शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण, खेडची पावसाची सरासरी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड / हर्षल शिरोडकर : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड / हर्षल शिरोडकर : गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने विश्रांती घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ३६६.६८ मिलिमीटर जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे. परंतु, यावर्षी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवलेल्या चिपळूण व खेडमध्ये मात्र गेल्यावर्षीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे मिळालेल्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत मात्र गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये श्रावण सरी कोसळत असून, ऊन आणि पावसाचा खेळ अनुभवायला मिळत आहे. जुलै महिन्यातील पावसाच्या धुवाॅंधार विक्रमी नोंदीनंतर आता गणेशोत्सवाचे वेध लावणारे आल्हाददायी वातावरण निर्माण झाले आहे. दि. २१ व २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात हाहाकार उडाला होता. इतिहासाच्या पानातील पर्जन्यमानाच्या नोंदी पाऊस मोडणार, असे अंदाज अनेक तज्ञांनी मांडले होते. रायगडमधील महाड, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड व चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे पूर व दरडी कोसळून अनेकांचे जीव गेले तर कोट्यवधी रुपयांच्या खासगी व सरकारी मालमत्तेचे नुकसानदेखील झाले आहे. परंतु, हाहाकार उडवणाऱ्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या खेड व चिपळूण तालुक्यांना बसला त्या तालुक्यांत गतवर्षीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

दि. २२ ऑगस्ट २०२० रोजी खेडमध्ये ४,०७४ मिलिमीटर तर चिपळूणमध्ये ३४०१.९२ एवढी पावसाची एकूण नोंद झाली होती. परंतु, यावर्षी दि. १ जून ते दि. २२ ऑगस्ट २०२१ या कालावधीत खेडमध्ये ३३६७.८० मिलिमीटर तर चिपळूणमध्ये २८७७.९० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत मात्र गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये मंडणगड - ३०२६.५०, दापोली - २५५९.८०, गुहागर - ३०२४.९०, संगमेश्वर - ३०८८.८०, रत्नागिरी - ३१७०.६०, लांजा - २९८४.९०, राजापूर - २७९२.९० असा एकूण पाऊस नोंदविण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने गेल्यावर्षीपेक्षा अधिक सरासरी गाठल्याने जिल्ह्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. खेडमधील नातूवाडी धरण ८६.५६ टक्के भरले असून, धरणात २३.५६९ द. ल. घ. मी. पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील गडनदी संगमेश्वर धरण - ८०.०८ टक्के, अर्जुना राजापूर धरण - १०० टक्के, मुचकुंदी लांजा धरण - १०० टक्के भरले आहे.

--