शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत सेनेचा भाजपला दणका

By admin | Updated: December 26, 2014 23:48 IST

स्थायी समितीवरही बाजी : सर्व समित्यांवर शिवसेना-शहर विकास आघाडीचे वर्चस्व

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत अखेर शिवसेना-शहरविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला. शिवसेना व शहर विकास आघाडीकडे १७ सदस्यसंख्या असल्याने सर्व सहाही समित्यांची सभापतिपदे आपल्याकडे राखण्यात त्यांना यश आले. कमी सदस्यसंख्येमुळे भाजप व मित्रपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी अर्जही दाखल केले नाहीत. भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची पुरती कोंडी करण्याच्या डावपेचात आज तरी शिवसेना यशस्वी ठरली आहे.आज, शुक्रवारी झालेल्या या विषय समिती सभापती निवडणुकीत सेना-शहर विकास आघाडीच्या सदस्यांनीच दुपारी २ वाजेपर्यंत आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. मात्र, भाजप मित्रपक्षांकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. संख्याबळच ११ इतके कमी असल्याने सभापतिपद मिळविता येणार नाही हे स्पष्ट झाल्यानेच भाजपतर्फे अर्ज भरण्यात आले नाहीत. अर्ज भरण्याच्या २ वाजता या मुदतीपर्यंत केवळ सेना-आघाडीचेच अर्ज दाखल झाल्याने सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता व आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन व विकास, महिला व बाल कल्याण या समितींच्या सभापतिपदांची निवडणूक बिनविरोध झाली. (प्रतिनिधी)(विषय समिती निवडणूक वृत्त हॅलो पान ४ वर)कशी केली कोंडी.. जल्लोषराष्ट्रवादीचे चार नगरसेवक आपल्या बाजूला वळवून शिवसेनेने याआधीच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीवेळी भाजपवर कुरघोडी केली होती. त्याचवेळी विषय समित्यांवरही सेना-आघाडीच वर्चस्व राखणार असे चित्र होते. हे चित्र आज वास्तवात उतरले आहे. सर्व सभापती विजयी झाल्यानंतर सभागृहात सेना-आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ‘कशी केली कोंडी...’ असेच मनोमन म्हणत विजयाचा जल्लोष केला.थांबा अन् वाट पाहा : मयेकरसभागृहात भाजप व मित्रपक्षांच्या सदस्यांची संख्या ही ११ असल्यानेच आम्ही सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरले नाहीत, असे सांगताना सेनेकडून शहर विकासासाठी सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. मात्र, सभापतिपदांची निवडणूक ही काही अखेरची नाही. अजून बरेच काही बाकी आहे. थांबा अन् वाट पाहा, असे सांगत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आपल्याकडे अजूनही काही हुकुमाची पाने शिल्लक असल्याचे संकेतच दिले आहेत.अपात्रता सुनावणी महत्त्वाची ठरणारराष्ट्रवादीतील ४ नगरसेवकांनी फुटून निघत शहरविकास आघाडी तयार केली. त्यांच्याविरोधातील अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी येत्या ३१ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत या स्वतंत्र गटाची मान्यता सिध्द होणार असे सेना-आघाडीवाले ठामपणे सांगत आहेत, तर हा गट बेकायदा ठरेल, असे भाजपला वाटते आहे. त्यामुळे या सुनावणीनंतर काय निकाल लागतो यावरच पालिकेवर सेना-आघाडीचे वर्चस्व राहणार की भाजपचे, हे ठरणार आहे.