शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याची चव चाखायला यंदा होणार उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 16:14 IST

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेला मोहर कुजल्याने १५ ते २० टक्के पीक वाया गेले आहे. ढगाळ हवामान व ...

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेला मोहर कुजल्याने १५ ते २० टक्के पीक वाया गेले आहे. ढगाळ हवामान व अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोहर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करावी लागत असल्याने आंबा उत्पादन खर्चिक बनले आहे.

ऑक्टोबर हीट आणि दिवाळीपूर्वी थंडी सुरू झाल्याने आंब्याला मोहर येण्याच्या प्रक्रियेने बागायतदार सुखावले हाेते. गेल्या दहा वर्षांत उत्पादनात झालेली घट भरून निघेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळीपासून टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसामुळे फुलोऱ्यात आलेला मोहर काळा पडून खराब झाला. मोहर कुजल्याने सुरुवातीचे १५ ते २० टक्के येणारे पीक वाया गेले. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने पालवी व मोहर अशी संमिश्र स्थिती सध्या आहे. नोव्हेंबर संपत आला तरी थंडी गायब असून, उकाडा वाढला आहे. शिवाय अधूनमधून पाऊस पडत असून, ढगाळ वातावरण राहत आहे. ढगाळ हवामानामुळे मोहरावर तुडतुडा, उंट अळी, शेंडे पोखरणारी अळी, तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

हवामानातील बदलाचा अंदाज घेत कीटकनाशक फवारणी करावी लागते. आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोहर वाचविण्यासाठी २५ ते ३० टक्के खर्च केला आहे. महागडी, चांगल्या दर्जाची कीटकनाशके फवारली असली तरी दमट हवामान व पावसामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला आहे. यापुढे पाऊस झाला नाही तर पीक उशिरा का होईना येईल. मात्र, थंडी पडण्याची आवश्यकता आहे. थंडीमुळे गतवर्षी ज्या झाडांना फळधारणा झालेली नाही व सध्या पालवी न येता कडक पाला आहे त्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.

हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा उत्पादनही खालावले आहे, शिवाय पीक दिवसेंदिवस खर्चिक बनले आहे. कीटकनाशकांच्या दरात होणारी वाढ, वाढते इंधन दर यामुळे वाढलेला वाहतूक खर्च, यांत्रिक अवजारांसाठीही इंधन वापरावे लागत असल्याने एकूण खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत दर उपलब्ध होत नाही. याबाबत योग्य उपाययोजना शासकीय स्तरावर होणे गरजेचे आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा