शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत सेनेचा भाजपला दणका

By admin | Updated: December 26, 2014 23:48 IST

स्थायी समितीवरही बाजी : सर्व समित्यांवर शिवसेना-शहर विकास आघाडीचे वर्चस्व

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत अखेर शिवसेना-शहरविकास आघाडीने भाजपला जोरदार दणका दिला. शिवसेना व शहर विकास आघाडीकडे १७ सदस्यसंख्या असल्याने सर्व सहाही समित्यांची सभापतिपदे आपल्याकडे राखण्यात त्यांना यश आले. कमी सदस्यसंख्येमुळे भाजप व मित्रपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी अर्जही दाखल केले नाहीत. भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची पुरती कोंडी करण्याच्या डावपेचात आज तरी शिवसेना यशस्वी ठरली आहे.आज, शुक्रवारी झालेल्या या विषय समिती सभापती निवडणुकीत सेना-शहर विकास आघाडीच्या सदस्यांनीच दुपारी २ वाजेपर्यंत आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. मात्र, भाजप मित्रपक्षांकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. संख्याबळच ११ इतके कमी असल्याने सभापतिपद मिळविता येणार नाही हे स्पष्ट झाल्यानेच भाजपतर्फे अर्ज भरण्यात आले नाहीत. अर्ज भरण्याच्या २ वाजता या मुदतीपर्यंत केवळ सेना-आघाडीचेच अर्ज दाखल झाल्याने सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, स्वच्छता व आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण, नियोजन व विकास, महिला व बाल कल्याण या समितींच्या सभापतिपदांची निवडणूक बिनविरोध झाली. (प्रतिनिधी)(विषय समिती निवडणूक वृत्त हॅलो पान ४ वर)कशी केली कोंडी.. जल्लोषराष्ट्रवादीचे चार नगरसेवक आपल्या बाजूला वळवून शिवसेनेने याआधीच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीवेळी भाजपवर कुरघोडी केली होती. त्याचवेळी विषय समित्यांवरही सेना-आघाडीच वर्चस्व राखणार असे चित्र होते. हे चित्र आज वास्तवात उतरले आहे. सर्व सभापती विजयी झाल्यानंतर सभागृहात सेना-आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ‘कशी केली कोंडी...’ असेच मनोमन म्हणत विजयाचा जल्लोष केला.थांबा अन् वाट पाहा : मयेकरसभागृहात भाजप व मित्रपक्षांच्या सदस्यांची संख्या ही ११ असल्यानेच आम्ही सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज भरले नाहीत, असे सांगताना सेनेकडून शहर विकासासाठी सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. मात्र, सभापतिपदांची निवडणूक ही काही अखेरची नाही. अजून बरेच काही बाकी आहे. थांबा अन् वाट पाहा, असे सांगत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी आपल्याकडे अजूनही काही हुकुमाची पाने शिल्लक असल्याचे संकेतच दिले आहेत.अपात्रता सुनावणी महत्त्वाची ठरणारराष्ट्रवादीतील ४ नगरसेवकांनी फुटून निघत शहरविकास आघाडी तयार केली. त्यांच्याविरोधातील अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी येत्या ३१ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत या स्वतंत्र गटाची मान्यता सिध्द होणार असे सेना-आघाडीवाले ठामपणे सांगत आहेत, तर हा गट बेकायदा ठरेल, असे भाजपला वाटते आहे. त्यामुळे या सुनावणीनंतर काय निकाल लागतो यावरच पालिकेवर सेना-आघाडीचे वर्चस्व राहणार की भाजपचे, हे ठरणार आहे.