शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

रत्नागिरीत स्वच्छतादूतांनी राबविले अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:54 IST

महात्मा गांधी यांची १५० वी जयंती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मंगळवारी विविध गावे, सामाजिक संस्था तसेच कार्यालयांनी स्वच्छता मोहीम राबविली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही  विविध कार्यालये, गावांमध्येही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

रत्नागिरी : महात्मा गांधी यांची १५० वी जयंती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मंगळवारी विविध गावे, सामाजिक संस्था तसेच कार्यालयांनी स्वच्छता मोहीम राबविली. त्यामुळे सर्वत्र आज स्वच्छतेचे दूत काम करताना दिसत होते.  

गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहीम राबविली. तसेच आज ग्रामसभांचेही आयोजन करण्यात आले होते. विविध आध्यात्मिक संस्था, सामाजिक संस्था यांनी आज विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. सकाळी अगदी ६ वाजल्यापासून या मोहीमेला सुरूवात झाल्याने सर्वत्र स्वच्छता दूत हातात झाडू घेऊन काम करताना दिसत होते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आलीे. या मोहिमेत स्वामी बाळ सत्यधारी महाराज सेवा मंडळाचे बाळ सत्यधारी महाराज आणि त्यांचे सेवाकरी तसेच आणि नेहरू युवा मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोहिमेत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष उदय सामंत,   जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, सर्व नगरसेवक, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, रत्नागिरीचे प्रांत अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, महसूल विभागाच्या  तहसीलदार वैशाली पाटील, रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, डॉ. दिलीप पाखरे, सुधाकर सावंत, प्रताप सावंतदेसाई  तसेच या परिसरातील सर्व कार्यालयांंचे विभागप्रमुख व कर्मचारी वर्ग  सहभागी झाले होते. 

आज शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या वतीने रूग्णालय परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच वन विभागाच्या रत्नागिरी परिक्षेत्रातर्फे नजिकच्या आरे वारे समुद्रकिनारी ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही  विविध कार्यालये, गावांमध्येही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.