शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

कृषिवनिकी संकल्पना शेतकऱ्यांना तारणार

By admin | Updated: December 5, 2015 00:21 IST

पी. के. नायर : वनसंसाधन, वातावरणातील बदलाबाबत दापोलीत राष्ट्रीय परिसंवाद

दापोली : भारतातील एकंदर भौगोलिक स्थिती, वातावरण हे कृषिवनिकी क्षेत्राला अत्यंत पोषक असल्याने भारतात यापुढे कृषिवनिकीच्या माध्यमातून शेती संकल्पनांची जुनी कवाडे नव्याने उघडणे आवश्यक असल्याचे मत फ्लोरीडा युनिवर्सिटीचे ज्येष्ठ कृषिवनिकी तज्ज्ञ डॉ. पी. के. आर. नायर यांनी दापोलीत व्यक्त केले.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वनशास्त्र महाविद्यालय आणि कृषी वनस्पतीशास्त्र विभाग आणि भारतीय वृक्षशास्त्रज्ञ संस्था हिमाचल प्रदेश-सोलन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहात आयोजित तीन दिवसीय वनसंसाधन आणि वातावरण बदल विषयावर राष्ट्रीय परिसंवादात डॉ. नायर बोलत होते.कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी सांगितले की, शेतकरी व आदिवासी यांनी त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी वने व वनांतील संसाधनांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. तरच ही संपत्ती टिकून राहील. त्यासाठी प्रत्येकानेच वनसंवर्धनाची जबाबदारी उचलली पाहिजे, असे डॉ. भट्टाचार्य म्हणाले. या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात ८ राज्यांतील १२ विद्यापीठांचे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. यावेळी शास्त्रज्ञांच्या ५५ शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. परिसंवादात डॉ. के. एस. शर्मा, डॉ. शाम विश्वनाथ, डॉ. अजित ठाकूर, डॉ. रमेश मढव, डॉ. जितेंद्र सिंंग यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. नारखेडे, ए. डी. राणे, व्ही. एम. म्हैस्के, बी. एल. ठवरे, एम. एम. बुरोंडकर यांच्यासह सहकाऱ्यांनी परिसंवाद यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन व्ही. के. पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)दापोलीत आयोजित या राष्ट्रीय परिसंवादात कृषी विषयाशी संबंधित अनेक शोधनिबंध सादर करण्यात आले. या शोधनिबंधांवर त्यानंतर चर्चा करण्यात येऊन खुला परिसंवादही पार पडला.आठ राज्यातील १२ विद्यापीठांचे शास्त्रज्ञ सहभागी.शास्त्रज्ञांच्या ५५ शोधनिबंधांचे सादरीकरण.विविध विषयांवर मार्गदर्शन.