शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

तिवंडेत नळजोडणी रद्द करा

By admin | Updated: August 12, 2015 23:11 IST

राष्ट्रवादीची मागणी : शहराबाहेर २४ तास पाणी ?

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन शहराच्या हद्दीबाहेरील बांधकाम विकासकाने उभारलेल्या ४१० सदनिकांना शीळ धरणाच्या जलवाहिनीवरून जोडणी देण्यात आली आहे. शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नसताना शहराबाहेर २४ तास पाणी देण्याचा हा निर्णयच चुकीचा व रत्नागिरी शहरवासीयांवर अन्याय करणारा आहे. ही जोडणी नियमबाह्य असून तातडीने रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे एका निवेदनाद्वारे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. रत्नागिरी नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत तिवंडेवाडी या शहराच्या बाहेरील गावात असलेल्या खासगी विकासकाच्या ४१० सदनिका असलेल्या संकुलाला पाण्याची जोडणी देण्याच्या ठरावाला शिवसेनेने विरोध केला होता. तसे पत्रही नगराध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर इतिवृत्तात हा ठराव मंजूर असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे पुढील सभेत शिवसेनेने याला जोरदार आक्षेप घेत ठराव मंजूर करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र दिले होते. याबाबत योग्य भूमिका मांडता न आल्याने जिल्हा प्रशासनाकडूनही ही जोडणी मान्य झाली. मात्र, ही जोडणी चुकीच्या पध्दतीने देण्यात आली आहे, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे वस्तुस्थिती मांडण्यात आली नाही. त्यामुळे याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनीच पाहणी करून ही जोडणी रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. शहराला मुबलक पाणी मिळते, असे नगराध्यक्ष म्हणत असतील तर एमआयडीसीकडून पाणी का घ्यावे लागते. विकासकाला दिलेल्या या थेट जोडणीमुळे साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रात पाणी येण्याचा वेग कमी होणार आहे. तसेच ४१० कुटुंबांनाही थेट जोडणीमुळे अशुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.नगरपरिषदेने ही जोडणी रद्द केली नाही तर आपण शांत बसणार नाही. रत्नागिरीत या जोडणीविरोधात नागरिकांची स्वाक्षरी मोहीम सुरू केली जाईल. जनतेच्या स्वाक्षरीने जोडणीला विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाईल, असेही या नेत्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)