शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण :विहिरींची साफसफाई

By admin | Updated: October 7, 2014 22:06 IST

तहान लागली की विहीर कशासाठी

चिपळूण : नगरपरिषद हद्दीत अंदाजे १५० सार्वजनिक व खासगी विहिरी आहेत. गेली अनेक वर्षे या विहिरींच्या पाण्याचा उपयोग होत नसल्याने या विहिरींकडे दुर्लक्ष झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन या विहिरींची साफसफाई करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. टेंडर प्रक्रियेद्वारे हे काम लवकरच होणार आहे. चिपळूण शहराची लोकसंख्या ५७ हजार आहे. शहर व परिसराला खेर्डी व गोवळकोट पंप हाऊस येथून नगर परिषद प्रशासनातर्फे पाणी पुरवठा केला जातो. सुधारित नळपाणी योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही. गेली ७ वर्षे या योजनेचे काम सुरु असून, यासाठी अंदाजे १५ कोटी रुपये खर्च झाला आहे. या योजनेचे काम करणारे ठेकेदार चंद्रकांत सुवार यांना कामाची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, सुधारित नळपाणी योजनेची प्रतीक्षा शहरवासीयांना करावी लागत आहे. पाणी हे जीवन आहे. दैनंदिन व्यवहारात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहर व परिसराला जुन्याच नळपाणी योजनेद्वारे पाणी पुरवठा होत आहे. प्रत्येक घरात व वाडीत नळ असल्याने जुन्या पारंपरिक विहिरींकडे सध्या दुर्लक्ष झाले आहे. नळाच्या पाण्यावरच शहरवासीयांना अवलंबून राहावे लागत आहे. पाणीपुरवठा करण्यात काही वेळा नगर परिषद प्रशासनाला व्यत्यय आल्यास या नैसर्गिक दुर्लक्षित पाण्याचा स्त्रोतांचा उपयोग होऊ शकतो. वाशिष्ठी नदीतील पाणी उपसा करुन पंपाद्वारे हे पाणी शहरवासीयांना पुरविले जाते. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसात नदीतील पाण्याच्या पातळीत घट होते. त्यामुळे काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. या अनुषंगाने संभाव्य पाणी टंचाईवर पर्याय म्हणून उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी शहर व परिसरातील सार्वजनिक व खासगी विहिरींची साफसफाई करण्याचा प्रस्ताव पुढे आणला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, टेंडर प्रक्रियाही झाली आहे. सध्या काही विहिरींना पाणी असून, स्वच्छता करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून, पाऊस गेल्यानंतर विहिरींची साफसफाई करुन या पडिक विहिरी पाण्यासाठी वापरात येणार आहेत. प्रत्यक्षात या कामाची कार्यवाही होईपर्यंत नागरिकांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, विहिरींची स्वच्छता झाल्यास एखाद्या वेळेस पाणी आले नाही तर विहिरीच्या पाण्यावर तहान भागवता येणे शक्य होणार आहे. (वार्ताहर)