शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

थ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:19 IST

हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्यांचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत असून डाग असलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यासाठी किटकनाशक फवारणी करावी लागणार आहे. मात्र कीटकनाशकांचे रेसीड्यू आंब्यात उतरण्याची शक्यता असल्यामुळे पुर्नफवारणी करावी, का याबाबत शेतकरी बांधव संभ्रमात आहेत.

ठळक मुद्देथ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डागफवारणी झालेला हापूस न स्विकारण्याचा निर्णय

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्यांचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत असून डाग असलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यासाठी किटकनाशक फवारणी करावी लागणार आहे. मात्र कीटकनाशकांचे रेसीड्यू आंब्यात उतरण्याची शक्यता असल्यामुळे पुर्नफवारणी करावी, का याबाबत शेतकरी बांधव संभ्रमात आहेत.सध्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून दररोज २५ हजार पेट्या विक्रीला येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे. परंतु मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत. तुडतुडयाच्या विष्टेमुळे आंब्यावर काळे डाग पडत आहेत. तयार आंबा बाजारात पाठविताना काळे डाग असलेले फळ नाकारले जाते किंवा त्याला अत्यल्प दर दिला जातो.यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये सुरूवातीचा आंबा दाखल झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अल्प तर आहेच शिवाय दरही खालावलेले आहेत. १५०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.

थ्रीप्सचे संकट यावर्षी सुरूवातीपासून राहिले आहे. हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबत युरोपिय देशांपाठोपाठ आता यावर्षीपासून आखाती देशांनीही कडक भूमिका घेतली आहे. फळांमध्ये रासायनिक अंश सोडणाऱ्या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आल्यामुळे अशाप्रकारची फवारणी झालेला हापूस न स्विकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी केली तर आंब्यामध्ये कीटकनाशकांचे रेसीड्यू उतरण्याची शक्यता आहे. शिवाय रेसीड्यू फ्री कीटकनाशकांचा वापर केला तर त्याचा प्रभाव राहणार नाही. यामुळे नेमके काय करावे, यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन करून थ्रीप्स व तुडतुड्यासाठी कीटकनाशक निर्मिती करण्याची गरज आहे. सध्या ज्या झाडांवरील फळे काढणी योग्य आहे, तेथे फवारणी करण्याचे टाळत आहेत. वाढत्या तापमानामुळे वाळलेला मोहोर झाडून काळा आंबा पुसून बाजारात पाठवित आहेत. व्यापाऱ्यांनी देखील काळा डाग असलेल्या आंब्याचे दर पाडू नयेत. यावर्षी एकूणच पिक उत्पादन कमी असल्याने याबाबत काळजी घ्यावी.- राजन कदम, बागायतदार, शीळ-मजगाव.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी