शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

सागरी सुरक्षा कवच अभियानांतर्गत किनाऱ्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 14:50 IST

सर्व जेटींवरील पोलीस चौक्या तसेच विविध ठिकाणांचे तपासणी नाके किती सतर्क आहेत, हे या अभियानात तपासण्यात आले.

रत्नागिरी : कोकणाला समुद्रकिनारा हा विस्तृत लाभलेला आहे. यामुळे समुद्रामार्गे कोणी दहशतवादी येऊन जिल्ह्यात घुसखोरी करून हल्ला करू शकतो, या शक्यतेमुळे सागरी किनारा किती सुरक्षित आहे, हे पडताळून पाहण्यासाठी सागरी सुरक्षा कवच हे अभियान जिल्ह्यातील विविध समुद्राच्या ठिकाणी राबवण्यात आले.

या अभियानात पोलीस दल, तटरक्षक दल, मत्स्य विभाग, सीमा शुल्क, सागरी सुरक्षा दल आदी सर्व विभाग सहभागी झाले हाेते. हे अभियान बुधवारी सकाळपासून सुरू झाले. या अभियानाचा मुख्य उद्देश किनाऱ्यावरील सुरक्षा हा आहे. कोकणात अनोळखी व्यक्ती बोट घेऊन समुद्रामार्गे दाखल झाल्या तर सर्व यंत्रणा किती सतर्क आहेत, हे या मोहिमेत तपासण्यात आले. जिल्ह्यातील सर्व जेटींवरील पोलीस चौक्या तसेच विविध ठिकाणांचे तपासणी नाके किती सतर्क आहेत, हे या अभियानात तपासण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या अभियानात काही ठिकाणी भेटी देऊन पोलीस अधिकारी व अंमलदार या अभियानाच्या वेळी सतर्क आहेत का, याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. समुद्रकिनारी किंवा आसपास संशयित काही दिसले तर लगेचच स्थानिक व जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. गर्ग यांनी नागरिकांना केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग