शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहाच्या संस्कारातून सुरक्षेचे ‘अभय’ देणारा कमांडो

By admin | Updated: August 22, 2015 00:24 IST

ओणी येथील वात्सल्यमंदिर संस्था

शोभना कांबळे, रत्नागिरी अनाथ मुलांना मायेची पाखर मिळाली, त्यांना पुढे जाण्यासाठी समाजाने पाठिंबा दिला तर हीच मुले भविष्यात इतरही अशा अनाथांच्या पाठीशी उभे रहाण्यासाठी सक्षम होतात. एवढेच नव्हे देशाच्या संरक्षणाची धुराही समर्थ पेलण्यास तयार होतात, हे सिद्ध केलयं ंओणीतील वात्सल्य मंदिरच्या अभय तेली या मुलाने. संस्थेने त्याच्यावर केलेल्या संस्कारामुळे अभय कमांडो म्हणून देशाचे संरक्षण करीत आहे. ओणी (ता. राजापूर) येथील वात्सल्यमंदिर ही संस्था गेली १३ वर्षे कार्यरत आहेत. या संस्थेत आलेल्या अनेक निराधार मुलांना मायेचे छत्र देऊन त्यांना स्वबळावर उडण्यासाठी या संस्थेने त्यांच्या पंखात बळ निर्माण केले आहे. म्हणूनच आज अनेक मुले उच्च शिक्षण घेऊन वरिष्ठ पदापर्यंत पोहोचली आहेत. यातील एक नाव म्हणजे अभय अशोक तेली. अभय मूळ पावशी (ता. कुडाळ) येथील. दुसरीला असतानाच त्याचे आई वडील एका अपघातात गेले. अभयच्या इतर भावंडांचे शिक्षण करण्यास नातेवाईक पुढे आले. मात्र, अभयला वात्सल्य मंदिरात दाखल करण्यात आले. मात्र, या संस्थेने त्याच्यावर आई वडिलांच्या प्रेमाची पाखर घालतानाच त्याचे भविष्य घडविले. दुसरी ते बारावीपर्यंत अभय वात्सल्य मंदिरात होता. डॉ. महेंद्र गुजर आणि त्यांचे एकंदरीत कुटुंब यांच्या प्रेमळ वातावरणामुळे त्याच्या अंगभूत कलागुणांना अधिकच वाव मिळाला. शालेय स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत तो पहिला आला. बारावीनंतर संस्थेने त्याला पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. महाविद्यालयीन जीवनात तर अभयची अभ्यासाबरोबरच इतर क्षेत्रात वेगाने आगेकूच सुरू झाली. महाविद्यालयीन जीवनात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवितानाच त्याचा अभ्यासही तेवढ्याच वेगाने सुरू होता. म्हणूनच २०१० मध्ये तो समाजशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठात प्रथम आला. संस्थेने त्याच्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे त्याने सार्थक करून दाखविले. त्यानंतरही त्याने मानवी हक्क आयोगाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम विशेष श्रेणीत पूर्ण केला. समाजशास्त्र हा त्याचा मुख्य विषय असल्याने तो या क्षेत्रात आपोआपच कार्यरत झाला. त्याने स्त्रीभ्रुण हत्या, व्यसनमुक्ती या विषयांवर समाजात जनजागृती करण्यास सुरूवात केली. यावर त्याची अनेक ठिकाणी व्याख्यानेही झाली आहेत. गडहिंग्लज येथे झालेल्या २१ व्या राज्यस्तरीय समाजशास्त्र परिषदेत त्याने जैतापूर प्रकल्पावर व्याख्यान दिले. आपल्याला देशासाठी काहीतरी करायचेय, ही ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच्या धडपडीला यश आले. विविध खेळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या स्कॉलर मुलाची २०११मध्ये रत्नागिरी पोलीस दलात नियुक्ती झाली आणि त्याच्या स्वप्नांना दिशा मिळाली. या कालावधीतही त्याची कामगिरी चमकदार होती. त्याची दखल घेत २०१३मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या विशेष पथकात त्याची कमांडो म्हणून नियुक्ती झाली आहे. देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने अभय स्वत:ला अतिशय भाग्यवान समजतो. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अभय याला वरिष्ठ पदावर जायचयं. देशसेवा करतानाच अभयची धडपड आपल्यासारख्या अनेक अनाथ मुलांची आयुष्ये घडावीत, याकडे लागले आहे. गरीबी जवळून पाहिल्याने समाजातील अनाथ मुलांच्या पाठिशी उभे रहाण्याचा संकल्प त्याने केला आहे. समाजानेही अशा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून त्यांना प्रोत्साहन दिले तर हजारो मुले वरिष्ठ पदावर पोहोचतील, असे मत अभय व्यक्त करतो.