शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

रत्नागिरीत होणार पक्षी, फुलपाखरू उद्यान

By admin | Updated: January 9, 2015 00:11 IST

जागांची पाहणी : पाच वर्षे विनामोबदला देखभालीचा ‘फुलोरा फाऊंडेशन’चा नगरपरिषदेला प्रस्ताव

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -शहरात साळवी स्टॉप येथे ‘पक्षी उद्यान’, सन्मित्रनगरमध्ये ‘फुलपाखरू उद्यान’ व भगवती किल्ला परिसरात ‘थीम पार्क’ उभारण्याबाबत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पुढाकार घेतला आहे. शहरात ही उद्याने विनामोबदला उभारून पुढील पाच वर्षे या उद्यानांची देखभाल करण्याची तयारी मुंबईस्थित ‘फुलोरा फाऊंडेशन’ या संस्थेने दाखविली आहे. याबाबत शहरातील काही जागांची पाहणीही करण्यात आली असून, संस्थेला प्रकल्प अहवाल सादर करण्यास नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात ही उद्याने उभारली जातील, अशी अपेक्षा व्यक्त आहे. शहरीकरणाचा वेग वाढल्याने वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली असून, त्यामुळे पक्षीजीवन धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या क्षेत्रात कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथे पक्षी उद्यानासाठी जागा निर्माण करावी, असा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. जलशुध्दिकरण प्रकल्पाच्य आवारातील ७ एकर जागेत सध्या ठिकठिकाणी शहरातील कचरा डंप केला जात आहे. त्यामुळे या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्न नगरपरिषदेपुढे निर्माण झाला आहे. जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्षी येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथे कचऱ्याचे सपाटीकरण करणे व त्यावर माती पसरून विशेष जागा तयार करणे शक्य आहे. त्याच जागेवर पक्षी उद्यान निर्माण करणे शक्य आहे. याबाबत फुलोरा संस्थेने गेल्याच आठवड्यात पाहणी केली असून, त्याचा प्रकल्प अहवाल येत्या काही दिवसात नगरपरिषदेला प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. पक्षी उद्यानाप्रमाणेच शहरातील सन्मित्रनगर येथील सध्या अस्तित्त्वात असलेले उद्यान फुलपाखरू उद्यान म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. फुलपाखरांच्या सौंदर्याविषयी आपल्या मनात नेहमीच कुतूहल असते. मात्र, फुलपाखरांना बागडता यावे, त्यांचे जतन व्हावे, त्यांनाही हक्काची जागा मिळावी व शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी हा या उद्यानामागील हेतू आहे. डोंबिवली येथेही असे फुलपाखरू उद्यान उभारण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षात रत्नागिरी शहरातही फुलपाखरू उद्यान उभारण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. त्यासाठी पूर्वतयारी सुरु झाली आहे. तसेच भगवती किल्ला येथे असलेल्या पालिकेच्या जागेत ‘थीम पार्क’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. याठिकाणी बगिचा, झाडे लावून हा पार्क तयार करण्याचा प्रस्ताव आहे. पावसाचे पाणी अडवून ते पाणी पार्कमधील झाडांसाठी वापरले जाणार आहे. शहराच्या सौंदर्यात त्यामुळे भर पडणार आहे. सर्पउद्यान उभाण्याचीही तयारीफुलोरा फाऊंडेशनतर्फे रत्नागिरीत पक्षी, फुलपाखरू ही उद्याने उभारण्याबाबत पूर्वतयारी सुरू असतानाच रत्नागिरीत सर्प उद्यानही उभारण्यासाठी फुलोरा संस्थेला जागा उपलब्ध करून देण्याची तयारी नगरपरिषदेने दाखविली आहे. त्यासाठी जागेची उपलब्धताही करून देण्यास पालिकेची तयारी आहे. मात्र त्यावर फुलोरा संस्थेकडून प्रतिसाद मिळणे बाकी आहे. ोलहान मुलांप्रमाणे या फुला-फुलांवरून बागडणाऱ्या फुलपाखरांना त्यांची स्वत:ची जागा उपलब्ध व्हावी म्हणून सन्मित्रनगर येथे ‘फुलपाखरू उद्यान’ उभारले जाणार आहे. साळवी स्टॉपजवळील जलशुध्दिकरण प्रकल्पाच्या आवारात विविध पक्षी दिसून येत असून, तेथे या पक्ष्यांसाठी खास पक्षी उद्यान उभारण्याचा रत्नागिरी नगरपरिषदेचा प्रस्ताव आहे. भगवती किल्ला येथील भगवती मंदिर प्रसिध्द असून, मंदिराच्या पायथ्यापासून काही अंतरावर थीम पार्क संकल्पनेतून फुलझाडे, झाडांची लागवड होणार आहे. रत्नागिरी शहराच्या परिसरातील काही भागांमध्ये सरपटणारे प्राणी अधिक असून, त्यासाठीच शहरात सर्प उद्यान उभारण्यास नगरपरिषद उत्सुक आहे.