शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

रत्नागिरी शहरातील बससेवा विस्कळीत

By admin | Updated: October 6, 2015 23:50 IST

६३ फेऱ्या रद्द : डबलड्युटी स्वीकारण्यास चालकांचा नकार

रत्नागिरी : बसच्या नुकसानीबद्दल चालकास आरोपपत्र दिल्याच्या निषेधार्थवाहकांनी डबलड्युटी करण्यास नकार दिल्यामुळे मंगळवारी रत्नागिरी शहरी बस वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे शहरी मार्गावरील ६३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका प्रवाशांना विशेषत: चांगलाच बसला. प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले.चालक डी. आर. शिंदे यांनी १८ आॅगस्ट रोजी ड्युटी संपवून एमएच २० बीएल ७४१ ही गाडी रत्नागिरी आगारात जमा केली. गाडी ताब्यात घेताना व जमा करताना सुरक्षारक्षक गाडी तपासून ताब्यात घेतात. सुरक्षारक्षकांनी गाडी ताब्यात घेतली असता गाडीत चढण्याच्या पायऱ्या व स्टॅड तुटलेला निदर्शनास आला. याबाबत जबाब प्रशासनाने मागितला असताना देण्यात आला नाही. प्रशासनाने महिनाभर वाट पाहूनही जबाब न दिल्यामुळे डी. आर. शिंदे यांना आरोपपत्र दिले.याबाबत चालक-वाहकांनी एकवटून आरोपपत्र चुकीचे असल्याचे सांगून डबलड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे दुपारी सव्वा वाजल्यापासून शहरी मार्गावरील गाड्या रद्द झाल्या. दिवसभरात एकूण ६३ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एस. टी. स्टँडवर ताटकळत उभे रहावे लागले.पहाटे ४.१५ पासून चालक-वाहकांची ड्युटी सुरू होते. शहरी मार्गावर ४८ गाड्या असून, दररोज ९६८ फेऱ्या धावत असतात. चालक-वाहक प्रत्येकी ११७ लागतात. मात्र प्रशासनाकडे चालक ११९ असून, वाहक मात्र १०२ आहेत. त्यामुळे १५ वाहकांची कमतरता भासते. सलग आठ तास चालक, वाहकांना ड्युटी करावी लागते. वाहक कमी असल्याने सकाळच्या सत्रात काम करणाऱ्यांना सायंकाळी डबलड्युटी करावी लागते. परंतु आरोपपत्र मागे घ्या अन्यथा दुहेरी ड्युटी न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने ६३ फेऱ्या जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसला. (प्रतिनिधी)शालेय मार्गावरील फेऱ्या रद्द काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय फेऱ्या सुरू केल्या आहेत. दुहेरी ड्युटीमुळे दुपारी १२.१०ची शिर्के हायस्कूल -मजगाव, दुपारी ४.२०ची मिस्त्री हायस्कूल- सोमेश्वर, सायंकाळी १७.४० वाजता पटवर्धन हायस्कूल टेंभ्येपूल, सायंकाळी १७.५५ ची वेधशाळा-सडामिऱ्या फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बसस्थानकात गर्दी केली होती. काही विद्यार्थी शेअर रिक्षाने घरी जाणे पसंत केले.बसस्थानकातच घासते बसरत्नागिरी शहरी बसस्थानकातून बाहेर पडताना पडलेला खड्डा व तेथून रस्त्यावर जाताना शेवटची पायरी व एसटी बसचा मागचा भाग घासला जातो. तीच परिस्थिती बसस्थानकात प्रवेश करताना आहे. त्यामुळे पायरी एका दिवसात घासून तुटणे शक्य नाही. दररोज घासून घासून ती सैल होऊन तुटली असल्याचे चालक, वाहकांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे. संबंधित खड्डे न बुजविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.