शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

जिल्ह्यात चर्चांना उधाण; राजकीय हवा तापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 13:24 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण विरोधकांच्या भाजप व सेनेमधील संभाव्य प्रवेशाच्या चर्चेमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. खासदार नारायण राणे स्वाभिमानसह भाजपमध्ये जाणार का, भास्कर जाधव मातोश्रीवर गेले होते का? ते सेनेमध्ये किवा भाजपमध्ये प्रवेश करणार काय, राज्यात युती झाली नाही तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड रत्नागिरी मतदरसंघातून निवडणूक लढविणार का, जिल्ह्यातून आणखी काही नेते सेना, भाजपच्या वाटेवर आहेत का, यांसारख्या प्रश्नांनी जिल्ह्याच्या राजकारणात थैमान घातले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात चर्चांना उधाण; राजकीय हवा तापली पक्षांतराच्या गप्पांना ऊत, सारेच कार्यकर्ते अस्वस्थ

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण विरोधकांच्या भाजप व सेनेमधील संभाव्य प्रवेशाच्या चर्चेमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. खासदार नारायण राणे स्वाभिमानसह भाजपमध्ये जाणार का, भास्कर जाधव मातोश्रीवर गेले होते का? ते सेनेमध्ये किवा भाजपमध्ये प्रवेश करणार काय, राज्यात युती झाली नाही तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड रत्नागिरी मतदरसंघातून निवडणूक लढविणार का, जिल्ह्यातून आणखी काही नेते सेना, भाजपच्या वाटेवर आहेत का, यांसारख्या प्रश्नांनी जिल्ह्याच्या राजकारणात थैमान घातले आहे.राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यातच इडा (ईडी) पिडा टळो आणि आपण प्रवेश करणार असलेल्याचे राज्य येवो असा अंतर्मनात घोष करीत करीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात आहे.

केंद्राप्रमाणेच राज्यातही पुन्हा भाजप व सेना यांची सत्ता येणार असल्याचे वातावरण तयार करण्यात भाजप व सेनेला काही प्रमाणात यश आले आहे. त्यातच काहीजणांना आपल्याभोवती चौकशीचा ससेमिरा लागण्याची भीतीही वाटते आहे. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या पक्षाची कवचकुंडले असली तर वाचण्याची शक्यता राहील. त्यामुळे विरोधी पक्षांमधील नेते भाजप व सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव हे रविवारी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेटल्याची बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियावरून झळकली अन चर्चेला उधाण आले. मात्र, असे काहीच नसल्याचे आमदार भास्कर जाधव यांना चाहते व कार्यकर्त्यांना फोनवर सांगावे लागले. चाहत्यांच्या प्रश्नांमुळे त्यांना हैराण व्हावे लागल्याचे त्यांनी नंतर माध्यमांच्या काही प्रतिनिधींना सांगितले. परंतु जाधव सेना किंवा भाजपमध्ये जाणार का, याबाबतची चर्चा अद्याप जिल्ह्यात सुरूच आहे.दुसरीकडे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे हे त्यांच्या स्वाभिमान पक्षासह भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. राणे यांची गेल्या काही काळापासून राजकीय कोंडी झाली आहे.

ही कोंडी फोडण्याचा ते जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र, राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे जे कट्टर विरोधक राजन तेली व संदेश पारकर हे भाजपमध्ये गेले आहेत, त्यांचा याला विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना विरोध किती होणार, याची चाचपणी केल्याशिवाय राणे यांचा भाजप प्रवेश सुकर होण्याची शक्यता नसल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे.राणे हे स्वाभिमानसह भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचे पक्षाच स्वागतच आहे. मात्र, त्यांच्याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री फडणवीस व पक्षाध्यक्ष अमित शहा हेच घेतील, असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी म्हटल्याने राजकीय चर्चेमध्ये आणखी रंग भरला आहे.तर रत्नागिरीतून प्रसाद लाडसेना व भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसमधील अनेकजणांनी भाजप प्रवेश केला आहे. काहीजणांनी भाजपऐवजी युतीमध्ये असलेल्या सेनेत प्रवेश केला आहे. दुसरीकडे खासदार नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेकडून कितपत सहकार्य मिळेल, याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी