शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

रत्नागिरीत स्वच्छतादूतांनी राबविले अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:54 IST

महात्मा गांधी यांची १५० वी जयंती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मंगळवारी विविध गावे, सामाजिक संस्था तसेच कार्यालयांनी स्वच्छता मोहीम राबविली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही  विविध कार्यालये, गावांमध्येही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

रत्नागिरी : महात्मा गांधी यांची १५० वी जयंती तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात मंगळवारी विविध गावे, सामाजिक संस्था तसेच कार्यालयांनी स्वच्छता मोहीम राबविली. त्यामुळे सर्वत्र आज स्वच्छतेचे दूत काम करताना दिसत होते.  

गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहीम राबविली. तसेच आज ग्रामसभांचेही आयोजन करण्यात आले होते. विविध आध्यात्मिक संस्था, सामाजिक संस्था यांनी आज विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. सकाळी अगदी ६ वाजल्यापासून या मोहीमेला सुरूवात झाल्याने सर्वत्र स्वच्छता दूत हातात झाडू घेऊन काम करताना दिसत होते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आलीे. या मोहिमेत स्वामी बाळ सत्यधारी महाराज सेवा मंडळाचे बाळ सत्यधारी महाराज आणि त्यांचे सेवाकरी तसेच आणि नेहरू युवा मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोहिमेत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष उदय सामंत,   जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, सर्व नगरसेवक, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, रत्नागिरीचे प्रांत अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, महसूल विभागाच्या  तहसीलदार वैशाली पाटील, रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, डॉ. दिलीप पाखरे, सुधाकर सावंत, प्रताप सावंतदेसाई  तसेच या परिसरातील सर्व कार्यालयांंचे विभागप्रमुख व कर्मचारी वर्ग  सहभागी झाले होते. 

आज शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या वतीने रूग्णालय परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच वन विभागाच्या रत्नागिरी परिक्षेत्रातर्फे नजिकच्या आरे वारे समुद्रकिनारी ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही  विविध कार्यालये, गावांमध्येही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.