शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा कळीची?

By admin | Updated: April 20, 2017 20:32 IST

मागील अनेक वर्षे वादाच्या भोवºयात सापडलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम सन २०१८च्या अखेरीस सुरु करण्याबाबतच्या दृष्टीने

ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 20 - मागील अनेक वर्षे वादाच्या भोवºयात सापडलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम सन २०१८च्या अखेरीस सुरु करण्याबाबतच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व फ्रान्सच्या शिष्टमंडळादरम्यान सकारात्मक चर्चा झाली आहे. आता केंद्र व राज्यातील सत्तेतील भागिदार असणारी भाजप व शिवसेना आमने-सामने येणार असून, त्याचे पडसाद स्थानिक पातळीवरही उमटण्याची शक्यता अधिक आहे.
 
जगातील सर्वांत मोठा असा दहा हजार मेगावॅट एवढी अणुपासून ऊर्जा निर्माण करणारा प्रकल्प राजापूर तालुक्यात मंजूर झाल्यापासून तालुक्यातील वातावरण संघर्षाचेच राहिले आहे. अणूपासून ऊर्जा निर्माण करताना त्यातून होणारे रेडिएशन (किरणोत्सार) याचा परिणाम सर्वांवरच होणार आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर आंबा व काजूच्या बागांसह विविध प्रकारची लागवड झालेली असून, त्यावरच तालुकावासीयांच्या उदरनिर्वाह चालतो. या प्रकल्पातून होणाºया रेडिएशनमुळे सर्व बागायतींचे अस्तित्व धोक्यात येईल. शिवाय येथील भातशेतीवरही त्याचा दुष्परिणाम होईल, अशी भीती येथील शेतकºयांच्या मनात आहे.  नियोजित प्रकल्पातील मशिनरी थंड करण्यासाठी लागणारे पाणी  बाजुला असलेल्या समुद्रातून घेऊन ते पुन्हा समुद्रातच सोडले जाणार असल्याने त्या समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्यानंतर त्याचा परिणाम मच्छीमारीवर होईल, अशी भीती साखरीनाटेतील मच्छीमार बांधवांत पसरली आहेत. त्यामुळे कोकणच्या पर्यावरणाचा नाश करणारा विषारी प्रकल्प राजापुरात येऊ नये, यासाठी गेली काही  वर्षे जैतापूर प्रकल्पावरून चांगलेच रणकंदन माजले आहे. 
 
त्यातूनच आजवर अनेक आंदोलने झाली असून, स्थानिक जनता व प्रशासन यांच्यात संघर्ष उडालेला आहे. एकदा तर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने करण्यात आलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा बळी गेला होता. सुरुवातीच्या काळात तत्कालीन सताधारी असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यानंतर आलेल्या भाजपानेही जैतापूर प्रकल्प रेटून नेण्याची रणनिती आखली आहे. शिवसेना तर सुरुवातीपासून प्रकल्पाच्या विरोधात आहे. सेनेने अनेक आंदोोलनात प्रकल्प विरोधकांना भक्कम साथ दिल्याने लढ्याचे स्वरुप व्यापक राहिले आहे. त्या लढ्याचे नेतृत्व करणारे आमदार राजन साळवी व त्यांचे सहकारी यांना अटकही झाली होती. 
 
अस्थिरतेची वर्षे मागे पडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी फ्रान्सच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व या प्रकल्पाबद्दल चर्चा केली. त्यावेळी भेटीला आलेल्या त्या शिष्टमंडळाकडून सन २०१८ अखेर जैतापूर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन २०२५ला पहिला रिक्टर सुरु होईल. सन २०२७पर्यंत सर्वच्या सर्व सहा रिक्टरमधून पूर्ण क्षमतेने ऊर्जा निर्मिती होऊ शकेल, असे आश्वासन देण्यात आले आहे. 
 
त्या भेटीचे पडसाद आता राजापुरात उमटले आहेत. स्थानिक विरोधकांसह शिवसेना आक्रमक झाली आहे, तर भाजप सरकार प्रकल्प रेटून नेण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप आता पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची लक्षणे आहेत. सेनेला कोणत्याही स्थितीत प्रकल्प रद्द करायचा आहे, तर भाजपला तो मार्गी लावण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे जैतापूरवरून युतीमधील संघर्ष चिघळण्याची शक्यता वाढली आहे.
 
सेनेची कमजोरी : भाजपकडून प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी-
विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेला आज सत्तेवर आल्यानंतरही जैतापूर प्रकल्प रद्द करता आला नाही, हे वास्तव आहे. मात्र, सेनेची ती विरोधाची भूमिका कायम असून, अधूनमधून त्यांच्याकडून विरोधाचे सूर निघत असतात. पण, राज्याच्या सत्तेतील सहभागी या दोन पक्षांत कुरघोडीच्या राजकारणामुळे इच्छा असूनही सेनेला प्रकल्प रद्द करता आलेला नाही.