शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियान ठरले केवळ देखावा

By admin | Updated: June 5, 2015 00:18 IST

वाजले की बारा : काही महिन्यातच उडाला मोहीमेचा फज्जा...

देवरूख : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा संगमेश्वर तालुक्यात पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे हे स्वच्छता अभियान म्हणजे केवळ देखावा ठरल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून ऐकू येऊ लागली आहे.देशात संपूर्ण बहुमत प्राप्त करून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यावर काही काळातच स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता. स्वत: हातात झाडू घेऊन मोदी रस्त्यावर उतरल्याने याची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. झालेही तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांच्याबरोबरीने नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये, सर्व पोलीस ठाणे आदी शासकीय खात्यांनी या मोहिमेत उडी घेतली. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर या स्वच्छता अभियानाचे नियोजन करून त्या - त्या विभागाकडे याची जबाबादारी देण्यात आली होती. यातून सुमारे दोन महिने तरी गावोगावी स्वच्छतेचा नारा ऐकू येत होता. शालेय विद्यार्थ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेत लोकसहभागातून हे मिशन स्वच्छता अभियान यशस्वी होण्याची चिन्हे होती. दोन - तीन महिने चालू असलेला स्वच्छतेचा डंका अचानक बंद झाला, शासकीय खातेप्रमुखांसह लोकप्रतिनिधींनीही यातून अंग काढून घेतले आणि मग हेच का ते स्वच्छ कार्यालय अशी विचारणा करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.या अभियानातून तहसील कार्यालय, पंचायत समिती आवार, गावागावातील ग्रामपंचायतींचा परिसर, आरोग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, बाजारपेठा अशा ठिकाणी राबवलेली स्वच्छता मोहीम आजघडीला केवळ कागदोपत्री राहिल्याचे दिसत आहे. तीन - चार महिन्यांनंतर हे अभियान कधी राबवले होते, असे विचारण्याची वेळ आता सर्वांवर आली आहे. या अस्वच्छतेला जबाबदार कोणाला धरणार व धरल्यास कारवाई काय, असा सवाल विचारला जात आहे. देवरूखमध्ये अनेक ठिकाणी या अभियानाचे आता बारा वाजले असल्याचे पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)देवरूख शहरात स्वच्छता अभियान मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. मात्र, काही कालावधीनंतर या परिसरातच कमालीची अस्वच्छता निर्माण झाल्याने याच परिसरात ही मोहीम राबविण्यात आली होती काय, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. केवळ कागदोपत्री ही मोहीम राबवू नये, असा प्रयत्न होणे आवश्यक आहे.