शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

चिपळूण, खेडची पावसाची सरासरी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड / हर्षल शिरोडकर : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड / हर्षल शिरोडकर : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ३६६.६८ मिलिमीटर जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे. परंतु, यावर्षी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या चिपळूण व खेडमध्ये मात्र गेल्यावर्षीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे मिळालेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत मात्र गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये श्रावण सरी कोसळत असून, ऊन आणि पावसाचा खेळ अनुभवायला मिळत आहे. जुलै महिन्यातील पावसाच्या धुवाॅंधार विक्रमी नोंदीनंतर आता गणेशोत्सवाचे वेध लावणारे आल्हाददायी वातावरण निर्माण झाले आहे. दि. २१ व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात हाहाकार उडाला होता. इतिहासाच्या पानातील पर्जन्यमानाच्या नोंदी पाऊस मोडणार, असे अंदाज अनेक तज्ञांनी मांडले होते. रायगडमधील महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे पूर व दरडी कोसळून अनेकांचे जीव गेले तर कोट्यवधी रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसानदेखील झाले आहे. परंतु, हाहाकार उडवणाऱ्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या खेड व चिपळूण तालुक्यांना बसला त्या तालुक्यांत गतवर्षीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

दि. २२ ऑगस्ट २०२० रोजी खेडमध्ये ४,०७४ मिलिमीटर तर चिपळूणमध्ये ३४०१.९२ एवढी पावसाची एकूण नोंद झाली होती. परंतु, यावर्षी दि. १ जून ते दि. २२ ऑगस्ट २०२१ या कालावधीत खेडमध्ये ३३६७.८० मिलिमीटर तर चिपळूणमध्ये २८७७.९० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत मात्र गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये मंडणगड - ३०२६.५०, दापोली - २५५९.८०, गुहागर - ३०२४.९०, संगमेश्वर - ३०८८.८०, रत्नागिरी - ३१७०.६०, लांजा - २९८४.९०, राजापूर - २७९२.९० असा एकूण पाऊस नोंदविण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने गेल्यावर्षीपेक्षा अधिक सरासरी गाठल्याने जिल्ह्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. खेडमधील नातूवाडी धरण ८६.५६ टक्के भरले असून, धरणात २३.५६९ द. ल. घ. मी. पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील गडनदी संगमेश्वर धरण - ८०.०८ टक्के, अर्जुना राजापूर धरण - १०० टक्के, मुचकुंदी लांजा धरण - १०० टक्के भरले आहे.

--