शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

केंद्राने एनडीआरएफच्या निकषात बदल करा : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST

दापोली : केंद्राने एनडीआरएफचे निकष बदलावे तरच इतर राज्यांना फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १ हजार कोटी ...

दापोली : केंद्राने एनडीआरएफचे निकष बदलावे तरच इतर राज्यांना फायदा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु महाराष्ट्र किंवा इतर राज्यांनाही मदतीची गरज आहे. वेगवेगळे पॅकेज देण्यापेक्षा एनडीआरएफ मदतीचे निकष बदलावे, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी दापाेली येथे शनिवारी व्यक्त केले़

चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी खासदार सुनील तटकरे शनिवारी जिल्हा दाैऱ्यावर आले हाेत़े यावेळी त्यांनी दापाेलीतील पंचायत समितीच्या सभागृहात काेराेनाचा आढावा घेतला़ त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते़ सुनील तटकरे यांनी सांगितले की, निसर्ग चक्रीवादळात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ केंद्राची टीम राज्यामध्ये दौरा करून गेली़ परंतु केंद्राकडून म्हणावी तशी मदत मिळाली नाही़ चक्रीवादळात पुन्हा एकदा मच्छीमार, आंबा बागायतदार व कोकणी जनतेचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यामुळे केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे़ परंतु, केंद्र सरकार इतर राज्यांना मदत देण्यासाठी काय निकष लावत आहे हेच पाहणे गरजेचे आहे़ गुजरात राज्याला चक्रीवादळाचा थेट फटका बसल्यानंतर देशाचे पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर गेले़ या भागाची पाहणी करून त्यांनी गुजरात राज्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले़ त्यांना जरूर मदत मिळावी, परंतु इतर राज्यांनाही गुजरात सारखाच फटका बसला आहे़ त्यामुळे गुजरातच्या धर्तीवर इतर राज्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले़

दापोली पंचायत समिती सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बांधकाम, आरोग्य विभाग, वन विभाग, कृषी विभाग या सर्वच विभागाच्या आढावा यातून जनतेला त्रास होणार नाही, असे काम करा़ गतिमान प्रशासन राबवा, लॉकडाऊन काळामध्येसुद्धा पेरणीचा हंगाम लक्षात घेऊन कृषी सेवा केंद्र दिवसभर सुरू असावीत, अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या़ तसेच तालुक्यासाठी पुन्हा एक शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करावे, अशा सूचना दिल्या़

दापाेली येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीवेळी पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे, माजी आमदार संजय कदम नगरसेवक खालीद रंखागे, किशोर देसाई, ऋषिकेश गुजर, माजी सभापती राजेश गुजर, ममता शिंदे, मुजीब रुमाणे, जयवंत जालगावकर, किशोर साळवी, चंद्रकांत बैकर, दीपक खळे, विजय मुंगसे उपस्थित होते़

------------------------

केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळात निकष बदलून मदत मिळणे गरजेचे होते़ परंतु, केंद्राने निकष बदलले नाहीत त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी तिप्पट मदत दिली होती़ यावेळेसही केंद्राकडून मदत मिळाली नाही तरीही राज्य सरकार काेकणातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही़ महाविकास आघाडी सरकार नक्कीच कोकणी जनतेला दिलासा देईल, असे सुनील तटकरे म्हणाले़