शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:19 IST

लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत. त्यांचे वाटप जिल्हाधिकाºयांना करण्यात आले आहे.

अरुण आडिवरेकर । 

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत. त्यांचे वाटप जिल्हाधिकाºयांना करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीसाठी ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात १९५२ मतदान केंद्र आहेत. या केंद्रांवर १३ लाख ९५ हजार ५३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. हे साहित्य कोल्हापूर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद याठिकाणाहून प्राप्त होते. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या देण्यात आल्या आहेत. केंद्रनिहाय या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की, लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनली आहे.

मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत राज्यात सुमारे ३ लाख शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली होती. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून, सर्व जिल्हाधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंट्स कंपनीमार्फत बनवली जाते. ही शाई मतदानानंतरही बराच काळ बोटावर असते. सहसा ही शाई लवकर बोटावरून जात नाही.

तर्जनीवर शाई

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो.

...तर ठरू शकता अपात्र

मतदानापूर्वी पोलिंग ऑफिसर मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे का, याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र ठरू शकतात.  मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

 

केंद्रावर दोन बाटल्या

जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर कमीत कमी दोन शाईच्या बाटल्या देण्यात येतात. मात्र, मतदारांची संख्या जास्त असेल तर त्या मतदान केंद्रावर तीन शाईच्या बाटल्या देण्यात येतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक