शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अर्जुना नदीवरील पूल धाेकादायक, ३० गावांचा पाचलशी संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST

पाचल : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. ...

पाचल : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. प्रशासनाबरोबरच राज्यकर्ते व लोकप्रतिनिधीही या दुर्घटनेला तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे. पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्याने पूल वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. यामुळे सुमारे ३० गावांचा पाचल बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडली की, प्रशासन, लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकून त्याचे खापर नैसर्गिक आपत्ती म्हणून निसर्गावर टाकून मोकळे होतात. जबाबदारीतून पळ काढण्याचा हा प्रकार आहे. अर्जुना नदीचा पूल वाहून जाण्यास निसर्ग जबाबदार नसून प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी केलेल्या मानवनिर्मित चुका व या पुलाकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच हा पूल वाहून गेल्याचे अविनाश सौंदळकर यांनी सांगितले. सन २०१८मध्ये शासनातर्फे या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी मनसेतर्फे हे काम थांबविण्यात आले होते. पुलाची डागडुजी नको तर नव्याने पूल बांधण्याची मागणी मनसेने शासनाकडे केली होती. मात्र, आमच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आमच्या मागणीची दखल घेऊन हा पूल नव्याने बांधला असता तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे सौंदळकर यांनी सांगितले.

या भागातील ३० गावांना जोडणारा हा एकमेव पूल असल्याने या पुलाला पर्यायी पूल शासनाने बांधायला हवा होता. त्यामुळे शासनाच्या चुकीमुळे जनतेला हा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल सौंदळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाचल बाजारपेठेत जाण्यासाठी शासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली नाही तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सौंदळकर यांनी दिला आहे.