शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

घंटानाद करत चिपळूण बचाव समितीचा हल्लाबाेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

चिपळूण : घंटा बजाव....चिपळूण बचाव...पूर संकटाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा...अशा जोरदार घोषणा देत व घंटानाद करत चिपळूण बचाव ...

चिपळूण : घंटा बजाव....चिपळूण बचाव...पूर संकटाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा...अशा जोरदार घोषणा देत व घंटानाद करत चिपळूण बचाव समितीने शुक्रवारी चिपळूण नगर परिषद व पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली. चिपळूणला आलेल्या महापुराला कारणीभूत कोण, त्याची कारणे कोणती, भविष्यात असे संकट येणार नाही त्याबाबत काय उपाययोजना आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करत चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.

चिपळूण शहरातील पूररेषा आणि त्यामुळे शहर विकासावर होणारे अनिष्ट परिणामामुळे वातावरण ढवळून निघाले. मात्र, चिपळुणात आलेल्या महापुराबाबत अद्याप कोणतीच कारणे पुढे येत नसल्याने चिपळूण येथील व्यापारी व नागरिकांनी भविष्यातील धोका ओळखून चिपळूण बचाव समितीची स्थापन करत थेट संबंधित प्राधिकरणाला जाब विचरण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक वर्षी जर अशाच पद्धतीने पुराचे पाणी घुसत राहिले, तर चिपळूण शहरात वास्तव्य करणे कठीण होणार आहे. त्यामुळे आतापासून चिपळूण बचाव ही चळवळ उभी करण्याचा व शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न या समितीकडून केला जाणार आहे.

शुक्रवारी सकाळी शिरीष काटकर, किशोर रेडीज, अरुण भोजने, उदय ओतरी, समीर जानवळकर, शहनवाज शहा, राम रेडीज, सतीश कदम, महेंद्र कासेकर, गुलमहमंद शहा असे व्यापारी व नागरिक एकत्र आले. त्यांनी थेट चिपळूण नगर परिषद कार्यालयावर प्रथम धडक देत घंटानाद केला. येथील मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची भेट घेत पुराची माहिती नगर परिषदेला होती का, माहिती असूनही नागरिकांना सतर्क का केले नाही, कोणत्या धरणामधून पाणी सोडले गेले, त्यावेळी चिपळूणमध्ये किती मिलीमीटर पाऊस पडला, यापुढे अशी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नगर परिषदेची तयारी काय, कोणत्या उपाययोजना करण्यात आले आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित करत चिपळूण बचाव समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना सादर केले.

त्यानंतर समिती पदाधिकाऱ्यांनी थेट पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली. याठिकाणीही घंटानाद करण्यात आला. येथील अधिकाऱ्यांना तर अक्षरशः धारेवर धरण्यात आले होते. चिपळुणात आलेला महापूर हा मानव निर्मित असल्याचा थेट आरोप उपस्थितांनी केला. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न करत यामध्ये दोषी असणाऱ्यांची नावे समोर आणा. त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत पाठलाग सोडणार नाही, असा इशारादेखील यावेळी देण्यात आला. तसेच भविष्यात अशा पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती उपाययोजना तयार आहे. त्याची माहिती द्यावी, अशी मागणी चिपळूण बचाव समितीने यावेळी करून निवेदन सादर केले.