शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसेवादल पूरग्रस्त सेवापथकाने पुस्तकांना दिले पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

रत्नागिरी : महापुराने संपू्र्ण चिपळूण बाजारपेठच उद्ध्वस्त झाली आहे. पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरू आहे. अनेकांची अश्रू पुसण्यासाठी अनेक ...

रत्नागिरी : महापुराने संपू्र्ण चिपळूण बाजारपेठच उद्ध्वस्त झाली आहे. पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरू आहे. अनेकांची अश्रू पुसण्यासाठी अनेक जण मदतीचा हात देत आहेत. नागरिकांचे अश्रू पुसण्याचे काम करत असतानाच, राष्ट्रसेवादल सेवा पथकाने चिपळुणातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयातील पुस्तकांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम केले.

संगमश्वर तालुक्यातील मातृमंदिरच्या सहकार्याने पेठमाप येथील पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू किटचे वाटप केले.

गेल्या ४० वर्षांतील पूर पातळीच्या सीमा ओलांडत वासिष्ठीचा महाप्रलय चिपळूण आणि परिसर उद्ध्वस्त करून गेला. बाजारपेठ आणि खेर्डी, पेठमाप परिसरात १६-१७ फूट पाणी होते. या पूरग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी राष्ट्रसेवादलाचे सेवा पथक चिपळूण येथे दाखल झाले हाेते. २५ युवक-युवतींनी चिपळूण शहरातील अत्यंत पुरातन आणि अफाट ग्रंथसंग्रह असणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनगर वाचनालयांतील पुराने साचलेला चिखल, माती दूर केली. त्यातील चांगली असणारी पुस्तके वेगळी काढली. या पुरात अत्यंत दुर्मीळ पुस्तके, संग्रह, काही दुर्मीळ ग्रंथ उर्दू पुस्तके उद्ध्वस्त झाल्याचे आढळले. त्यातील शिल्लक पुस्तकांचे जतन करतानाच, हे वाचनालय पूर्वीप्रमाणेच समृद्ध करण्यासाठी सेवादल प्रयत्न करेल, असे राष्ट्रसेवा दलाचे अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितले.

या श्रमदान सेवादल पथकात किरण राठोड, आचल शर्मा, बबलू शर्मा, अजय कळंबटे, संकेत काटकर, तन्मय राऊत, संग्राम जाधव, ईशा फाटक, रेखा रांबाडे, यश कांबळे, गणेश राऊत, अंकिता चौगुले, प्रथमेश घवाळी, तुषार मांडवकर, प्रा.सुशील घवाळी, प्रा.ताराचंद ढोबळे, प्रा.प्रकाश पालांडे, प्रा.सचिन टेकाळे, अमेय मुळे, कौशिक शेट्ये, मातृमंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिर्के, सेवादल जिल्हाध्यक्ष रमाकांत सकपाळ, वाचनालय अध्यक्ष सुनील खेडेकर यांचा विशेष सहभाग होता. यावेळी पेठमाप येथील पूरग्रस्तांसाठी काही जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात आले.

-------------------------

राष्ट्रसेवा दलाचे संपर्क कार्यालय

चिपळुणात मदतीचे नियोजन शासन आणि प्रशासनाने नियंत्रित करणे गरजेचे आहे. राष्ट्रसेवादल माध्यमातून पुणे, मुंबई, सांगली, औरंगाबाद, रत्नागिरी येथून मदत येत आहे. त्याचे योग्य नियोजन व योग्य व्यक्तिपर्यंत ती पोहोचावी, यासाठी राष्ट्रसेवा दलाने चिपळूण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रांत कार्यालयाजवळ संपर्क कार्यालय सुरू केले आहे.

सध्या जीवनावश्यक वस्तू किट या सोबतच चादर, ब्लॅंकेट, सतरंजी, मेणबत्ती, सौरऊर्जा दिवे, फिनेल, कपडे, टाॅर्च असे गरजेचे आहे.

--------------------------

नागरिकांचे याेगदान हवे

नैसर्गिक आपत्तीत दुर्गम खेड्यातील आणि वस्तीतील उद्ध्वस्त कुटुंबांना सध्या परिस्थितीत किमान गरजा भागविण्यासाठी आधार राष्ट्रसेवा दलातर्फे देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी अनेकांना आर्थिक अथवा वस्तू रूपाने योगदान देण्याची इच्छा आहे. मातृमंदिर या सहयोगी संस्थेचे सहकार्य घेत आहोत. या कामी आपणही आपलं योगदान देऊ शकता, असे आवाहन मातृमंदिर आणि सेवादलाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभिजीत हेगशेट्ये यांनी केले आहे.