शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यातून बाहेर येऊन विकासाकडे बघा; उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

By मनोज मुळ्ये | Updated: October 6, 2023 14:29 IST

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत.

रत्नागिरी : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संस्कृत विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. देशातील पहिली आर्किटेक्चरची फर्म रत्नागिरीत होणार आहे. मुंबईनंतरचे राज्यातील पहिले शासकीय विधी महाविद्यालय येत्या दोन महिन्यात रत्नागिरीत होणार आहे. म्हणूनच आता विरोधकांनी खड्ड्यातून बाहेर येऊन या विकासाकडे पाहावे, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हाणला.रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नुकतेच सुरू झाले आहे. येथील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि प्राध्यापकांचा सन्मान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाला.

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत. गुवाहाटी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात प्रथम या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीसाठी हालचाली सुरू झाल्या. तेथेही केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमुळे सर्व परवानग्या अल्पवेळातच मिळाल्या आणि हे महाविद्यालय मार्गी लागले. हे राज्यातील पहिले वातानुकुलीत शासकीय महाविद्यालय ठरले आहे, असे मंत्री सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

रत्नागिरीमध्ये अनेक विकास कामे होत आहेत. दीर्घकालीन उपयोग होईल, असे शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र विरोधकांना केवळ खड्डेच दिसत आहेत. त्यांनी या खड्ड्यांच्या बाहेर येऊन विचार करावा, असा टोला मंत्री सामंत यांनी हाणला. अर्थात खड्ड्यांवर पर्याय म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून, लवकरच ते काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कौतुकरत्नागिरीत शासकीय महाविद्यालय होण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप मोठे योगदान असल्याचे मंत्री सामंत यांनी आवर्जून सांगितले. केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्यात खूप वेळ जातो. मात्र शिंदे आणि फडणवीस या जोडीमुळे या सर्व प्रक्रिया अल्पकाळात पार पडल्या. त्यामुळेच हे महाविद्यालय सुरू होऊ शकल्याचे ते म्हणाले.

वाघनखे रत्नागिरीत येणारलंडनहून आणलेली वाघनखे तीन वर्षे भारतात राहतील, असा करार आहे. तीन वर्षात ती कोठे कोठे ठेवली जातील, ते निश्चित करण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जगातील पहिले अभ्यासकेंद्र रत्नागिरीमध्ये होणार आहे. तेथे ही वाघनखे काही काळासाठी असावीत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे आणि त्यांनी ती मंजूरही केली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत