शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रत्नागिरी शहरातील बससेवा विस्कळीत

By admin | Updated: October 6, 2015 23:50 IST

६३ फेऱ्या रद्द : डबलड्युटी स्वीकारण्यास चालकांचा नकार

रत्नागिरी : बसच्या नुकसानीबद्दल चालकास आरोपपत्र दिल्याच्या निषेधार्थवाहकांनी डबलड्युटी करण्यास नकार दिल्यामुळे मंगळवारी रत्नागिरी शहरी बस वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे शहरी मार्गावरील ६३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका प्रवाशांना विशेषत: चांगलाच बसला. प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले.चालक डी. आर. शिंदे यांनी १८ आॅगस्ट रोजी ड्युटी संपवून एमएच २० बीएल ७४१ ही गाडी रत्नागिरी आगारात जमा केली. गाडी ताब्यात घेताना व जमा करताना सुरक्षारक्षक गाडी तपासून ताब्यात घेतात. सुरक्षारक्षकांनी गाडी ताब्यात घेतली असता गाडीत चढण्याच्या पायऱ्या व स्टॅड तुटलेला निदर्शनास आला. याबाबत जबाब प्रशासनाने मागितला असताना देण्यात आला नाही. प्रशासनाने महिनाभर वाट पाहूनही जबाब न दिल्यामुळे डी. आर. शिंदे यांना आरोपपत्र दिले.याबाबत चालक-वाहकांनी एकवटून आरोपपत्र चुकीचे असल्याचे सांगून डबलड्युटी करण्यास नकार दिला. त्यामुळे दुपारी सव्वा वाजल्यापासून शहरी मार्गावरील गाड्या रद्द झाल्या. दिवसभरात एकूण ६३ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे अक्षरश: हाल झाले. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एस. टी. स्टँडवर ताटकळत उभे रहावे लागले.पहाटे ४.१५ पासून चालक-वाहकांची ड्युटी सुरू होते. शहरी मार्गावर ४८ गाड्या असून, दररोज ९६८ फेऱ्या धावत असतात. चालक-वाहक प्रत्येकी ११७ लागतात. मात्र प्रशासनाकडे चालक ११९ असून, वाहक मात्र १०२ आहेत. त्यामुळे १५ वाहकांची कमतरता भासते. सलग आठ तास चालक, वाहकांना ड्युटी करावी लागते. वाहक कमी असल्याने सकाळच्या सत्रात काम करणाऱ्यांना सायंकाळी डबलड्युटी करावी लागते. परंतु आरोपपत्र मागे घ्या अन्यथा दुहेरी ड्युटी न करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने ६३ फेऱ्या जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसला. (प्रतिनिधी)शालेय मार्गावरील फेऱ्या रद्द काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय फेऱ्या सुरू केल्या आहेत. दुहेरी ड्युटीमुळे दुपारी १२.१०ची शिर्के हायस्कूल -मजगाव, दुपारी ४.२०ची मिस्त्री हायस्कूल- सोमेश्वर, सायंकाळी १७.४० वाजता पटवर्धन हायस्कूल टेंभ्येपूल, सायंकाळी १७.५५ ची वेधशाळा-सडामिऱ्या फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बसस्थानकात गर्दी केली होती. काही विद्यार्थी शेअर रिक्षाने घरी जाणे पसंत केले.बसस्थानकातच घासते बसरत्नागिरी शहरी बसस्थानकातून बाहेर पडताना पडलेला खड्डा व तेथून रस्त्यावर जाताना शेवटची पायरी व एसटी बसचा मागचा भाग घासला जातो. तीच परिस्थिती बसस्थानकात प्रवेश करताना आहे. त्यामुळे पायरी एका दिवसात घासून तुटणे शक्य नाही. दररोज घासून घासून ती सैल होऊन तुटली असल्याचे चालक, वाहकांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे. संबंधित खड्डे न बुजविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.