शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

तिवंडेत नळजोडणी रद्द करा

By admin | Updated: August 12, 2015 23:11 IST

राष्ट्रवादीची मागणी : शहराबाहेर २४ तास पाणी ?

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन शहराच्या हद्दीबाहेरील बांधकाम विकासकाने उभारलेल्या ४१० सदनिकांना शीळ धरणाच्या जलवाहिनीवरून जोडणी देण्यात आली आहे. शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नसताना शहराबाहेर २४ तास पाणी देण्याचा हा निर्णयच चुकीचा व रत्नागिरी शहरवासीयांवर अन्याय करणारा आहे. ही जोडणी नियमबाह्य असून तातडीने रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे एका निवेदनाद्वारे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत तिवंडेवाडी या शहराच्या बाहेरील गावात असलेल्या खासगी विकासकाच्या ४१० सदनिका असलेल्या संकुलाला पाण्याची जोडणी देण्याच्या ठरावाला शिवसेनेने विरोध केला होता. तसे पत्रही नगराध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर इतिवृत्तात हा ठराव मंजूर असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे पुढील सभेत शिवसेनेने याला जोरदार आक्षेप घेत ठराव मंजूर करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र दिले होते. याबाबत योग्य भूमिका मांडता न आल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही ही जोडणी मान्य झाली. मात्र, ही जोडणी चुकीच्या पध्दतीने देण्यात आली आहे, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे वस्तुस्थिती मांडण्यात आली नाही. त्यामुळे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनीच पाहणी करून ही जोडणी रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. शहराला मुबलक पाणी मिळते, असे नगराध्यक्ष म्हणत असतील तर एमआयडीसीकडून पाणी का घ्यावे लागते. विकासकाला दिलेल्या या थेट जोडणीमुळे साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रात पाणी येण्याचा वेग कमी होणार आहे. तसेच ४१० कुटुंबांनाही थेट जोडणीमुळे अशुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.नगरपरिषदेने ही जोडणी रद्द केली नाही तर आपण शांत बसणार नाही. रत्नागिरीत या जोडणीविरोधात नागरिकांची स्वाक्षरी मोहीम सुरू केली जाईल. जनतेच्या स्वाक्षरीने जोडणीला विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाईल, असेही या नेत्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)