शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुना नदीवरील पूल धाेकादायक, ३० गावांचा पाचलशी संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST

पाचल : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. ...

पाचल : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेला आहे. प्रशासनाबरोबरच राज्यकर्ते व लोकप्रतिनिधीही या दुर्घटनेला तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केला आहे. पाचल - तळवडे गावांना जोडणाऱ्या अर्जुना नदीच्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्याने पूल वाहतुकीला बंद करण्यात आला आहे. यामुळे सुमारे ३० गावांचा पाचल बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटला आहे.

एखादी मोठी दुर्घटना घडली की, प्रशासन, लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी झटकून त्याचे खापर नैसर्गिक आपत्ती म्हणून निसर्गावर टाकून मोकळे होतात. जबाबदारीतून पळ काढण्याचा हा प्रकार आहे. अर्जुना नदीचा पूल वाहून जाण्यास निसर्ग जबाबदार नसून प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी केलेल्या मानवनिर्मित चुका व या पुलाकडे झालेले दुर्लक्ष यामुळेच हा पूल वाहून गेल्याचे अविनाश सौंदळकर यांनी सांगितले. सन २०१८मध्ये शासनातर्फे या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी मनसेतर्फे हे काम थांबविण्यात आले होते. पुलाची डागडुजी नको तर नव्याने पूल बांधण्याची मागणी मनसेने शासनाकडे केली होती. मात्र, आमच्या या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. आमच्या मागणीची दखल घेऊन हा पूल नव्याने बांधला असता तर ही दुर्घटना घडलीच नसती, असे सौंदळकर यांनी सांगितले.

या भागातील ३० गावांना जोडणारा हा एकमेव पूल असल्याने या पुलाला पर्यायी पूल शासनाने बांधायला हवा होता. त्यामुळे शासनाच्या चुकीमुळे जनतेला हा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याबद्दल सौंदळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाचल बाजारपेठेत जाण्यासाठी शासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली नाही तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सौंदळकर यांनी दिला आहे.