शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाण रद्द
2
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
5
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
6
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
7
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
8
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
9
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
10
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
11
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
12
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
13
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
14
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
15
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
16
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
17
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
18
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
20
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

अर्जुना नदीवरील पूल धाेकादायक, ३० गावांचा पाचलशी संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST

पाचल : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. ...

पाचल : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. प्रशासनाबरोबरच राज्यकर्ते व लोकप्रतिनिधीही या दुर्घटनेला तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे. पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्याने पूल वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. यामुळे सुमारे ३० गावांचा पाचल बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडली की, प्रशासन, लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकून त्याचे खापर नैसर्गिक आपत्ती म्हणून निसर्गावर टाकून मोकळे होतात. जबाबदारीतून पळ काढण्याचा हा प्रकार आहे. अर्जुना नदीचा पूल वाहून जाण्यास निसर्ग जबाबदार नसून प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी केलेल्या मानवनिर्मित चुका व या पुलाकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच हा पूल वाहून गेल्याचे अविनाश सौंदळकर यांनी सांगितले. सन २०१८मध्ये शासनातर्फे या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी मनसेतर्फे हे काम थांबविण्यात आले होते. पुलाची डागडुजी नको तर नव्याने पूल बांधण्याची मागणी मनसेने शासनाकडे केली होती. मात्र, आमच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आमच्या मागणीची दखल घेऊन हा पूल नव्याने बांधला असता तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे सौंदळकर यांनी सांगितले.

या भागातील ३० गावांना जोडणारा हा एकमेव पूल असल्याने या पुलाला पर्यायी पूल शासनाने बांधायला हवा होता. त्यामुळे शासनाच्या चुकीमुळे जनतेला हा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल सौंदळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाचल बाजारपेठेत जाण्यासाठी शासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली नाही तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सौंदळकर यांनी दिला आहे.