शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:19 IST

लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत. त्यांचे वाटप जिल्हाधिकाºयांना करण्यात आले आहे.

अरुण आडिवरेकर । 

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत. त्यांचे वाटप जिल्हाधिकाºयांना करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीसाठी ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात १९५२ मतदान केंद्र आहेत. या केंद्रांवर १३ लाख ९५ हजार ५३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. हे साहित्य कोल्हापूर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद याठिकाणाहून प्राप्त होते. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या देण्यात आल्या आहेत. केंद्रनिहाय या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की, लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनली आहे.

मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत राज्यात सुमारे ३ लाख शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली होती. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून, सर्व जिल्हाधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंट्स कंपनीमार्फत बनवली जाते. ही शाई मतदानानंतरही बराच काळ बोटावर असते. सहसा ही शाई लवकर बोटावरून जात नाही.

तर्जनीवर शाई

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो.

...तर ठरू शकता अपात्र

मतदानापूर्वी पोलिंग ऑफिसर मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे का, याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र ठरू शकतात.  मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

 

केंद्रावर दोन बाटल्या

जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर कमीत कमी दोन शाईच्या बाटल्या देण्यात येतात. मात्र, मतदारांची संख्या जास्त असेल तर त्या मतदान केंद्रावर तीन शाईच्या बाटल्या देण्यात येतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक