शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यातून बाहेर येऊन विकासाकडे बघा; उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

By मनोज मुळ्ये | Updated: October 6, 2023 14:29 IST

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत.

रत्नागिरी : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संस्कृत विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. देशातील पहिली आर्किटेक्चरची फर्म रत्नागिरीत होणार आहे. मुंबईनंतरचे राज्यातील पहिले शासकीय विधी महाविद्यालय येत्या दोन महिन्यात रत्नागिरीत होणार आहे. म्हणूनच आता विरोधकांनी खड्ड्यातून बाहेर येऊन या विकासाकडे पाहावे, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हाणला.रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नुकतेच सुरू झाले आहे. येथील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि प्राध्यापकांचा सन्मान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाला.

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत. गुवाहाटी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात प्रथम या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीसाठी हालचाली सुरू झाल्या. तेथेही केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमुळे सर्व परवानग्या अल्पवेळातच मिळाल्या आणि हे महाविद्यालय मार्गी लागले. हे राज्यातील पहिले वातानुकुलीत शासकीय महाविद्यालय ठरले आहे, असे मंत्री सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

रत्नागिरीमध्ये अनेक विकास कामे होत आहेत. दीर्घकालीन उपयोग होईल, असे शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र विरोधकांना केवळ खड्डेच दिसत आहेत. त्यांनी या खड्ड्यांच्या बाहेर येऊन विचार करावा, असा टोला मंत्री सामंत यांनी हाणला. अर्थात खड्ड्यांवर पर्याय म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून, लवकरच ते काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कौतुकरत्नागिरीत शासकीय महाविद्यालय होण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप मोठे योगदान असल्याचे मंत्री सामंत यांनी आवर्जून सांगितले. केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्यात खूप वेळ जातो. मात्र शिंदे आणि फडणवीस या जोडीमुळे या सर्व प्रक्रिया अल्पकाळात पार पडल्या. त्यामुळेच हे महाविद्यालय सुरू होऊ शकल्याचे ते म्हणाले.

वाघनखे रत्नागिरीत येणारलंडनहून आणलेली वाघनखे तीन वर्षे भारतात राहतील, असा करार आहे. तीन वर्षात ती कोठे कोठे ठेवली जातील, ते निश्चित करण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जगातील पहिले अभ्यासकेंद्र रत्नागिरीमध्ये होणार आहे. तेथे ही वाघनखे काही काळासाठी असावीत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे आणि त्यांनी ती मंजूरही केली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत