शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

अणसुरे येथील रेशन दुकानावर धान्याचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

राजापूर : तालुक्यातील अणसुरे येथील रेशन दुकानावरून कोरोनाच्या काळातही धान्याचा काळाबाजार होत असल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. या ...

राजापूर : तालुक्यातील अणसुरे येथील रेशन दुकानावरून कोरोनाच्या काळातही धान्याचा काळाबाजार होत असल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. या संदर्भात अणसुरे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य श्रुती नंदकुमार गोलतकर यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली असून, लाभार्थ्यांना धान्य वाटप न करता, परस्पर त्याचा काळाबाजार होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

अणसुरे रेशन दुकान विविध कार्यकारी सोसायटी, अणसुरे यांच्या माध्यमातून चालविले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी आपण आपले धान्य घेण्यासाठी या दुकानावर गेलो असता, आपल्यासह सुमारे ४४ कार्डधारकांचे तांदूळ शिल्लक नव्हते. मात्र, जवळपास चौदा-पंधरा पोती गहू मात्र शिल्लक दिसत होता. याबाबत आपण विचारणा केली असता, सध्या तांदूळ संपला आहे. महिनाअखेरपर्यंत सर्वांना दिला जाईल, असे सांगण्यात आले.

त्यांनी सांगितले की, आपण स्वतः काही वर्षे एका रेशन दुकानावर काम केले असल्यामुळे शासनाकडून आलेले धान्य कशाप्रकारे वितरित होते, याचा आपल्याला थोडासा अनुभव आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आलेले धान्य वितरित करताना गहू व तांदूळ दोन्ही संपणे आवश्यक होते. मात्र, केवळ तांदूळ संपल्याने आपण त्यांच्याकडे मागणी पत्राची मागणी केली. मात्र, त्यांनी ती द्यायला नकार दिला. मागील महिन्यातही आपल्याला अशाचप्रकारे केवळ गहू मिळाले होते. सुमारे ४४ रेशन कार्डधारकांना तांदूळ मिळाला नाही, याचा अर्थ आलेल्या धान्य साठ्यामधून केवळ तांदूळ काळ्या बाजाराने विकला तर गेला नाही ना, याची शहानिशा करावी, अशी मागणी आपण ग्रामपंचायतीकडे केल्याचे गोलतकर यांनी सांगितले.