शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

संगोपन निधी आठ महिने रखडला, रत्नागिरी जिल्ह्यातील १११७ बालके मूलभूत गरजांपासून वंचित

By शोभना कांबळे | Updated: November 6, 2023 18:46 IST

रत्नागिरी : बाल संगोपन योजनेचा निधी गेल्या आठ महिन्यांपासून शासनाकडून आलाच नसल्याने जिल्ह्यातील १११७ बालकांचे प्रस्ताव मंजूर होऊनही त्यांना ...

रत्नागिरी : बाल संगोपन योजनेचा निधी गेल्या आठ महिन्यांपासून शासनाकडून आलाच नसल्याने जिल्ह्यातील १११७ बालकांचे प्रस्ताव मंजूर होऊनही त्यांना निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. या बालकांच्या मूलभूत गरजा भागविणे अवघड झाले आहे.० ते १८ वयोगटातील अनाथ, निराश्रित, बेघर व अन्य प्रकारे आपत्तीत असलेल्या (Crisis) मुलांचे संस्थाबाह्य आणि कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे, यादृष्टीने राज्य सरकारकडून २००५ सालापासून बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. सध्या या योजनेखाली सुमारे १६४३ मुलांचे प्रस्ताव जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे आले आहेत.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे गृहभेटी देण्यासाठी व इतर संनियंत्रण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व परिविक्षा अधिकारी नसताना सुद्धा त्यांच्यामार्फत हजारो बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या विभागाकडून १११७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नामंजूर प्रकरणे सुमारे २०० आहेत तर ३२६ प्रकरणांची कार्यवाही सुरू आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या बालकांचे पालक काही कारणामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अनाथ, निराधार, बेघर व शारीरिक व्यंग किंवा दुर्धर आजार, इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान दिले जाते, जेणेकरून अशा मुलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. पूर्वी हे अनुदान ११०० रुपये होते. मे २०२३ पासून ते आता २२०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. मात्र, गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून शासनाकडून हे अनुदान आलेलेच नाही. त्यामुळे या मुलांच्या दैनंदिन गरजा भागविणे अडचणीचे झाले आहे.या मुलांना वाढीव अनुदानाचा लाभ मिळणे दूरच; पण त्यांना पूर्वीप्रमाणेच मासिक ११०० रुपये शासनाकडून गेल्या आठ महिन्यात मिळालेले नाहीत. वाढीव अनुदानाची शासनाकडून केवळ घोषणाच करण्यात आली आहे. शासनाचा बाल विभाग दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. संगोपन योजनेचा निधी फेब्रुवारी महिन्यापासून मिळालेला नाही. या मुलांचा तो हक्क आहे. तो त्यांना दर महिन्याला मिळायला हवा, अशी अपेक्षा सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

बाल संगोपन योजनेचा निधी बालकाला दर महिन्याला मिळायला हवा, जेणेकरून त्याच्या मूलभूत गरजा त्याला भागवता येतील. परंतु आठ महिने किंवा वर्षभर सुद्धा निधी मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन मूलभूत गरजा लाभार्थींनी वर्षानंतरच भागवाव्यात, अशी शासनाची अपेक्षा आहे का? मुलांच्या धोरणाबाबत शासन इतके उदासीन का, असा प्रश्न निर्माण होतो. बालविकास हा शासनाच्या दृष्टीने असाच दुर्लक्षित राहणार आहे का? - श्रद्धा कळंबटे, सामाजिक कार्यकर्ती, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी