शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने एनडीआरएफच्या निकषात बदल करा : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST

दापोली : केंद्राने एनडीआरएफचे निकष बदलावे तरच इतर राज्यांना फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १ हजार कोटी ...

दापोली : केंद्राने एनडीआरएफचे निकष बदलावे तरच इतर राज्यांना फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु महाराष्ट्र किंवा इतर राज्यांनाही मदतीची गरज आहे. वेगवेगळे पॅकेज देण्यापेक्षा एनडीआरएफ मदतीचे निकष बदलावे, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी दापाेली येथे शनिवारी व्यक्त केले़

चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी खासदार सुनील तटकरे शनिवारी जिल्हा दाैऱ्यावर आले हाेत़े यावेळी त्यांनी दापाेलीतील पंचायत समितीच्या सभागृहात काेराेनाचा आढावा घेतला़ त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते़ सुनील तटकरे यांनी सांगितले की, निसर्ग चक्रीवादळात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ केंद्राची टीम राज्यामध्ये दौरा करून गेली़ परंतु केंद्राकडून म्हणावी तशी मदत मिळाली नाही़ चक्रीवादळात पुन्हा एकदा मच्छीमार, आंबा बागायतदार व कोकणी जनतेचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यामुळे केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे़ परंतु, केंद्र सरकार इतर राज्यांना मदत देण्यासाठी काय निकष लावत आहे हेच पाहणे गरजेचे आहे़ गुजरात राज्याला चक्रीवादळाचा थेट फटका बसल्यानंतर देशाचे पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर गेले़ या भागाची पाहणी करून त्यांनी गुजरात राज्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले़ त्यांना जरूर मदत मिळावी, परंतु इतर राज्यांनाही गुजरात सारखाच फटका बसला आहे़ त्यामुळे गुजरातच्या धर्तीवर इतर राज्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले़

दापोली पंचायत समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बांधकाम, आरोग्य विभाग, वन विभाग, कृषी विभाग या सर्वच विभागाच्या आढावा यातून जनतेला त्रास होणार नाही, असे काम करा़ गतिमान प्रशासन राबवा, लॉकडाऊन काळामध्येसुद्धा पेरणीचा हंगाम लक्षात घेऊन कृषी सेवा केंद्र दिवसभर सुरू असावीत, अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या़ तसेच तालुक्यासाठी पुन्हा एक शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करावे, अशा सूचना दिल्या़

दापाेली येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीवेळी पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे, माजी आमदार संजय कदम नगरसेवक खालीद रंखागे, किशोर देसाई, ऋषिकेश गुजर, माजी सभापती राजेश गुजर, ममता शिंदे, मुजीब रुमाणे, जयवंत जालगावकर, किशोर साळवी, चंद्रकांत बैकर, दीपक खळे, विजय मुंगसे उपस्थित होते़

------------------------

केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळात निकष बदलून मदत मिळणे गरजेचे होते़ परंतु, केंद्राने निकष बदलले नाहीत त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी तिप्पट मदत दिली होती़ यावेळेसही केंद्राकडून मदत मिळाली नाही तरीही राज्य सरकार काेकणातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही़ महाविकास आघाडी सरकार नक्कीच कोकणी जनतेला दिलासा देईल, असे सुनील तटकरे म्हणाले़