शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अणसुरे येथील रेशन दुकानावर धान्याचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

राजापूर : तालुक्यातील अणसुरे येथील रेशन दुकानावरून कोरोनाच्या काळातही धान्याचा काळाबाजार होत असल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. या ...

राजापूर : तालुक्यातील अणसुरे येथील रेशन दुकानावरून कोरोनाच्या काळातही धान्याचा काळाबाजार होत असल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे. या संदर्भात अणसुरे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य श्रुती नंदकुमार गोलतकर यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली असून, लाभार्थ्यांना धान्य वाटप न करता, परस्पर त्याचा काळाबाजार होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

अणसुरे रेशन दुकान विविध कार्यकारी सोसायटी, अणसुरे यांच्या माध्यमातून चालविले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी आपण आपले धान्य घेण्यासाठी या दुकानावर गेलो असता, आपल्यासह सुमारे ४४ कार्डधारकांचे तांदूळ शिल्लक नव्हते. मात्र, जवळपास चौदा-पंधरा पोती गहू मात्र शिल्लक दिसत होता. याबाबत आपण विचारणा केली असता, सध्या तांदूळ संपला आहे. महिनाअखेरपर्यंत सर्वांना दिला जाईल, असे सांगण्यात आले.

त्यांनी सांगितले की, आपण स्वतः काही वर्षे एका रेशन दुकानावर काम केले असल्यामुळे शासनाकडून आलेले धान्य कशाप्रकारे वितरित होते, याचा आपल्याला थोडासा अनुभव आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आलेले धान्य वितरित करताना गहू व तांदूळ दोन्ही संपणे आवश्यक होते. मात्र, केवळ तांदूळ संपल्याने आपण त्यांच्याकडे मागणी पत्राची मागणी केली. मात्र, त्यांनी ती द्यायला नकार दिला. मागील महिन्यातही आपल्याला अशाचप्रकारे केवळ गहू मिळाले होते. सुमारे ४४ रेशन कार्डधारकांना तांदूळ मिळाला नाही, याचा अर्थ आलेल्या धान्य साठ्यामधून केवळ तांदूळ काळ्या बाजाराने विकला तर गेला नाही ना, याची शहानिशा करावी, अशी मागणी आपण ग्रामपंचायतीकडे केल्याचे गोलतकर यांनी सांगितले.