शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:19 IST

लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत. त्यांचे वाटप जिल्हाधिकाºयांना करण्यात आले आहे.

अरुण आडिवरेकर । 

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत. त्यांचे वाटप जिल्हाधिकाºयांना करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीसाठी ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात १९५२ मतदान केंद्र आहेत. या केंद्रांवर १३ लाख ९५ हजार ५३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. हे साहित्य कोल्हापूर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद याठिकाणाहून प्राप्त होते. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या देण्यात आल्या आहेत. केंद्रनिहाय या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की, लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनली आहे.

मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत राज्यात सुमारे ३ लाख शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली होती. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून, सर्व जिल्हाधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंट्स कंपनीमार्फत बनवली जाते. ही शाई मतदानानंतरही बराच काळ बोटावर असते. सहसा ही शाई लवकर बोटावरून जात नाही.

तर्जनीवर शाई

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो.

...तर ठरू शकता अपात्र

मतदानापूर्वी पोलिंग ऑफिसर मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे का, याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र ठरू शकतात.  मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

 

केंद्रावर दोन बाटल्या

जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर कमीत कमी दोन शाईच्या बाटल्या देण्यात येतात. मात्र, मतदारांची संख्या जास्त असेल तर त्या मतदान केंद्रावर तीन शाईच्या बाटल्या देण्यात येतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक