शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शाळा बंद पडू नये यासाठी एकत्र या : सुहास आयरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:34 IST

पाचल : ग्रामीण भागातील सर्वच शैक्षणिक संस्थांना पटसंख्येचा प्रश्न भेडसावत आहे. आपल्या भागातील शाळा बंद पडू लागल्या आहेत. या ...

पाचल : ग्रामीण भागातील सर्वच शैक्षणिक संस्थांना पटसंख्येचा प्रश्न भेडसावत आहे. आपल्या भागातील शाळा बंद पडू लागल्या आहेत. या शाळा बंद पडू नये, यासाठी सामाजिक कार्यकर्ते, संस्थाचालक व लोकप्रतिनिधी या सर्वांनी एकत्र येऊन शासन दरबारी अडचणी मांडून प्रश्न सोडवला पाहिजे असे आवाहन जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुहास आयरे यांनी बोलताना केले.

जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कै. आत्माराम आयरे विद्यालयात आत्माराम आयरे यांचा ५० वा तर संस्थेचे विश्वस्त आप्पा आयरे यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार साेहळ्यात सुहास आयरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, शरद मोरे, मिळंद गावचे सरपंच कीर्ती आयरे, संस्थेचे विश्वस्त विकास आयरे, पोलीस पाटील प्रवीण मोरे, उद्योजक अविनाश मढवी, मुख्याध्यापक प्रकाश डोंगरकर उपस्थित होते.

सुहास आयरे पुढे म्हणाले की, कठीण काळात आपण शिक्षण घेत असतो. शिक्षण घेतल्यानंतर आपल्या जीवनात वावरताना विद्यार्थ्यांनी कायम कृतज्ञ व्हावे, कृतघ्न होऊ नये असे सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापक महाडिक, सामाजिक कार्यकर्ते श्यामराव विश्वासराव, विनायक आयरे, शिक्षक योगेश आयरे, भगवान आयरे, गणेश कांबळे, सुरेश आयरे यांनी मनोगत व्यक्त केले.