शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

दहा रुपयांत तुटलेली चप्पल तरी दुरुस्त करून मिळते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महागाई गगनाला भिडू लागली आहे. सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महागाई गगनाला भिडू लागली आहे. सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, या परिस्थितीतही तलाठ्याच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षाही अधिक काम करणाऱ्या कोतवाल या महसूल कर्मचाऱ्याला शासनाकडून चपलांसाठी केवळ दहा रुपये भत्ता दिला जात आहे. त्यामुळे दहा रुपयांत तुटलेली चप्पल तरी दुरुस्त होते का? असा प्रश्न केला जात आहे.

शासनाच्या महसूल विभागातील तलाठ्याइतकाच महत्त्वाचा असलेला पूर्ण वेळ काम करणारा गावकामगार म्हणजे कोेतवाल. तलाठ्यासोबत कामे करणाऱ्या या कामगाराला अल्प मानधनावर राबवून घेतले जात आहे. कोतवालांना चपलेसाठी केवळ १० रुपये भत्ते देऊन शासनाकडून क्रूर चेष्टा केली जात आहे.

...........................

२०११ पासून पदाेन्नती नाही

शासनाने सेवाज्येष्ठतेनुसार दरमहा मिळणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यानुसार हे मानधन १५ हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. कोतवालाला शिपाईपदी पदोन्नती देण्याचा हा निर्णय झाला असला तरी अजूनही त्याबाबत शासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे अनेक काेतवाल पदोन्नतीची प्रतीक्षा करीत आहे. जिल्ह्यातील अनेक कोतवाल वर्षानुवर्षे याच पदावर काम करीत आहेत. त्यांना २०११ पासून पदाेन्नती नाही.

.........................

कामांची यादी भली माेठी

- तलाठ्याच्या हाताखाली महसुलाचे काम करणे

- गावच्या दप्तराची वरिष्ठ कार्यालयात ने-आण करणे

- गावातील जन्म-मृत्यू, विवाह नोंदीची माहिती ग्रामसेवकाला देणे.

- महसूल वसुली करणे, नोटीस गावात फिरविणे.

- गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधी तसेच आपत्तीची माहिती पोलीस पाटलाकडे देणे.

...................................

पूर्णवेळ, तरीही वेतन कमी

कोतवालाची नियुक्ती तहसील यांच्याकडून केली जाते. प्रत्येक १००० लोकसंख्येमागे एका कोतवालाची नियुक्ती करण्याच्या सूचना असल्या तरी रत्नागिरी जिल्ह्यात १७ लाख लोकसंख्येसाठी केवळ २८७ कोतवाल कार्यरत आहेत. एकूण मंजूर असलेल्या ३९४ पदांपैकी अजूनही १०७ पदे रिक्त असल्याने आहे त्याच कोतवालांना लगतच्या गावांचाही भार सांभाळावा लागत आहे. पूर्णवेळ काम करूनही त्यांना पाच हजारांवर समाधान मानावे लागते.

.....................

अपुऱ्या मानधनात कसे भागणार?

सध्या महागाई वाढली आहे. तरीही गावात तलाठ्याच्या बरोबरीने पूर्ण वेळ काम करणाऱ्या कोतवालाला मात्र अल्प वेतनावर काम करावे लागत आहे. सध्या चपलेसाठी १२० ते १५० रुपये मोजावे लागतात. मात्र, शासनाकडून केवळ १० रुपये भत्ता दिला जात आहे. ही चेष्टा आहे.

- लक्ष्मण भिलारे, कोतवाल, खेड

कोतवालला तलाठ्याच्या बरोबरीने काम करावे लागते. मात्र, पूर्णवेळ काम करूनही त्याला अपुऱ्या वेतनावर समाधान मानावे लागत आहे. या महागाईच्या काळात एवढ्या कमी मानधनावर कोतवालांचे कसे भागणार?

- शेखर सावंत, कोतवाल, नाचणे, रत्नागिरी