शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

‘अनुसूचित’मधून बौध्दधर्मिय गायब

By admin | Updated: May 6, 2015 00:14 IST

जातनिहाय सर्व्हेक्षण : योजनांना मुकण्याची भीती

चिपळूण : जातनिहाय सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या यादीत सुमारे ४०० बौध्द धर्मियांना अनुसूचित जातीमधून वगळण्यात आले असून, त्यांचा इतर जातींमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती व योजनांपासून हा समाज वंचित राहण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. यासंदर्भात नव्याने सर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. चिपळूण नगर परिषद हद्दीतील बौध्द बांधवांचे जातनिहाय सर्व्हेक्षण करण्यात आले होते. यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी जातीचा उल्लेख करण्यात आलेला असतानाही त्यांचा अनुसूचित जातीऐवजी इतर जातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जातीमधून बौध्द धर्मात धर्मांतर करणाऱ्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्र शासनाने घटना (अनुसूचित जाती) आदेश (सुधारणा) कायदा ३ जून १९९० अन्वये १९५० मध्ये सुधारणा करुन अनुसूचित जातीसंबंधी घटना आदेश बौध्द धर्मियांनाही लागू करण्यात आल्याचे केंद्र शासनाने घोषित केले आहे. त्यानुसार अनुसूचित जातीची यादी हिंदू शीख आणि बौध्द धर्मियांना लागू झालेली आहे. मागासवर्गीयांना जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. दि. ६ जुलै १९६०च्या शासन निर्णयात बदल करुन शासनाने असे आदेश दिले आहेत की, अनुसूचित जातीमधून बौध्द धर्मात धर्मांतर करणाऱ्यांना ३ जून १९९० पासून राज्य तथा केंद्र शासनाच्या घटनात्मक तथा सर्व प्रकारच्या आरक्षण व सवलतींचा फायदा घेता येईल. त्याचप्रमाणे अस्पृश्यता निवारणार्थ असलेल्या योजनांचाही लाभ मिळण्यास पात्र असतील. ज्या व्यक्तीकडे नवबौध्द अथवा अनुसूचित जातीमधून बौध्द धर्मात धर्मांतरित असल्याचे प्रमाणपत्र आहे, अशा व्यक्तींना व त्यांच्या पाल्यांना त्या प्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. ज्या व्यक्तीकडे नवबौध्द असल्याचे प्रमाणपत्र आहे, त्या व्यक्ती अनुसूचित जातीच्या भविष्यकाळात सवलती मिळवण्यासाठी पात्र आहेत, असे समजण्यात यावे. अशा नवबौध्द धर्मिय व्यक्तींना केंद्र शासनाने विहीत केलेल्या नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, असे सहाय्यक सचिव महाराष्ट्र शासन म. ह. कांबळे यांनी कळविले आहे. मात्र, अनुसूचित जातीऐवजी बौध्द धर्मियांचा इतर जातीमध्ये समावेश करण्यात आला असल्याने या समाजातील समाजबांधवांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. (वार्ताहर)चिपळुणातील प्रकारअनुसूचित जातीच्या यादीतून बौध्द धर्मियांचा इतर जातींमध्ये समावेश करण्यात आल्याने विविध सेवा सुविधांपासून हा समाज वंचित राहणार आहे. हे सर्व्हेक्षण पुन्हा व्हावे. समाजाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. अन्यथा याविरुद्ध आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा चिपळूण शहर आरपीआयचे अध्यक्ष मंगेश जाधव यांनी दिला आहे.