शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बोअरवेलचे पाणी थांबता थांबेना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

असुर्डे : एका बाजूला तीव्र उष्म्यामुळे पाणीटंचाई होत चाललेली असताना चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे खोदलेल्या बोअरवेलमधून पाणी थांबता थांबत ...

असुर्डे : एका बाजूला तीव्र उष्म्यामुळे पाणीटंचाई होत चाललेली असताना चिपळूण तालुक्यातील कोकरे येथे खोदलेल्या बोअरवेलमधून पाणी थांबता थांबत नाही, असे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. जमिनीतून पाण्याचा मोठा फवारा येत असल्याने तो पाहण्यासाठी अनेक लोक गर्दी करू लागले आहेत.

हिंदू धर्म शास्त्रानुसार जलाची पूजा केली जाते. लाखो रुपये खर्च करूनही ते मिळत नाही. सध्याच्या दिवसात तर चांगले चांगले स्रोत आटून जातात. परंतु कोकरे येथील संजय व मनोज पर्शराम दळवी यांच्या बादी येथील शेत जमिनीने मात्र कमालच केली आहे. तेथे खोदलेल्या बोअरवेलच्या पाण्याचा ओघ काही केल्या थांबत नाही. या शेतजमिनीत झाडांची लागवड केली आहे. ती अतितीव्र उष्णतेमुळे सुकून जात होती. यासाठी या भावांनी बोअरवेल पाडण्याचा निर्णय घेतला. अखेर मंगळवारी रात्री २० फुटापर्यंत बुरूम माती, तर १५० फुटापर्यंत कातळ लागला.

त्यानंतर १७० फुटापर्यंत बोअरवेलचे खोदकाम करून ७ इंच पाईप टाकण्यात आला. परंतु रात्री ११ वाजल्यापासून अद्याप ७ इंच पाईप सातत्याने ओसंडून वाहात आहे.

हे पाणी बाहेर जाऊ नये. म्हणून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु सर्व उपाय व्यर्थ ठरले आहेत. हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी अनेकजण येत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात भूजल पातळी खाली जाते. परंतु इथे मात्र पाणी भरभरून वाहात आहे. जमिनीतील पाणी वर काढण्यासाठी लोकांना आटोकाट प्रयत्न करावे लागतात. परंतु इथे मात्र हा स्रोत आता थांबविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भूगर्भतज्ज्ञांनाही बोलावले जाणार आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे हे पाणी गरम आहे. त्यामुळे हे गंधकाचे पाणी आहे, असा अनेक जण दावा करीत आहेत. काही जणांनी पाण्याची चव घेतली असता सर्वसाधारण पिण्याच्या पाण्याची चव आहे.

बोअरवेलच्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की, जवळच असलेल्या नदीत हा प्रवाह जात असल्यामुळे सुकलेल्या

नदीत पाणीच पाणी दिसत आहे.

यामुळे भूगर्भातील जलाशयाची पातळी, आजूबाजूच्या पाण्याचे स्रोत यांचा अभ्यास करण्याची गरज आहे.