शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

भरपाई तब्बल दोन महिन्यांनी

By admin | Updated: August 26, 2015 22:47 IST

अवेळी पाऊस : आंबा बागायतदारांना न्याय

गुहागर : तालुक्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या आंबा नुकसानासाठी भरपाई म्हणून ३ हजार ८८६ शेतकऱ्यांसाठी आलेल्या १ कोटी रुपयांच्या निधीमधून ६५२ शेतकऱ्यांना ९९ लाख रुपयांचा निधी वाटप केला असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली.गुहागर तालुक्यात ३ हजार ८८६ सातबारे असून, त्यावर १९ हजार ५२७ शेतकऱ्यांची नावे आहेत. यासाठी हेक्टरी २५ हजार भरपाईचा निकष असून, दोन एकरपर्यंत ५० हजार एवढी कमीत कमी नुकसानभरपाई मिळणार आहे शासनाकडून आलेला निधी जूनमध्ये तालुक्याला प्राप्त झाला असला तरी हा निधी कोणत्या निकषाद्वारे वाटप करायचा, हे धोरण निश्चित नसल्याने तब्बल दोन महिन्यांनंतर ६५२ शेतकऱ्यांना ९९ लाखांचा निधी वाटप करण्यात आला.प्राथमिक टप्प्यात सातबारा उताऱ्यावर एकमेव नाव असलेल्या शेतकऱ्यांना हा निधी वाटप करण्यात येत आहे. उर्वरित सातबारा उताऱ्यांवर एकापेक्षा जास्त नावे आहेत, तसेच यामधील अनेक व्यक्ती बाहेरगावी असल्याने हा निधी वाटप होण्यामध्ये अडचणी आहेत.याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सातबारा उताऱ्यांवरील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकाला समान निधी देण्यात येणार आहे. अन्यथा कोणा एकाला संमत्तीपत्राद्वारे मंजुरी दिल्यास त्या व्यक्तीच्या नावे निधी जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्र पूर्ण करुन निधी ताब्यात घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)