शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

संगोपन निधी आठ महिने रखडला, रत्नागिरी जिल्ह्यातील १११७ बालके मूलभूत गरजांपासून वंचित

By शोभना कांबळे | Updated: November 6, 2023 18:46 IST

रत्नागिरी : बाल संगोपन योजनेचा निधी गेल्या आठ महिन्यांपासून शासनाकडून आलाच नसल्याने जिल्ह्यातील १११७ बालकांचे प्रस्ताव मंजूर होऊनही त्यांना ...

रत्नागिरी : बाल संगोपन योजनेचा निधी गेल्या आठ महिन्यांपासून शासनाकडून आलाच नसल्याने जिल्ह्यातील १११७ बालकांचे प्रस्ताव मंजूर होऊनही त्यांना निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. या बालकांच्या मूलभूत गरजा भागविणे अवघड झाले आहे.० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रित, बेघर व अन्य प्रकारे आपत्तीत असलेल्या (Crisis) मुलांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, यादृष्टीने राज्य सरकारकडून २००५ सालापासून बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. सध्या या योजनेखाली सुमारे १६४३ मुलांचे प्रस्ताव जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे आले आहेत.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे गृहभेटी देण्यासाठी व इतर संनियंत्रण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व परिविक्षा अधिकारी नसताना सुद्धा त्यांच्यामार्फत हजारो बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या विभागाकडून १११७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नामंजूर प्रकरणे सुमारे २०० आहेत तर ३२६ प्रकरणांची कार्यवाही सुरू आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या बालकांचे पालक काही कारणामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अनाथ, निराधार, बेघर व शारीरिक व्यंग किंवा दुर्धर आजार, इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान दिले जाते, जेणेकरून अशा मुलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. पूर्वी हे अनुदान ११०० रुपये होते. मे २०२३ पासून ते आता २२०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. मात्र, गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून शासनाकडून हे अनुदान आलेलेच नाही. त्यामुळे या मुलांच्या दैनंदिन गरजा भागविणे अडचणीचे झाले आहे.या मुलांना वाढीव अनुदानाचा लाभ मिळणे दूरच; पण त्यांना पूर्वीप्रमाणेच मासिक ११०० रुपये शासनाकडून गेल्या आठ महिन्यात मिळालेले नाहीत. वाढीव अनुदानाची शासनाकडून केवळ घोषणाच करण्यात आली आहे. शासनाचा बाल विभाग दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. संगोपन योजनेचा निधी फेब्रुवारी महिन्यापासून मिळालेला नाही. या मुलांचा तो हक्क आहे. तो त्यांना दर महिन्याला मिळायला हवा, अशी अपेक्षा सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

बाल संगोपन योजनेचा निधी बालकाला दर महिन्याला मिळायला हवा, जेणेकरून त्याच्या मूलभूत गरजा त्याला भागवता येतील. परंतु आठ महिने किंवा वर्षभर सुद्धा निधी मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन मूलभूत गरजा लाभार्थींनी वर्षानंतरच भागवाव्यात, अशी शासनाची अपेक्षा आहे का? मुलांच्या धोरणाबाबत शासन इतके उदासीन का, असा प्रश्न निर्माण होतो. बालविकास हा शासनाच्या दृष्टीने असाच दुर्लक्षित राहणार आहे का? - श्रद्धा कळंबटे, सामाजिक कार्यकर्ती, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी