शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

चिपळुणवर सूर्य कोपला; पारा चक्क ४३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 14:15 IST

काल-परवापर्यंत हवेमध्ये असलेला गारवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाहीसा झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सूर्य कोपला. सोमवारी जिल्हाभरात या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणमध्ये तर सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान होते. यापूर्वी कधीही चाळीसीचा आकडा पार न केलेल्या चिपळूणचे तापमान सोमवारी अचानक ४३पर्यंत वाढले. त्यामुळे रत्नागिरीकरांचा सोमवारी चांगलाच घाम निघाला.

ठळक मुद्देचिपळुणवर सूर्य कोपला; पारा चक्क ४३ अंशावरजिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद; रत्नागिरी घामाने डबडबली

विहार तेंडुलकररत्नागिरी : काल-परवापर्यंत हवेमध्ये असलेला गारवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाहीसा झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यावर सूर्य कोपला. सोमवारी जिल्हाभरात या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणमध्ये तर सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमान होते. यापूर्वी कधीही चाळीसीचा आकडा पार न केलेल्या चिपळूणचे तापमान सोमवारी अचानक ४३पर्यंत वाढले. त्यामुळे रत्नागिरीकरांचा सोमवारी चांगलाच घाम निघाला.मार्च महिना सुरु झाला तरीही यावर्षी हवामानात गारवा होता. त्याचा परिणाम आंबा, काजू आदी पिकांवर झाला असला तरीही या सुखद गारव्यामुळे रत्नागिरीकर मात्र सुखावले होते. मात्र, सोमवारी अचानक तापमानात वाढ झाली. रत्नागिरीचे तापमान सोमवारी कमाल ३६, तर किमान २४ टक्के एवढे नोंदले गेले. त्याचबरोबर आर्द्रतेचे प्रमाणही ७८ टक्क्यांपर्यंत असल्याने रत्नागिरीकरांना उष्म्याचा सामना करावा लागला. सोमवारी वीज दिवसभर सुरु असतानाही अनेकजण हैराण झाले होते.जिल्ह्याच्या सर्वच भागात सोमवारी या हंगामातील सर्वाधिक तापमान नोंदले गेले तर चिपळुणात सोमवारी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चिपळूणचे कमाल तापमान हे ४३, तर किमान तापमान हे २६ अंश सेल्सिअस एवढे होते.

मात्र, आर्द्रतेचे प्रमाण कमी म्हणजेच ३८ टक्के एवढे असल्याने चिपळूणकरांना जास्त त्रास जाणवला नाही तरीही या हंगामातील सर्वाधिक तापमान असल्याने त्याची झळ मात्र सोसावी लागलीच. जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीचे कमाल तापमान हे ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ एवढे होते. आर्द्रतेचे प्रमाण हे ५३ टक्के होते.आर्द्रता वाढली की...,आर्द्रता वाढली की, घामाचे प्रमाण वाढते. त्यामुळे तापमान जास्त असले, पण आर्द्रतेचे प्रमाण कमी असेल तर उष्णता जास्त असली तरीही घामाच्या धारा लागत नाहीत. सोमवारी रत्नागिरीत चिपळूणच्या मानाने तापमान कमी होते. मात्र, चिपळूणच्या मानाने आर्द्रतेचे प्रमाण जवळपास दुप्पट होते. त्यामुळे सोमवारी चिपळूणपेक्षा रत्नागिरीकरांना उष्णतेचा आणि घामाचा अधिक त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :TemperatureतापमानRatnagiriरत्नागिरी