शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महावितरणपुढे ३७ कोटी ६० लाखांच्या वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

रत्नागिरी : वीज बिल वसुलीमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधींची थकबाकी असल्याने महावितरणपुढे वसुली करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ...

रत्नागिरी : वीज बिल वसुलीमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधींची थकबाकी असल्याने महावितरणपुढे वसुली करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ५१२ ग्राहकांकडे १८ मार्चपर्यंत ५२ कोटी ५४ लाख ९९ हजार रुपयांची थकबाकी होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ४१ हजार २०८ ग्राहकांनी १४ कोटी ९४ कोटी रुपयांचा भरणा केला असला तरी अद्याप ९१ हजार ३०४ ग्राहकांकडे ३७ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी अद्याप शिल्लक आहे.

कोरोनामुळे गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते, संसर्ग रोखण्यासाठी तीन महिन्यांनंतर एकत्रित वीज बिले पाठविण्यात आल्याने काही ग्राहकांनी वीज बिलेच भरली नाहीत. मार्चपासून थकबाकी शिल्लक असतानाच अन्य काही ग्राहकांचीही काही बिले थकीत राहिल्याने वर्षभरात थकबाकीच्या रकमेत कमालीची वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील ६९ हजार ५२३ घरगुती ग्राहकांनी वीज बिले न भरल्यामुळे १३ कोटी ४३ लाख ५४ हजार, वाणिज्यिकच्या ९ हजार २९२ ग्राहकांकडे ६ कोटी ८८ लाख, औद्योगिकच्या १६०४ ग्राहकांकडे ४ कोटी ५७ लाख ८ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. कृषीच्या ४७०९ ग्राहकांकडे ४६ लाख ८४ हजार, पथदीपचे १४२५ ग्राहकांकडे ८ कोटी ३० लाख २१ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या १११५ ग्राहकांकडे २ कोटी ६३ लाख २९ हजार रुपये शिल्लक आहेत. सार्वजनिक सेवेंतर्गत १९७९ ग्राहकांकडे १ कोटी २३ लाख ७९ हजार रुपये, इतर १६५७ ग्राहकांकडे ८५ लाख ८२ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे.

चिपळूण विभागातील १८ हजार ६७९ ग्राहकांकडे ४ कोटी २४ लाख ७९ हजार, वाणिज्यिकच्या २६८५ ग्राहकांकडे २ कोटी ६ लाख ९९ हजार, औद्योगिकच्या ३९३ ग्राहकांकडे एक कोटी १४ लाख १६ तसेच कृषी, पथदीप, सार्वजनिक सेवा, पाणीपुरवठा विभाग व इतर मिळून एकूण २४ हजार १२१ ग्राहकांकडे १० कोटी २३ लाख ९७ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

खेड विभागातील १९ हजार ३६ घरगुती ग्राहकांकडे ३ कोटी ४५ हजार, वाणिज्यिकच्या २११५ ग्राहकांकडे १ कोटी २६ लाख ३ हजार, औद्योगिकच्या ४०९ ग्राहकांकडे १ कोटी २२ लाख ९३ हजार तसेच अन्य सर्व ग्राहक मिळून एकत्रित २४ हजार १८१ ग्राहकांकडे ९ कोटी ४५ लाख २ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

रत्नागिरी विभागातील ३१ हजार ८०८ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी १८ लाख ३० हजार, वाणिज्यिकच्या ४४९२ ग्राहकांकडे २ कोटी ७६ लाख ८७ हजार, औद्योगिकच्या ८०२ ग्राहकांकडे २ कोटी १९ लाख ९८ हजार तसेच अन्य सर्व ग्राहकांची मिळून एकूण ४३ हजार ७ ग्राहकांकडे १७ कोटी ९१ लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी आहे. मार्चअखेरपर्यंत थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट असल्याने थकबाकी वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत असतानाही ग्राहकांकडून तितकासा प्रतिसाद लाभत नसल्याचे निदर्शनास येत आहे.