शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

थ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:19 IST

हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्यांचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत असून डाग असलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यासाठी किटकनाशक फवारणी करावी लागणार आहे. मात्र कीटकनाशकांचे रेसीड्यू आंब्यात उतरण्याची शक्यता असल्यामुळे पुर्नफवारणी करावी, का याबाबत शेतकरी बांधव संभ्रमात आहेत.

ठळक मुद्देथ्रीप्स, तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डागफवारणी झालेला हापूस न स्विकारण्याचा निर्णय

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुड्यांचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्यामुळे आंब्यावर काळे डाग पडत असून डाग असलेला आंबा बाजारात चालत नाही. त्यासाठी किटकनाशक फवारणी करावी लागणार आहे. मात्र कीटकनाशकांचे रेसीड्यू आंब्यात उतरण्याची शक्यता असल्यामुळे पुर्नफवारणी करावी, का याबाबत शेतकरी बांधव संभ्रमात आहेत.सध्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून दररोज २५ हजार पेट्या विक्रीला येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबा पेट्यांची संख्या अधिक आहे. परंतु मोहोरावर व फळांवर थ्रीप्सचा प्रादूर्भाव अद्याप असल्याने महागडी कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्याने बागायतदार त्रस्त झाले आहेत. तुडतुडयाच्या विष्टेमुळे आंब्यावर काळे डाग पडत आहेत. तयार आंबा बाजारात पाठविताना काळे डाग असलेले फळ नाकारले जाते किंवा त्याला अत्यल्प दर दिला जातो.यावर्षीच्या हंगामातील विविध संकटांचा सामना करीत वाशी मार्केटमध्ये सुरूवातीचा आंबा दाखल झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आंब्याचे प्रमाण अल्प तर आहेच शिवाय दरही खालावलेले आहेत. १५०० ते ३५०० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे.

थ्रीप्सचे संकट यावर्षी सुरूवातीपासून राहिले आहे. हापूसवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांबाबत युरोपिय देशांपाठोपाठ आता यावर्षीपासून आखाती देशांनीही कडक भूमिका घेतली आहे. फळांमध्ये रासायनिक अंश सोडणाऱ्या कीटकनाशकांवर बंदी घालण्यात आल्यामुळे अशाप्रकारची फवारणी झालेला हापूस न स्विकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी केली तर आंब्यामध्ये कीटकनाशकांचे रेसीड्यू उतरण्याची शक्यता आहे. शिवाय रेसीड्यू फ्री कीटकनाशकांचा वापर केला तर त्याचा प्रभाव राहणार नाही. यामुळे नेमके काय करावे, यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. 

कोकण कृषी विद्यापिठाने संशोधन करून थ्रीप्स व तुडतुड्यासाठी कीटकनाशक निर्मिती करण्याची गरज आहे. सध्या ज्या झाडांवरील फळे काढणी योग्य आहे, तेथे फवारणी करण्याचे टाळत आहेत. वाढत्या तापमानामुळे वाळलेला मोहोर झाडून काळा आंबा पुसून बाजारात पाठवित आहेत. व्यापाऱ्यांनी देखील काळा डाग असलेल्या आंब्याचे दर पाडू नयेत. यावर्षी एकूणच पिक उत्पादन कमी असल्याने याबाबत काळजी घ्यावी.- राजन कदम, बागायतदार, शीळ-मजगाव.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी