शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

तटरक्षक दलाचे जागृतीसाठी १५ किलोमीटर वॉकथॉन, किनारा स्वच्छता उपक्रमासाठी नागरिकांना आवाहन

By शोभना कांबळे | Updated: September 6, 2022 19:06 IST

केंद्र शासनाच्या पुनीत सागर अभियानांतर्गत वॉकथॉनचे आयोजन

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरी कार्यालयातर्फे मंगळवार, दि. ६ रोजी केंद्र शासनाच्या पुनीत सागर अभियानांतर्गत वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) च्या कॅडेट्सनी देखील यात सहभाग घेतला.भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर उपमहानिरीक्षक शत्रूजित सिंग यांनी सकाळी साडे सात वाजता ध्वज दाखविल्यानंतर मिरजोळे एमआयडीसी येथील एच-२ प्लॉट स्थित तटरक्षक दलाच्या कार्यालयापासून हा वॉकथॉन करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स अशा एकूण तीस जणांनी हा सुमारे १५ किलोमीटर अंतराचा वॉकथॉन पूर्ण केला.स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षी १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिनानिमित्त नागरिकांमध्ये सागर व किनारा स्वच्छता तसेच सागरी परिसंस्थेचे जतन करणे यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि या दिनी अधिकाधिक लोकांना किनारा स्वच्छतेसाठी सहभागी घेण्यास प्रेरित करणे, या उद्देशाने केंद्र शासनाने यावर्षी पुनीत सागर अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गतच या वाॅकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तटरक्षक जवान आणि एनसीसी कॅडेट्सनी सागरी सुरक्षा आणि स्वच्छ सागर किनाऱ्याचे महत्व दर्शविणारे फलक हाती घेतले होते. यावेळी विद्यार्थ्यांना योगाद्वारे जीवन निरोगी राखण्यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीindian navyभारतीय नौदल