शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रत्नागिरी शहरातील बससेवा विस्कळीत

By admin | Updated: October 6, 2015 23:50 IST

६३ फेऱ्या रद्द : डबलड्युटी स्वीकारण्यास चालकांचा नकार

रत्नागिरी : बसच्या नुकसानीबद्दल चालकास आरोपपत्र दिल्याच्या निषेधार्थवाहकांनी डबलड्युटी करण्यास नकार दिल्यामुळे मंगळवारी रत्नागिरी शहरी बस वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे शहरी मार्गावरील ६३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका प्रवाशांना विशेषत: चांगलाच बसला. प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले.चालक डी. आर. शिंदे यांनी १८ आॅगस्ट रोजी ड्युटी संपवून एमएच २० बीएल ७४१ ही गाडी रत्नागिरी आगारात जमा केली. गाडी ताब्यात घेताना व जमा करताना सुरक्षारक्षक गाडी तपासून ताब्यात घेतात. सुरक्षारक्षकांनी गाडी ताब्यात घेतली असता गाडीत चढण्याच्या पायऱ्या व स्टॅड तुटलेला निदर्शनास आला. याबाबत जबाब प्रशासनाने मागितला असताना देण्यात आला नाही. प्रशासनाने महिनाभर वाट पाहूनही जबाब न दिल्यामुळे डी. आर. शिंदे यांना आरोपपत्र दिले.याबाबत चालक-वाहकांनी एकवटून आरोपपत्र चुकीचे असल्याचे सांगून डबलड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे दुपारी सव्वा वाजल्यापासून शहरी मार्गावरील गाड्या रद्द झाल्या. दिवसभरात एकूण ६३ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एस. टी. स्टँडवर ताटकळत उभे रहावे लागले.पहाटे ४.१५ पासून चालक-वाहकांची ड्युटी सुरू होते. शहरी मार्गावर ४८ गाड्या असून, दररोज ९६८ फेऱ्या धावत असतात. चालक-वाहक प्रत्येकी ११७ लागतात. मात्र प्रशासनाकडे चालक ११९ असून, वाहक मात्र १०२ आहेत. त्यामुळे १५ वाहकांची कमतरता भासते. सलग आठ तास चालक, वाहकांना ड्युटी करावी लागते. वाहक कमी असल्याने सकाळच्या सत्रात काम करणाऱ्यांना सायंकाळी डबलड्युटी करावी लागते. परंतु आरोपपत्र मागे घ्या अन्यथा दुहेरी ड्युटी न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने ६३ फेऱ्या जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसला. (प्रतिनिधी)शालेय मार्गावरील फेऱ्या रद्द काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय फेऱ्या सुरू केल्या आहेत. दुहेरी ड्युटीमुळे दुपारी १२.१०ची शिर्के हायस्कूल -मजगाव, दुपारी ४.२०ची मिस्त्री हायस्कूल- सोमेश्वर, सायंकाळी १७.४० वाजता पटवर्धन हायस्कूल टेंभ्येपूल, सायंकाळी १७.५५ ची वेधशाळा-सडामिऱ्या फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बसस्थानकात गर्दी केली होती. काही विद्यार्थी शेअर रिक्षाने घरी जाणे पसंत केले.बसस्थानकातच घासते बसरत्नागिरी शहरी बसस्थानकातून बाहेर पडताना पडलेला खड्डा व तेथून रस्त्यावर जाताना शेवटची पायरी व एसटी बसचा मागचा भाग घासला जातो. तीच परिस्थिती बसस्थानकात प्रवेश करताना आहे. त्यामुळे पायरी एका दिवसात घासून तुटणे शक्य नाही. दररोज घासून घासून ती सैल होऊन तुटली असल्याचे चालक, वाहकांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे. संबंधित खड्डे न बुजविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.