शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी नगरपरिषदेवर समितीचे ताशेरे

By admin | Updated: February 12, 2016 23:44 IST

रोस्टर तपासणी नाही : अनुसूचित जाती कल्याण समितीचा दौरा; दलित वस्तीचा निधी इतरत्र

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार मागासवर्गीयांच्या बाबतीत अगदीच सुन्न आहे. राज्यात बॅकलॉग सर्वत्र आहे. पण, रोस्टर तपासणी झाली नाही म्हणून २००६पासून या नगरपरिषदेने मागासवर्गीयांची भरतीच थांबवली आहे. एवढेच नव्हे; तर फंड येथे नाही म्हणून इथले नगरसेवक ओरड करीत असले तरी २०१० पासून निधी येऊनही तो खर्च केलेला नाही. दलित वस्ती सुधारणेसाठी आलेला निधी महामार्ग पुलासाठी खर्च केला असल्याची खळबळजनक माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.गेले तीन दिवस या समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि रत्नागिरी नगरपरिषद या ठिकाणी जाऊन येथे मागासवर्गीयांचा १३ टक्के अनुशेष भरला गेला आहे का, शासनाचा निधी त्यांच्या वस्तीवर खर्च होतोय का, मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या केली जातेय का, या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. याबाबत पत्रकारांना माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य, विधान परिषदेचे आमदार विजय तथा भाई गिरकर, प्रकाश गजभिये उपस्थित होते. तीन दिवसांच्या कालावधीत या समितीने काही दलित वस्त्यांवर जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच पोलीस विभाग येथील कामकाजाची पाहणी करून तिथल्या कामाचा आढावा घेतला. आज (शुक्रवारी) येथील नगरपरिषदेत बैठक झाली. नगरपरिषदेने मागासवर्गीयांसाठी काम केलेले नसल्याचे मत या समितीने नोंदवले. याची माहिती देताना डॉ. खाडे म्हणाले की, रत्नागिरीत चार दलित वस्त्या आहेत. यासाठी २०१०मध्ये निधी आलेला आहे. मात्र, तो या वस्त्यांसाठी आतापर्यंत खर्चच केलेला नाही. उलट महामार्ग पुलासाठी यातील ५८ लाख रुपये खर्च करून मागासवर्गीयांवर अन्याय केलेला आहे. १८७६ची नगरपरिषद असूनही मागासवर्गीयांचा निधी खर्च होत नाही, ही शोकांतिक आहे. याप्रकरणी याची साक्ष मंत्रालयात लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.कालबाह्य कायद्यांचा फटका मागासवर्गीय उमेदवाराला बसत आहे. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायतींत १३ जागा असल्या तरी त्यात एकही मागासवर्गीय सदस्य नसल्याचे निदर्शनास आल्याचे प्रकाश गजभिये यांनी यावेळी सांगितले. हीच स्थिती अगदी महानगरपालिका, नगरपालिका यांच्या नगरसेवकांबद्दल असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हे कालबाह्य कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. यापुढे समितीकडे मागासवर्गीयांचे आरक्षण किंवा निधीबाबत काही तक्रारी असल्यास त्याची दखल घेतली जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)महिन्याभराची मुदतनगरपरिषदेकडे दलित वस्ती सुधारणा अंतर्गत असलेला शिल्लक निधी खर्च करण्यासाठी समितीकडून महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. हा निधी रत्नागिरीत असलेल्या चार दलित वस्त्यांवर खर्च केल्यास त्यांचे नंदनवन होईल, असे डॉ. खाडे यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी आपल्या टीमला सोबत घेऊन करत असलेल्या कार्याची समितीने प्रशंसा केली. विशेषत: ‘प्रतिसाद’ या नव्या अ‍ॅपचे त्यांनी कौतुक केले.