शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

शाळा बंद पडू नये यासाठी एकत्र या : सुहास आयरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST

पाचल : ग्रामीण भागातील सर्वच शैक्षणिक संस्थांना पटसंख्येचा प्रश्न भेडसावत आहे. आपल्या भागातील शाळा बंद पडू लागल्या आहेत. या ...

पाचल : ग्रामीण भागातील सर्वच शैक्षणिक संस्थांना पटसंख्येचा प्रश्न भेडसावत आहे. आपल्या भागातील शाळा बंद पडू लागल्या आहेत. या शाळा बंद पडू नये, यासाठी सामाजिक कार्यकर्ते, संस्थाचालक व लोकप्रतिनिधी या सर्वांनी एकत्र येऊन शासन दरबारी अडचणी मांडून प्रश्न सोडवला पाहिजे असे आवाहन जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुहास आयरे यांनी बोलताना केले.

जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कै. आत्माराम आयरे विद्यालयात आत्माराम आयरे यांचा ५० वा तर संस्थेचे विश्वस्त आप्पा आयरे यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार साेहळ्यात सुहास आयरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, शरद मोरे, मिळंद गावचे सरपंच कीर्ती आयरे, संस्थेचे विश्वस्त विकास आयरे, पोलीस पाटील प्रवीण मोरे, उद्योजक अविनाश मढवी, मुख्याध्यापक प्रकाश डोंगरकर उपस्थित होते. सुहास आयरे पुढे म्हणाले की, कठीण काळात आपण शिक्षण घेत असतो. शिक्षण घेतल्यानंतर आपल्या जीवनात वावरताना विद्यार्थ्यांनी कायम कृतज्ञ व्हावे, कृतघ्न होऊ नये असे सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापक महाडिक, सामाजिक कार्यकर्ते श्यामराव विश्वासराव, विनायक आयरे, शिक्षक योगेश आयरे, भगवान आयरे, गणेश कांबळे, सुरेश आयरे यांनी मनोगत व्यक्त केले.