शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणवर सूर्य कोपला; पारा चक्क ४३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:15 IST

काल-परवापर्यंत हवेमध्ये असलेला गारवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाहीसा झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सूर्य कोपला. सोमवारी जिल्हाभरात या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणमध्ये तर सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान होते. यापूर्वी कधीही चाळीसीचा आकडा पार न केलेल्या चिपळूणचे तापमान सोमवारी अचानक ४३पर्यंत वाढले. त्यामुळे रत्नागिरीकरांचा सोमवारी चांगलाच घाम निघाला.

ठळक मुद्देचिपळुणवर सूर्य कोपला; पारा चक्क ४३ अंशावरजिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद; रत्नागिरी घामाने डबडबली

विहार तेंडुलकररत्नागिरी : काल-परवापर्यंत हवेमध्ये असलेला गारवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाहीसा झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सूर्य कोपला. सोमवारी जिल्हाभरात या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणमध्ये तर सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान होते. यापूर्वी कधीही चाळीसीचा आकडा पार न केलेल्या चिपळूणचे तापमान सोमवारी अचानक ४३पर्यंत वाढले. त्यामुळे रत्नागिरीकरांचा सोमवारी चांगलाच घाम निघाला.मार्च महिना सुरु झाला तरीही यावर्षी हवामानात गारवा होता. त्याचा परिणाम आंबा, काजू आदी पिकांवर झाला असला तरीही या सुखद गारव्यामुळे रत्नागिरीकर मात्र सुखावले होते. मात्र, सोमवारी अचानक तापमानात वाढ झाली. रत्नागिरीचे तापमान सोमवारी कमाल ३६, तर किमान २४ टक्के एवढे नोंदले गेले. त्याचबरोबर आर्द्रतेचे प्रमाणही ७८ टक्क्यांपर्यंत असल्याने रत्नागिरीकरांना उष्म्याचा सामना करावा लागला. सोमवारी वीज दिवसभर सुरु असतानाही अनेकजण हैराण झाले होते.जिल्ह्याच्या सर्वच भागात सोमवारी या हंगामातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले तर चिपळुणात सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणचे कमाल तापमान हे ४३, तर किमान तापमान हे २६ अंश सेल्सिअस एवढे होते.

मात्र, आर्द्रतेचे प्रमाण कमी म्हणजेच ३८ टक्के एवढे असल्याने चिपळूणकरांना जास्त त्रास जाणवला नाही तरीही या हंगामातील सर्वाधिक तापमान असल्याने त्याची झळ मात्र सोसावी लागलीच. जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीचे कमाल तापमान हे ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ एवढे होते. आर्द्रतेचे प्रमाण हे ५३ टक्के होते.आर्द्रता वाढली की...,आर्द्रता वाढली की, घामाचे प्रमाण वाढते. त्यामुळे तापमान जास्त असले, पण आर्द्रतेचे प्रमाण कमी असेल तर उष्णता जास्त असली तरीही घामाच्या धारा लागत नाहीत. सोमवारी रत्नागिरीत चिपळूणच्या मानाने तापमान कमी होते. मात्र, चिपळूणच्या मानाने आर्द्रतेचे प्रमाण जवळपास दुप्पट होते. त्यामुळे सोमवारी चिपळूणपेक्षा रत्नागिरीकरांना उष्णतेचा आणि घामाचा अधिक त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी