शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

रत्नागिरी नगरपरिषदेवर समितीचे ताशेरे

By admin | Updated: February 12, 2016 23:44 IST

रोस्टर तपासणी नाही : अनुसूचित जाती कल्याण समितीचा दौरा; दलित वस्तीचा निधी इतरत्र

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार मागासवर्गीयांच्या बाबतीत अगदीच सुन्न आहे. राज्यात बॅकलॉग सर्वत्र आहे. पण, रोस्टर तपासणी झाली नाही म्हणून २००६पासून या नगरपरिषदेने मागासवर्गीयांची भरतीच थांबवली आहे. एवढेच नव्हे; तर फंड येथे नाही म्हणून इथले नगरसेवक ओरड करीत असले तरी २०१० पासून निधी येऊनही तो खर्च केलेला नाही. दलित वस्ती सुधारणेसाठी आलेला निधी महामार्ग पुलासाठी खर्च केला असल्याची खळबळजनक माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.गेले तीन दिवस या समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि रत्नागिरी नगरपरिषद या ठिकाणी जाऊन येथे मागासवर्गीयांचा १३ टक्के अनुशेष भरला गेला आहे का, शासनाचा निधी त्यांच्या वस्तीवर खर्च होतोय का, मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या केली जातेय का, या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. याबाबत पत्रकारांना माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य, विधान परिषदेचे आमदार विजय तथा भाई गिरकर, प्रकाश गजभिये उपस्थित होते. तीन दिवसांच्या कालावधीत या समितीने काही दलित वस्त्यांवर जाऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच पोलीस विभाग येथील कामकाजाची पाहणी करून तिथल्या कामाचा आढावा घेतला. आज (शुक्रवारी) येथील नगरपरिषदेत बैठक झाली. नगरपरिषदेने मागासवर्गीयांसाठी काम केलेले नसल्याचे मत या समितीने नोंदवले. याची माहिती देताना डॉ. खाडे म्हणाले की, रत्नागिरीत चार दलित वस्त्या आहेत. यासाठी २०१०मध्ये निधी आलेला आहे. मात्र, तो या वस्त्यांसाठी आतापर्यंत खर्चच केलेला नाही. उलट महामार्ग पुलासाठी यातील ५८ लाख रुपये खर्च करून मागासवर्गीयांवर अन्याय केलेला आहे. १८७६ची नगरपरिषद असूनही मागासवर्गीयांचा निधी खर्च होत नाही, ही शोकांतिक आहे. याप्रकरणी याची साक्ष मंत्रालयात लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.कालबाह्य कायद्यांचा फटका मागासवर्गीय उमेदवाराला बसत आहे. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायतींत १३ जागा असल्या तरी त्यात एकही मागासवर्गीय सदस्य नसल्याचे निदर्शनास आल्याचे प्रकाश गजभिये यांनी यावेळी सांगितले. हीच स्थिती अगदी महानगरपालिका, नगरपालिका यांच्या नगरसेवकांबद्दल असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हे कालबाह्य कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. यापुढे समितीकडे मागासवर्गीयांचे आरक्षण किंवा निधीबाबत काही तक्रारी असल्यास त्याची दखल घेतली जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)महिन्याभराची मुदतनगरपरिषदेकडे दलित वस्ती सुधारणा अंतर्गत असलेला शिल्लक निधी खर्च करण्यासाठी समितीकडून महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. हा निधी रत्नागिरीत असलेल्या चार दलित वस्त्यांवर खर्च केल्यास त्यांचे नंदनवन होईल, असे डॉ. खाडे यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी आपल्या टीमला सोबत घेऊन करत असलेल्या कार्याची समितीने प्रशंसा केली. विशेषत: ‘प्रतिसाद’ या नव्या अ‍ॅपचे त्यांनी कौतुक केले.