शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

तटरक्षक दलाचे जागृतीसाठी १५ किलोमीटर वॉकथॉन, किनारा स्वच्छता उपक्रमासाठी नागरिकांना आवाहन

By शोभना कांबळे | Updated: September 6, 2022 19:06 IST

केंद्र शासनाच्या पुनीत सागर अभियानांतर्गत वॉकथॉनचे आयोजन

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरी कार्यालयातर्फे मंगळवार, दि. ६ रोजी केंद्र शासनाच्या पुनीत सागर अभियानांतर्गत वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) च्या कॅडेट्सनी देखील यात सहभाग घेतला.भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर उपमहानिरीक्षक शत्रूजित सिंग यांनी सकाळी साडे सात वाजता ध्वज दाखविल्यानंतर मिरजोळे एमआयडीसी येथील एच-२ प्लॉट स्थित तटरक्षक दलाच्या कार्यालयापासून हा वॉकथॉन करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स अशा एकूण तीस जणांनी हा सुमारे १५ किलोमीटर अंतराचा वॉकथॉन पूर्ण केला.स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवी वर्षी १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिनानिमित्त नागरिकांमध्ये सागर व किनारा स्वच्छता तसेच सागरी परिसंस्थेचे जतन करणे यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि या दिनी अधिकाधिक लोकांना किनारा स्वच्छतेसाठी सहभागी घेण्यास प्रेरित करणे, या उद्देशाने केंद्र शासनाने यावर्षी पुनीत सागर अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गतच या वाॅकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तटरक्षक जवान आणि एनसीसी कॅडेट्सनी सागरी सुरक्षा आणि स्वच्छ सागर किनाऱ्याचे महत्व दर्शविणारे फलक हाती घेतले होते. यावेळी विद्यार्थ्यांना योगाद्वारे जीवन निरोगी राखण्यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीindian navyभारतीय नौदल