शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

...तर दरवर्षी महापुराचा फटका बसेल; चिपळूणकरांसाठी आता कायमचाच 'रेड अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 15:45 IST

जसे दिवस पुढे सरकतील, तसे प्रत्येकाला महापुराचाही विसर पडेल. त्यानंतर जे घडायचे तेच घडेल. उलट यापेक्षा अधिक भीषण अनुभव येईल.

- संदीप बांद्रे 

मागील दहा दशकांत इतका वाईट व भीषण अनुभव कधीही आला नसेल, तो चिपळूणकरांनी महापुराच्या निमित्ताने घेतला. निसर्गाला गृहीत धरून चाललो की त्याचे काय परिणाम होतात, याचे प्रत्यंतर आता प्रत्येकालाच आले असेल. मुळात चिपळूणकरांना पूर माहीत नाही, असे मुळीच नाही. उलट याच चिपळूणकरांनी कायम पूर ‘एन्जॉय’ केला आहे. एखाद्या वर्षी पूर आला नाही तर चिपळूणकर बेचैन होतात. ही अतिशयोक्ती नव्हे वस्तुस्थिती आहे. याच चिपळूणकरांनी २००५च्या महापुरातही एक वेगळे ‘स्पिरिट’ दाखवले होते. सारे काही संपूनही येथील व्यापारी व नागरिकांनी पुन्हा चिपळूण उभं करून दाखवलं होतं. 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा विचार करता, राजापूर, खेड व चिपळूण या तीन तालुक्यांमध्ये भीषण परिस्थिती कायम अनुभवायला मिळते. चिपळूणच्या बाबतीत विचार करायचे झाले तर येथील पूर परिस्थितीला प्रमुख तीन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस, कोयना वीज निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीला सोडण्यात येणारे अवजल आणि भरतीचे शहरात येणारे पाणी. याच तीन गोष्टींमुळे चिपळूण शहरात पूर येतो. आता यावर उपाय नाही, असे मुळीच नाही. उलट अनेक वर्षांच्या अनुभवानंतर चिपळूणकरांनी खूप काही धडे घेतले आहेत. परंतु, त्या-त्या गोष्टींची अंमलबजावणी होत नसल्याने आजपर्यंत त्याचा फटका बसत आला आहे.

महापुराचे प्रमुख कारण म्हणजे वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ आहे. पूर्वी चिपळूण बाजारपेठ दळणवळणासाठी महत्त्वाची मानली जायची. कोकणात मध्यवर्ती भागात हे शहर वसले असल्याने याच शहरातून समुद्रमार्गे आलेल्या मालाची वाहतूक पश्चिम महाराष्ट्रात होत असे. त्याकाळी गोवळकोट बंदर ते थेट विजापूर बाजारपेठ रस्ता अस्तित्त्वात होता. मात्र, आज त्याच रस्त्यावरील पेठमाप-मुरादपूर पूल गाळात रुतला आहे. त्या पुलाचे अस्तित्वच राहिलेले नाही. याचाच अर्थ वाशिष्ठी नदीतील गाळाची पातळी भरमसाठ वाढली आहे. किमान दहा ते बारा फूट गाळ साचला असून, तो काढण्याची गरज आहे. त्यासाठी दरवर्षी गाळ काढण्याची मोहीम राबविली जाते. परंतु, हा गाळ किनाऱ्यावरच टाकल्याने त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. 

तसेच शहरातील बांधकामांच्या बाबतीतही काही नियम पाळायला हवेत. प्रत्येक भागात उंच भराव करून बांधकामे केली जात असल्याने त्याचाही फटका बसत आहे. दरवेळी अतिवृष्टी व ढगफुटीवेळी ‘रेड अलर्ट’ दिला जातो. परंतु, तो रेड अलर्ट कोणीही गांभीर्याने घेत नाही. उलट अनेकजण बेसावध राहतात. यावेळीदेखील तेच घडले. २००५ मधील महापुराच्या वेळीदेखील काही सुधारणा सुचविण्यात आल्या होत्या. पण २०२१ उजाडला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यावेळीच एक पूररेषा निश्चित केली होती. जेव्हा सर्वसामान्य नागरिक एखादे बांधकाम करायला जातात, तेव्हा याच पूररेषेच्या आधारे नियमावर बोट ठेवले जाते. परंतु, बडे लोक जेव्हा याच शहरात भरावाच्या आधारे एखादे बांधकाम करतात, त्यावेळी कोणतीही पूररेषा आडवी येत नाही. त्याचेच परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यावेळी शहरातील शंकरवाडी येथे वाहून गेलेल्या नलावडे बंधारा येथे संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला होता. बांधकामासाठी उंच भराव करता येणार नाही, असेही ठरले होते. परंतु, पंधरा वर्षांत यासारख्या अनेक निर्णयांची अंमलबजावणी झालेली नाही. 

आता महापूर ओसरल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टींची री ओढली जात आहे. परंतु, जसे दिवस पुढे सरकतील, तसे प्रत्येकाला महापुराचाही विसर पडेल. त्यानंतर जे घडायचे तेच घडेल. उलट यापेक्षा अधिक भीषण अनुभव येईल. आताच्या महापुराने तर आतापर्यंतची सर्वाधिक ७.५० मीटरपर्यंत उंची गाठली. त्याला केवळ शहरातील नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील. कारण शहरात भराव करून बांधकामे करणाऱ्या व्यक्तींवर आजही निर्बंध नाहीत. पावसाचा अतिरेक झाला व महापूर आला म्हणून ‘रेड अलर्ट’ लागू करण्यापेक्षा नियम मोडणाऱ्या प्रत्येकासाठीच कायमचा ‘रेड अलर्ट’ लागू करायला हवा. विशेषतः लोकप्रतिनिधी व प्रशासनाने त्याची जबाबदारी घ्यायला हवी, तरच भविष्यात चिपळूण शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन सुरक्षित राहू शकते. अन्यथा दरवर्षी महापुराचा फटका बसत राहिल्यास बाजारपेठेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, याची प्रत्येकानेच जाणीव ठेवायला हवी.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढा