शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

स्वच्छता अभियान ठरले केवळ देखावा

By admin | Updated: June 5, 2015 00:18 IST

वाजले की बारा : काही महिन्यातच उडाला मोहीमेचा फज्जा...

देवरूख : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा संगमेश्वर तालुक्यात पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे हे स्वच्छता अभियान म्हणजे केवळ देखावा ठरल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून ऐकू येऊ लागली आहे.देशात संपूर्ण बहुमत प्राप्त करून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यावर काही काळातच स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता. स्वत: हातात झाडू घेऊन मोदी रस्त्यावर उतरल्याने याची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. झालेही तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांच्याबरोबरीने नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये, सर्व पोलीस ठाणे आदी शासकीय खात्यांनी या मोहिमेत उडी घेतली. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर या स्वच्छता अभियानाचे नियोजन करून त्या - त्या विभागाकडे याची जबाबादारी देण्यात आली होती. यातून सुमारे दोन महिने तरी गावोगावी स्वच्छतेचा नारा ऐकू येत होता. शालेय विद्यार्थ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेत लोकसहभागातून हे मिशन स्वच्छता अभियान यशस्वी होण्याची चिन्हे होती. दोन - तीन महिने चालू असलेला स्वच्छतेचा डंका अचानक बंद झाला, शासकीय खातेप्रमुखांसह लोकप्रतिनिधींनीही यातून अंग काढून घेतले आणि मग हेच का ते स्वच्छ कार्यालय अशी विचारणा करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.या अभियानातून तहसील कार्यालय, पंचायत समिती आवार, गावागावातील ग्रामपंचायतींचा परिसर, आरोग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, बाजारपेठा अशा ठिकाणी राबवलेली स्वच्छता मोहीम आजघडीला केवळ कागदोपत्री राहिल्याचे दिसत आहे. तीन - चार महिन्यांनंतर हे अभियान कधी राबवले होते, असे विचारण्याची वेळ आता सर्वांवर आली आहे. या अस्वच्छतेला जबाबदार कोणाला धरणार व धरल्यास कारवाई काय, असा सवाल विचारला जात आहे. देवरूखमध्ये अनेक ठिकाणी या अभियानाचे आता बारा वाजले असल्याचे पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)देवरूख शहरात स्वच्छता अभियान मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. मात्र, काही कालावधीनंतर या परिसरातच कमालीची अस्वच्छता निर्माण झाल्याने याच परिसरात ही मोहीम राबविण्यात आली होती काय, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. केवळ कागदोपत्री ही मोहीम राबवू नये, असा प्रयत्न होणे आवश्यक आहे.