शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

नाणार पुन्हा आणणार मुख्यमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:43 IST

राजापूर : शिवसेनेने युतीसाठी घातलेल्या अटीमुळे भाजपला रद्द कराव्या लागलेल्या रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणार येथेच आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र ...

राजापूर : शिवसेनेने युतीसाठी घातलेल्या अटीमुळे भाजपला रद्द कराव्या लागलेल्या रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणार येथेच आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राजापुरात दिले. प्रकल्पाला समर्थन करणाऱ्यांचा उत्साह पाहता नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. आज यावर काहीही भाष्य करता येणार नाही. मला पुन्हा बोलवा, असे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेप्रसंगी राजापूर येथे जाहीर केले.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार प्रकल्पावरूनच शिवसेना-भाजपमधील युती ताणली गेली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी केलेले हे विधान शिवसेनेला इशाराच मानला जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाजनादेश यात्रा राजापुरात आली. महामार्गावर एस. टी. आगारासमोरच त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. आम्हाला प्रकल्प हवा आहे, असा फलक घेतलेले असंख्य समर्थक तेथे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यांनी प्रकल्प हवा असल्याच्या घोषणा दिल्या. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘नाणार रिफायनरीसंदर्भात पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. रिफायनरीमुळे कोकणात १ लाख रोजगार उपलब्ध होतील. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असे घसा फोडून सांगत होतो. मात्र आता तुमचा उत्साह पाहून समाधान वाटतं,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा राजापूरात सुमारे दोन तास उशिराने पोहोचली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री विनोद तावडे,आमदार प्रसाद लाड, आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्याचे स्वागत करण्यासाठी भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत रत्नागिरी जिल्ह्याच्या वेशीवरुन म्हणजेच टाकेवाडी येथून बाईक रॅलीने करण्यात आले. राजापूर एस. टी. आगारासमोर मंडप घालण्यात आला होता, मात्र उशीर झाल्याने मुख्यमंत्र्यानी आपल्या रथावरुनच उपस्थितांशी संवाद साधला. महाजनादेश यात्रेनिमित्त मी आपले आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आमच्या भाजपा आघाडी सरकारने पाच वर्षात अनेक कामे केली आहेत त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी आलो आहे. तुमचे आशिर्वाद असेच कायम पाठीशी राहुदे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.काय म्हणाले मुख्यमंत्री...‘‘अगोदरपासूनच मी रिफायनरी नाणारला व्हावी म्हणून आग्रही होतो. ही ग्रीन रिफायनरी आहे. यातून कोकणातील तरुणांना एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे मी घसा फोडून सांगत होतो. त्यावेळी झालेला विरोध पाहून आम्हाला रिफायनरी रद्द करावी लागली होती . मात्र आता मी कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी नाणारला रिफायनरी होण्यासाठी चर्चा होऊ शकते. तुमचा हा उत्साह पाहून समाधान वाटते.’’