शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद पडू नये यासाठी एकत्र या : सुहास आयरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:34 IST

पाचल : ग्रामीण भागातील सर्वच शैक्षणिक संस्थांना पटसंख्येचा प्रश्न भेडसावत आहे. आपल्या भागातील शाळा बंद पडू लागल्या आहेत. या ...

पाचल : ग्रामीण भागातील सर्वच शैक्षणिक संस्थांना पटसंख्येचा प्रश्न भेडसावत आहे. आपल्या भागातील शाळा बंद पडू लागल्या आहेत. या शाळा बंद पडू नये, यासाठी सामाजिक कार्यकर्ते, संस्थाचालक व लोकप्रतिनिधी या सर्वांनी एकत्र येऊन शासन दरबारी अडचणी मांडून प्रश्न सोडवला पाहिजे असे आवाहन जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुहास आयरे यांनी बोलताना केले.

जामदाखोरे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कै. आत्माराम आयरे विद्यालयात आत्माराम आयरे यांचा ५० वा तर संस्थेचे विश्वस्त आप्पा आयरे यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार साेहळ्यात सुहास आयरे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, शरद मोरे, मिळंद गावचे सरपंच कीर्ती आयरे, संस्थेचे विश्वस्त विकास आयरे, पोलीस पाटील प्रवीण मोरे, उद्योजक अविनाश मढवी, मुख्याध्यापक प्रकाश डोंगरकर उपस्थित होते.

सुहास आयरे पुढे म्हणाले की, कठीण काळात आपण शिक्षण घेत असतो. शिक्षण घेतल्यानंतर आपल्या जीवनात वावरताना विद्यार्थ्यांनी कायम कृतज्ञ व्हावे, कृतघ्न होऊ नये असे सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापक महाडिक, सामाजिक कार्यकर्ते श्यामराव विश्वासराव, विनायक आयरे, शिक्षक योगेश आयरे, भगवान आयरे, गणेश कांबळे, सुरेश आयरे यांनी मनोगत व्यक्त केले.