शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

विजेअभावी लोकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात हाहाकार उडवून देणाऱ्या पुराचा चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांना जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जनजीवन ...

रत्नागिरी : जिल्ह्यात हाहाकार उडवून देणाऱ्या पुराचा चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांना जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली आहे. तसेच अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने लोकांचे हाल झाले आहेत.

पुर्ये पूल वाहतुकीसाठी बंद

साखरपा : मुसळधार पावसामुळे साखरप्यानजीकच्या पुर्ये गावाला जोडणारा काजळी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. घाटीवळे येथे झाड पडून कोल्हापूर महामार्ग बंद करण्यात आला होता. काजळी नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

साथींचा उद्रेक राेखण्यासाठी उपाययोजना

रत्नागिरी : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमध्ये आणि पूरपरिस्थिती निवळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार उद्भवण्याचा धोका आहे. अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर अशा आजारांचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सभापतींकडून दिलासा

देवरुख : अतिवृष्टीचा फटका बावनदीवर असलेल्या सर्व गावांना बसला आहे. यामध्ये आंगवली, बामणोली, खडीकोळवण ह्या ठिकाणचा रस्ता पाण्याने वाहून गेला आहे तसेच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गाळ साचला आहे. त्यामध्ये लोकांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्तांना सभापती जया माने यांनी दिलासा दिला आहे.

माडी विक्रेत्यांना मिळणार दिलासा

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना माडी विक्रेत्यांकडून परवाना शुल्काच्या स्वरुपात घेण्यात आलेली वाढीव रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा म्हणून अनेक माडी व्यावसायिक तसेच संघाकडून वारंवार मागणी करण्यात आली होती. शासनाने वाढीव रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.