शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
8
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
11
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
12
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
13
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
15
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
16
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
17
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
20
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश

चिपळूण, खेडची पावसाची सरासरी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड / हर्षल शिरोडकर : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड / हर्षल शिरोडकर : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ३६६.६८ मिलिमीटर जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे. परंतु, यावर्षी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या चिपळूण व खेडमध्ये मात्र गेल्यावर्षीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे मिळालेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत मात्र गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये श्रावण सरी कोसळत असून, ऊन आणि पावसाचा खेळ अनुभवायला मिळत आहे. जुलै महिन्यातील पावसाच्या धुवाॅंधार विक्रमी नोंदीनंतर आता गणेशोत्सवाचे वेध लावणारे आल्हाददायी वातावरण निर्माण झाले आहे. दि. २१ व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात हाहाकार उडाला होता. इतिहासाच्या पानातील पर्जन्यमानाच्या नोंदी पाऊस मोडणार, असे अंदाज अनेक तज्ञांनी मांडले होते. रायगडमधील महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे पूर व दरडी कोसळून अनेकांचे जीव गेले तर कोट्यवधी रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसानदेखील झाले आहे. परंतु, हाहाकार उडवणाऱ्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या खेड व चिपळूण तालुक्यांना बसला त्या तालुक्यांत गतवर्षीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

दि. २२ ऑगस्ट २०२० रोजी खेडमध्ये ४,०७४ मिलिमीटर तर चिपळूणमध्ये ३४०१.९२ एवढी पावसाची एकूण नोंद झाली होती. परंतु, यावर्षी दि. १ जून ते दि. २२ ऑगस्ट २०२१ या कालावधीत खेडमध्ये ३३६७.८० मिलिमीटर तर चिपळूणमध्ये २८७७.९० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत मात्र गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये मंडणगड - ३०२६.५०, दापोली - २५५९.८०, गुहागर - ३०२४.९०, संगमेश्वर - ३०८८.८०, रत्नागिरी - ३१७०.६०, लांजा - २९८४.९०, राजापूर - २७९२.९० असा एकूण पाऊस नोंदविण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने गेल्यावर्षीपेक्षा अधिक सरासरी गाठल्याने जिल्ह्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. खेडमधील नातूवाडी धरण ८६.५६ टक्के भरले असून, धरणात २३.५६९ द. ल. घ. मी. पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील गडनदी संगमेश्वर धरण - ८०.०८ टक्के, अर्जुना राजापूर धरण - १०० टक्के, मुचकुंदी लांजा धरण - १०० टक्के भरले आहे.

--