीचा इशारा दिला होता. यामुळे कंपनीला टाळे लागून कामगारांवर उपासमारीची वेळ येणार हे माहीत असूनही केवळ स्वार्थासाठी ही जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप नगरसेवक मयुरेश कचरेकर यांनी केला आहे. आरजीपीपीएल हा गुहागर तालुक्यातील एकमेव मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील ८०० ते ९०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. या कंपनीचे बरेचसे क्षेत्र हे अंजनवेल ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात करापोटी एक कोटी वीस लाख रुपये ग्रामपंचायतीला देऊ न शकल्यामुळे त्याच्या वसुलीसाठी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीवर जप्ती आणण्याचा इशारा दिला होता. कंपनीला टाळे लागले तर तालुक्यातील सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ येईल याचा साधा विचार न करता केवळ स्वत:च्या फायद्यासाठी कराच्या स्वरुपात मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांमधून आणखी लाखोंचा भ्रष्टाचार करायचा हाच त्यांचा निव्वळ उद्देश होता, असे ते म्हणाले.अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून होणारी वीज निर्मिती मागील दोन वर्षापासून पूर्णपणे बंद असल्याने प्रकल्प प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे कंपनी कसे तरी रडत - खडत कामगारांचे पगार करत आहे. या कंपनीमुळेच तालुक्यातील शेकडो कामगारांच्या कुटुंबातील चुली पेटत आहेत. या आर्थिक संकटामुळे कंपनी अंजनवेल ग्रामपंचायतीचे कर देऊ शकली नाही. कंपनीची परिस्थिती माहिती असतानाही सरपंच यशवंत बाईत यांनी कंपनीला जप्तीचा इशारा दिला. या जप्तीने कंपनी बंद झाल्यास सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ येईल याचा विचार त्यांनी केलेला नाही, असे ते म्हणाले. कर वसूल नाही झाला तर गावातील विकासकामे करु शकणार नाही असे कारण त्यांनी पुढे केले आहे. वास्तविक आजपर्यंत ग्रामपंचायतीला कोट्यवधींचा कर मिळाला असून, अंजनवेल ग्रामपंचायत अतिशय भक्कम आर्थिक स्थितीत आहे. काही वर्षे कर नाही मिळाला तरीही ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्याप्रकारे चालू शकेल हे लेखा परीक्षणातील शिल्लक रकमेच्या आकडेवरुन दिसून येते, असे कचरेकर यांनी म्हटले आहे.परंतु, या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्यांतील सहभाग पाहता त्यांनी ९०० कुटुंबांच्या रोजीरोटीपेक्षा कंपनीकडून कराच्या रुपाने आलेले कोट्यवधी रुपये कोणत्याही परिस्थितीत वसूल करुन आर्थिक घोटाळे करायचे हे या ग्रामपंचायतीच्या एका मागोमाग एक बाहेर पडत असलेल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांवरुन स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोपही कचरेकर यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)आरोपाच्या फैरी : ना खायेंगे ना खाने देंगेसरपंच यशवंत बाईत हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. याआधी गावठाण जमिनीच्या प्रशासकीय गैरप्रकरणात व आता ग्रामसचिवालयाच्या बांधकाम प्रकरणात आर्थिक भ्रष्टाचारात सहभाग असल्याचे पुरावे समोर असताना त्यांच्यावर ‘ना खायेंगे ना खाने देंगे’ असे म्हणणारे पक्षाचे राज्य चिटणीस विनय नातू पक्षांतर्गत कारवाई करणार की, अजूनही दिशाभूल करणारी वक्तव्ये करुन भ्रष्टाचाऱ्यांना पाठबळ देणार? असा खडा सवाल त्यांनी केला आहे. कचरेकर यांच्या आरोपांमुळे गुहागर तालुका पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. यामुळे गुहागरातील राजकीय वातावरण तापले असून, या वादाची ठिणगी कोणता भडका उडवणार याकडेच गुहागरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.वस्तुस्थिती काय?सरपंच यशवंत बाईत यांच्यावर झालेल्या आरोपानंतर गुहागरातील राजकीय वातावरणात गरमागरम चर्चा सुरू आहे. यामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याचा उलगडा यशवंत बाईत यांनी करावा, अशी मागणी होत आहे.