शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
2
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
3
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्म-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
4
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
5
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
6
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
7
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
8
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
9
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
10
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
11
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
12
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
13
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
14
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
15
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
16
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
17
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
18
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
19
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
20
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी

सागरी सुरक्षा कवच अभियानांतर्गत किनाऱ्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 14:50 IST

सर्व जेटींवरील पोलीस चौक्या तसेच विविध ठिकाणांचे तपासणी नाके किती सतर्क आहेत, हे या अभियानात तपासण्यात आले.

रत्नागिरी : कोकणाला समुद्रकिनारा हा विस्तृत लाभलेला आहे. यामुळे समुद्रामार्गे कोणी दहशतवादी येऊन जिल्ह्यात घुसखोरी करून हल्ला करू शकतो, या शक्यतेमुळे सागरी किनारा किती सुरक्षित आहे, हे पडताळून पाहण्यासाठी सागरी सुरक्षा कवच हे अभियान जिल्ह्यातील विविध समुद्राच्या ठिकाणी राबवण्यात आले.

या अभियानात पोलीस दल, तटरक्षक दल, मत्स्य विभाग, सीमा शुल्क, सागरी सुरक्षा दल आदी सर्व विभाग सहभागी झाले हाेते. हे अभियान बुधवारी सकाळपासून सुरू झाले. या अभियानाचा मुख्य उद्देश किनाऱ्यावरील सुरक्षा हा आहे. कोकणात अनोळखी व्यक्ती बोट घेऊन समुद्रामार्गे दाखल झाल्या तर सर्व यंत्रणा किती सतर्क आहेत, हे या मोहिमेत तपासण्यात आले. जिल्ह्यातील सर्व जेटींवरील पोलीस चौक्या तसेच विविध ठिकाणांचे तपासणी नाके किती सतर्क आहेत, हे या अभियानात तपासण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या अभियानात काही ठिकाणी भेटी देऊन पोलीस अधिकारी व अंमलदार या अभियानाच्या वेळी सतर्क आहेत का, याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. समुद्रकिनारी किंवा आसपास संशयित काही दिसले तर लगेचच स्थानिक व जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. गर्ग यांनी नागरिकांना केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग