शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार तुम्हीच ठरवा : उद्धव ठाकरेंची सूचना

By admin | Updated: October 20, 2016 01:00 IST

‘मातोश्री’वरून होणार घोषणा : रत्नागिरीतील नगराध्यक्ष निवडीचा सस्पेन्स कायम

रत्नागिरी : रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपद उमेदवारीसाठी शिवसेनेतील तीन इच्छुकांशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी चर्चा केली. या तिघांनीच नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करावा, असे सांगत ठाकरे यांनी चेंडू इच्छुकांच्याच कोर्टात टाकला आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम असून, इच्छुक उमेदवारही चक्रावले आहेत. तीनही उमेदवार आग्रही असल्याने ‘मातोश्री’वरूनच २४ आॅक्टोबरपर्यंत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी घोषित झाली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास येत्या २४ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावेळी नगराध्यक्ष निवडणूक थेट पद्धतीने होणार आहे. उमेदवारीसाठी शिवसेनेत ‘कॉँटे की टक्कर’ आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी बुधवारी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिघा इच्छुकांना मुलाखतीसाठी बोलाविले होते. निमंत्रणानुसार उमेदवारीसाठी इच्छुक माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, नगरसेवक बंड्या साळवी व राहुल पंडित हे मंगळवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. बुधवारी दुपारी २.३० वाजल्यानंतर मातोश्री बंगल्यावर या तिघांशी ठाकरे यांनी चर्चा केली. ठाकरे यांनी तिघांचीही ओळख करून घेतली. कोणाला अंतिम उमेदवारी द्यावी, याचा निर्णय या तिघांनीच आपापसांत चर्चा करून घ्यावा, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे स्वतंत्र मुलाखतीविनाच या तीनही इच्छुकांना परत फिरावे लागले. या भेटीच्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत व राजन साळवी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी इच्छुकांच्या कोर्टात चेंडू टाकला असला तरी हे तिघेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तिघांमध्ये सहमतीने एक नाव निश्चित होणे कठीण आहे. त्यामुळे २४ आॅक्टोबरपर्यंत सेना उमेदवाराचे नाव ‘मातोश्री’वरूनच घोषित होण्याची शक्यता आहे. आता उमेदवार या तिघांमधूून निवडणार की अन्य कुणा चौथ्याचे नशीब पालटणार, अशी चर्चाही रंगली आहे. (प्रतिनिधी) चौकट उमेदवार घोषणा टाळण्यामागे डावपेच? रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी अन्य पक्षांच्या उमेदवारांची नावेही अद्याप अधिकृतपणे घोषित झालेली नाहीत. राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, तर भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या नावांची चर्चा आहे. प्रत्येक पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षातर्फे कोणत्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होते उमेदवारीसाठी इच्छुक माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, नगरसेवक बंड्या साळवी व राहुल पंडित हे मंगळवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. बुधवारी दुपारी २.३० वाजल्यानंतर मातोश्री बंगल्यावर या तिघांशी ठाकरे यांनी चर्चा केली. ठाकरे यांनी तिघांचीही ओळख करून घेतली. कोणाला अंतिम उमेदवारी द्यावी, याचा निर्णय या तिघांनीच आपापसांत चर्चा करून घ्यावा, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे स्वतंत्र मुलाखतीविनाच या तीनही इच्छुकांना परत फिरावे लागले. या भेटीच्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत व राजन साळवी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी इच्छुकांच्या कोर्टात चेंडू टाकला असला तरी हे तिघेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तिघांमध्ये सहमतीने एक नाव निश्चित होणे कठीण आहे. त्यामुळे २४ आॅक्टोबरपर्यंत सेना उमेदवाराचे नाव ‘मातोश्री’वरूनच घोषित होण्याची शक्यता आहे. आता उमेदवार या तिघांमधूून निवडणार की अन्य कुणा चौथ्याचे नशीब पालटणार, अशी चर्चाही रंगली आहे. (प्रतिनिधी)