शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

थ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:19 IST

हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्यांचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत असून डाग असलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यासाठी किटकनाशक फवारणी करावी लागणार आहे. मात्र कीटकनाशकांचे रेसीड्यू आंब्यात उतरण्याची शक्यता असल्यामुळे पुर्नफवारणी करावी, का याबाबत शेतकरी बांधव संभ्रमात आहेत.

ठळक मुद्देथ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डागफवारणी झालेला हापूस न स्विकारण्याचा निर्णय

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्यांचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत असून डाग असलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यासाठी किटकनाशक फवारणी करावी लागणार आहे. मात्र कीटकनाशकांचे रेसीड्यू आंब्यात उतरण्याची शक्यता असल्यामुळे पुर्नफवारणी करावी, का याबाबत शेतकरी बांधव संभ्रमात आहेत.सध्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून दररोज २५ हजार पेट्या विक्रीला येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे. परंतु मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत. तुडतुडयाच्या विष्टेमुळे आंब्यावर काळे डाग पडत आहेत. तयार आंबा बाजारात पाठविताना काळे डाग असलेले फळ नाकारले जाते किंवा त्याला अत्यल्प दर दिला जातो.यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये सुरूवातीचा आंबा दाखल झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अल्प तर आहेच शिवाय दरही खालावलेले आहेत. १५०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.

थ्रीप्सचे संकट यावर्षी सुरूवातीपासून राहिले आहे. हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबत युरोपिय देशांपाठोपाठ आता यावर्षीपासून आखाती देशांनीही कडक भूमिका घेतली आहे. फळांमध्ये रासायनिक अंश सोडणाऱ्या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आल्यामुळे अशाप्रकारची फवारणी झालेला हापूस न स्विकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी केली तर आंब्यामध्ये कीटकनाशकांचे रेसीड्यू उतरण्याची शक्यता आहे. शिवाय रेसीड्यू फ्री कीटकनाशकांचा वापर केला तर त्याचा प्रभाव राहणार नाही. यामुळे नेमके काय करावे, यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन करून थ्रीप्स व तुडतुड्यासाठी कीटकनाशक निर्मिती करण्याची गरज आहे. सध्या ज्या झाडांवरील फळे काढणी योग्य आहे, तेथे फवारणी करण्याचे टाळत आहेत. वाढत्या तापमानामुळे वाळलेला मोहोर झाडून काळा आंबा पुसून बाजारात पाठवित आहेत. व्यापाऱ्यांनी देखील काळा डाग असलेल्या आंब्याचे दर पाडू नयेत. यावर्षी एकूणच पिक उत्पादन कमी असल्याने याबाबत काळजी घ्यावी.- राजन कदम, बागायतदार, शीळ-मजगाव.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी