शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपुढे महागाईचे आव्हान

By admin | Updated: July 20, 2014 22:45 IST

मनुष्यबळाची चिंता : खते, बियाणे, अवजारे याबाबत अडचणी कायम...

समीर चांदोरकर - सापुचेतळेभारतीय अर्थव्यवस्था मुख्यत: शेतीवर अवलंबून आहे. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान उभे राहात आहे.काही ठिकाणी जमीन आहे तर पाणी नाही. काही ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टी आहेत, पण शेतीसाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्याच्याउलट मनुष्यबळ आहे. पण, ग्रामीण भागातील शेतकरी गरीब असल्याने त्याला शेतीसाठी लागणारे बियाणे, अवजारे, बैलजोडी विकत घेणे परवडत नाही. असे दृश्य जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे.आज बैलजोडी शेतीसाठी विकत घ्यायची झाल्यास किमान वीस हजार रुपये लागतात. जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यालाही वर्षाला दोन बैलासाठी वैरणीचा १० हजार रुपये खर्च होतो.शेतीसाठी लागणाऱ्या खताचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्यांच्या किमतीतही भरमसाठ वाढ झालेली आहे. त्यातच शेतजमिनीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर वाढल्याने शेतीतून मिळणारे उत्पन्नही पूर्वीच्या तुलनेने कमी व्हायला लागले आहे. त्याचा परिणाम शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर होत आहे.अनेक शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांना शेतीसाठी लागणारे खत, बी-बियाणे, बैल, अवजारे यांना लागणारा प्राथमिक खर्चही परवडणारा नसल्याचे समोर येत आहे. आज त्यांना शेती लावण्यासाठी त्यांना दुसऱ्या व्यक्तींवर त्यांच्या बैलजोडींवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यासाठी त्यांना एका जोतासाठी दिवसाकाठी ५०० रुपये मोजावे लागतात.वाघ्रट (ता. लांजा, लिंबूवाडी) येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र लोटणकर हे स्वत: शेतकरी आहेत. यावेळी त्यांनी आपल्या शेतात भाताची शेती केली आहे. ती दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून म्हणजेच त्यांनी दुसऱ्या व्यक्तीबरोबर ‘डालं’ केले आहे. म्हणजे दुसऱ्या व्यक्तींच्या बैलजोडीवर (जोतांवर) त्यांच्या घरातील व्यक्तींसह आपली शेती लावायची. त्यानंतर त्या व्यक्तीची शेती लावण्यासाठी त्याला मदत करायची, अशी हमी देऊन एकमेकांची शेती लावण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात रूढ आहे. त्याचप्रमाणे स्वत: बैलजोडी बाळगणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. शेतीशिवाय अन्य कोणत्याही कामासाठी बैलजोडीचा आजकाल वापर होत नसल्याने बैल बाळगणे परवडत नाही.चांदोर येथे आपली शेती वाट्याने म्हणजे शेती दुसऱ्या व्यक्तीने करायची. त्यांचा पाव टक्के हिस्सा जमीनधारकाला द्यायचा, अशा पद्धतीने दिल्या आहेत. शेतीत राबण्यासाठी मजुरांची कमतरता हे त्याचे मुख्य कारण आहे.शेतीसाठी लागणारे पाणी सहज उपलब्ध होत नाही. आजकालचा पाऊस लहरी झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीत इतर फळझाडांची लागवड केली आहे.चांदोरचे माजी पोलीसपाटील बाबल्या बनकर (७९) यांच्या म्हणण्यानुसार तरुण पिढी हिरीरीने शेतीमध्ये रमताना दिसत नाही.सध्या ग्रामीण भागात शेतजमीन ओस पडल्याचे चित्र आहे. त्याऐवजी १०० टक्के अनुदान योजनेतून फळझाडांची लागवड करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल दिसतो. मात्र, ही योजना यशस्वी करतानाच सापुचेतळे, चांदोर भागातील शेतकऱ्यांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत शंका व्यक्त केली आहे.