शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

रत्नागिरीत भाजपकडून नगराध्यक्षांची ‘घेराबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:10 IST

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत सत्तेवर असूनही शिवसेनेच्या विकासकामांची धावसंख्या शून्य आहे. भाजपने मंजूर केलेल्या कामांचे नारळ शिवसेना अजून किती काळ फोडणार, असा हल्लाबोल भाजप नगरसेवकांनी केला आहे. नगराध्यक्षांविरोधात भाजप करीत असलेल्या या राजकीय ‘घेराबंदी’ला सेनेतील असंतुष्टाच्या हातभारामुळे अधिकच बळकटी आल्याची चर्चा आहे. नगर परिषदेतील राजकारण वेगळ्या वळणावर असून, एकहाती सत्तेचे काय होणार, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेत सत्तेवर असूनही शिवसेनेच्या विकासकामांची धावसंख्या शून्य आहे. भाजपने मंजूर केलेल्या कामांचे नारळ शिवसेना अजून किती काळ फोडणार, असा हल्लाबोल भाजप नगरसेवकांनी केला आहे. नगराध्यक्षांविरोधात भाजप करीत असलेल्या या राजकीय ‘घेराबंदी’ला सेनेतील असंतुष्टाच्या हातभारामुळे अधिकच बळकटी आल्याची चर्चा आहे. नगर परिषदेतील राजकारण वेगळ्या वळणावर  असून, एकहाती सत्तेचे काय होणार, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

रत्नागिरी नगर परिषदेत सत्ताधारी शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्यातच आता विकासाच्या विविध मुद्द्यांवरून सेनेच्या कारभाºयांना घेरण्याचे तंत्र भारतीय जनता पक्षाने अवलंबले आहे. शून्य विकास, भाजपने मंजूर केलेली ५३ कोटींची नळपाणी योजना राबविण्यात सेनेकडून होणारा विलंब, मोकाट जनावरांची फसलेली मोहीम, कचºयाची समस्या सोडविण्यातील अपयश, दोनदा उद्घाटन झालेल्या विकासकामांचे पुन्हा नारळ फोडणे, विरोधी पक्ष नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांना निधी नाकारणे, मोकाट श्वानांची समस्या व निर्बिजीकरण यांसारख्या मुद्द्यांवरून सध्या भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष राहुल पंडित यांना भाजपसह अन्य विरोधकांनीही लक्ष्य केले आहे.  

भाजप नगरसेवकांनी केलेल्या या राजकीय घेराबंदीला नगर परिषदेत सत्तेवर असलेल्या काही असंतुष्टांच्या शुभेच्छा आहेत. राष्टÑवादी कॉँग्रेस व अपक्षांकडूनही सत्ताधारी सेनेला अडचणीत आणण्याच्या डावपेचांना वेग आला आहे.

या पार्श्वभूमीवर ‘सेनेतील असंतुष्टांसह मिळून सारेजण’ नगर परिषदेत काही राजकीय चमत्कार घडविणार की काय, याचीही चर्चा होत आहे. नगर परिषदेतील पक्षीय संख्याबळाचा हिशेब मांडला जात आहे.विरोधी नगरसेवकांची संख्या व त्यांनी केलेल्या नगराध्यक्षांच्या घेराबंदीला शुभेच्छा देणाºया सेनेतील असंतुष्टांची बेरीज किती, त्यातून काय होऊ शकते, यांसारख्या प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या रत्नागिरी नगर परिषदेत एकूण ३० नगरसेवकांपैकी शिवसेनेचे १७, भाजप ६, राष्टÑवादी कॉँग्रेस ५, अपक्ष २ असे संख्याबळ आहे.