शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

दहा रुपयांत तुटलेली चप्पल तरी दुरुस्त करून मिळते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : महागाई गगनाला भिडू लागली आहे. सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : महागाई गगनाला भिडू लागली आहे. सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र, या परिस्थितीतही तलाठ्याच्या बरोबरीने किंबहुना त्यापेक्षाही अधिक काम करणाऱ्या कोतवाल या महसूल कर्मचाऱ्याला शासनाकडून चपलांसाठी केवळ दहा रुपये भत्ता दिला जात आहे. त्यामुळे दहा रुपयांत तुटलेली चप्पल तरी दुरुस्त होते का? असा प्रश्न केला जात आहे.

शासनाच्या महसूल विभागातील तलाठ्याइतकाच महत्त्वाचा असलेला पूर्ण वेळ काम करणारा गावकामगार म्हणजे कोेतवाल. तलाठ्यासोबत कामे करणाऱ्या या कामगाराला अल्प मानधनावर राबवून घेतले जात आहे. कोतवालांना चपलेसाठी केवळ १० रुपये भत्ते देऊन शासनाकडून क्रूर चेष्टा केली जात आहे.

...........................

२०११ पासून पदाेन्नती नाही

शासनाने सेवाज्येष्ठतेनुसार दरमहा मिळणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यानुसार हे मानधन १५ हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. कोतवालाला शिपाईपदी पदोन्नती देण्याचा हा निर्णय झाला असला तरी अजूनही त्याबाबत शासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे अनेक काेतवाल पदोन्नतीची प्रतीक्षा करीत आहे. जिल्ह्यातील अनेक कोतवाल वर्षानुवर्षे याच पदावर काम करीत आहेत. त्यांना २०११ पासून पदाेन्नती नाही.

.........................

कामांची यादी भली माेठी

- तलाठ्याच्या हाताखाली महसुलाचे काम करणे

- गावच्या दप्तराची वरिष्ठ कार्यालयात ने-आण करणे

- गावातील जन्म-मृत्यू, विवाह नोंदीची माहिती ग्रामसेवकाला देणे.

- महसूल वसुली करणे, नोटीस गावात फिरविणे.

- गावात घडलेल्या गुन्ह्यासंबंधी तसेच आपत्तीची माहिती पोलीस पाटलाकडे देणे.

...................................

पूर्णवेळ, तरीही वेतन कमी

कोतवालाची नियुक्ती तहसील यांच्याकडून केली जाते. प्रत्येक १००० लोकसंख्येमागे एका कोतवालाची नियुक्ती करण्याच्या सूचना असल्या तरी रत्नागिरी जिल्ह्यात १७ लाख लोकसंख्येसाठी केवळ २८७ कोतवाल कार्यरत आहेत. एकूण मंजूर असलेल्या ३९४ पदांपैकी अजूनही १०७ पदे रिक्त असल्याने आहे त्याच कोतवालांना लगतच्या गावांचाही भार सांभाळावा लागत आहे. पूर्णवेळ काम करूनही त्यांना पाच हजारांवर समाधान मानावे लागते.

.....................

अपुऱ्या मानधनात कसे भागणार?

सध्या महागाई वाढली आहे. तरीही गावात तलाठ्याच्या बरोबरीने पूर्ण वेळ काम करणाऱ्या कोतवालाला मात्र अल्प वेतनावर काम करावे लागत आहे. सध्या चपलेसाठी १२० ते १५० रुपये मोजावे लागतात. मात्र, शासनाकडून केवळ १० रुपये भत्ता दिला जात आहे. ही चेष्टा आहे.

- लक्ष्मण भिलारे, कोतवाल, खेड

कोतवालला तलाठ्याच्या बरोबरीने काम करावे लागते. मात्र, पूर्णवेळ काम करूनही त्याला अपुऱ्या वेतनावर समाधान मानावे लागत आहे. या महागाईच्या काळात एवढ्या कमी मानधनावर कोतवालांचे कसे भागणार?

- शेखर सावंत, कोतवाल, नाचणे, रत्नागिरी