शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
3
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
4
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
5
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
6
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
7
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
8
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
9
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
10
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
11
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
12
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
13
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
14
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
15
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
16
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
17
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
18
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
20
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ

नारिंगी नदीने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: June 25, 2016 00:54 IST

पर्यावरण मंत्र्यांचे आदेश : गाळासह झाडे-झुडपे तोडल्याने नदीचे पात्र झाले चकाचक

दस्तुरी : बारमाही वाहणारी अन् पुराच्या विळख्यात अडकणारी नारिंगी नदी ही समस्यांच्या गर्तेतच अडकली होती. नारिंगीचे नदीपात्र झुडपांच्या वेढ्यात अडकल्याने बकाल बनले होते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नदीतील गाळासह झुडपे तोडण्याचे आदेश देताच याची तत्काळ अंमलबजावणी झाल्याने बऱ्याच वर्षानंतर नारिंगी नदीने मोकळा श्वास घेतला आहे.अतिवृष्टीत दरवर्षी नारिंगी नदी उग्ररुप धारण करते. नारिंगीचे पाणी सभोवतालच्या शेतात घुसून भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तुफानी पर्जन्यवृष्टी झाल्यास नारिंगीचे पाणी कन्या शाळेनजीक घुसत असल्याने जनजीवन विस्कळीत होऊन खेड, दापोली, मंडणगड व खाडीपट्टा मार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. मात्र, नारिंगी नदी पुलाची उंची वाढविण्यात आल्याने पुराच्या पाण्यातून सुटका होण्यासह विस्कळीत होणाऱ्या वाहतुकीलाही कायमचाच पूर्णविराम मिळाला होता. पण पुन्हा ही समस्या उद्भवली.दोन वर्षापूर्वी जगबुडी नदीतील काढण्यात आलेल्या गाळामुळे खेडवासीयांची पुराच्या पाण्यातून सुटका झाली. जगबुडी नदीतील गाळ काढण्यात आल्यानंतर नदीने मोकळा श्वास घेतला. मात्र, हे करताना नदीपात्रातील झुडपे तोडण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. यामुळे नदीपात्राचा श्वास दिवसेंदिवस कोंडला जात आहे. नारिंगी नदीलाही झुडपांचा वेढा बसत असल्यामुळे नदी विद्रुप होत चालली होती. या नदीपात्रातील पाण्यावर परिसरातील शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. मात्र, सद्यस्थितीत नदीपात्रदेखील कोरडे पडल्याने त्यात झुडपांची भर पडत होती. या झुडपांमुळे नदीपात्रात पाणीसाठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. वर्षानुवर्षे नारिंगी नदीपात्रात उगवणारी झुडपे तोडण्यासाठी कोणीही पुढाकार न घेतल्यामुळे या झुडपांचा विस्तार वाढतच होता. बहिरवली फाट्यापासून कुंभारवाड्यापर्यंतच्या परिसरातील नदीपात्रात झुडपेच झुडपे दिसून येत होती.बारमाही वाहणारी ही नदी झुडपांमुळे दिवसेंदिवस बकाल होल चालली होती. ही बाब पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर गाळासह झुडपे तोडण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानंतर नदीपात्रातील गाळ उपसून झुडपेही तोडण्यात आल्याने नारिंगी नदीपात्र मोकळे झाले आहे. यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)नदीचे विस्तीर्ण पात्र : झुडपांमुळे विद्रुपखेड तालुक्यातील नारिंगी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. पावसाळ््यात या नदीला पूर येऊन वाहतूक विस्कळीत होते. नदीच्या पुराच्या पाण्यामुळे खेड, दापोली, मंडणगड व खाडीपट्टा मार्गावरील वाहतुकीला फटका बसतो. या नदीतील गाळ काढण्यात आल्याने पुराचा फटका काहीअंशी कमी बसला. मात्र, नदीत झाडेझुडपे वाढल्याने नदीचे पात्र विद्रुप झाले होते. नदीचे बकाल रूप झाल्याने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी नदीतील झाडे-झुडपे तोडण्याचे आदेश दिले होते.