शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खड्ड्यातून बाहेर येऊन विकासाकडे बघा; उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

By मनोज मुळ्ये | Updated: October 6, 2023 14:29 IST

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत.

रत्नागिरी : येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संस्कृत विद्यापीठ, अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. देशातील पहिली आर्किटेक्चरची फर्म रत्नागिरीत होणार आहे. मुंबईनंतरचे राज्यातील पहिले शासकीय विधी महाविद्यालय येत्या दोन महिन्यात रत्नागिरीत होणार आहे. म्हणूनच आता विरोधकांनी खड्ड्यातून बाहेर येऊन या विकासाकडे पाहावे, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हाणला.रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नुकतेच सुरू झाले आहे. येथील पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि प्राध्यापकांचा सन्मान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाला.

रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हवे, हा मुद्दा २०१४ साली सर्वप्रथम आपल्यासमोर आला. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत. गुवाहाटी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात प्रथम या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. त्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीसाठी हालचाली सुरू झाल्या. तेथेही केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमुळे सर्व परवानग्या अल्पवेळातच मिळाल्या आणि हे महाविद्यालय मार्गी लागले. हे राज्यातील पहिले वातानुकुलीत शासकीय महाविद्यालय ठरले आहे, असे मंत्री सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

रत्नागिरीमध्ये अनेक विकास कामे होत आहेत. दीर्घकालीन उपयोग होईल, असे शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र विरोधकांना केवळ खड्डेच दिसत आहेत. त्यांनी या खड्ड्यांच्या बाहेर येऊन विचार करावा, असा टोला मंत्री सामंत यांनी हाणला. अर्थात खड्ड्यांवर पर्याय म्हणून शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून, लवकरच ते काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कौतुकरत्नागिरीत शासकीय महाविद्यालय होण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप मोठे योगदान असल्याचे मंत्री सामंत यांनी आवर्जून सांगितले. केंद्र सरकारकडून परवानगी मिळण्यात खूप वेळ जातो. मात्र शिंदे आणि फडणवीस या जोडीमुळे या सर्व प्रक्रिया अल्पकाळात पार पडल्या. त्यामुळेच हे महाविद्यालय सुरू होऊ शकल्याचे ते म्हणाले.

वाघनखे रत्नागिरीत येणारलंडनहून आणलेली वाघनखे तीन वर्षे भारतात राहतील, असा करार आहे. तीन वर्षात ती कोठे कोठे ठेवली जातील, ते निश्चित करण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील जगातील पहिले अभ्यासकेंद्र रत्नागिरीमध्ये होणार आहे. तेथे ही वाघनखे काही काळासाठी असावीत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे आणि त्यांनी ती मंजूरही केली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत