शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

आंब्याची चव चाखायला यंदा होणार उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 16:14 IST

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेला मोहर कुजल्याने १५ ते २० टक्के पीक वाया गेले आहे. ढगाळ हवामान व ...

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेला मोहर कुजल्याने १५ ते २० टक्के पीक वाया गेले आहे. ढगाळ हवामान व अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोहर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करावी लागत असल्याने आंबा उत्पादन खर्चिक बनले आहे.

ऑक्टोबर हीट आणि दिवाळीपूर्वी थंडी सुरू झाल्याने आंब्याला मोहर येण्याच्या प्रक्रियेने बागायतदार सुखावले हाेते. गेल्या दहा वर्षांत उत्पादनात झालेली घट भरून निघेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळीपासून टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसामुळे फुलोऱ्यात आलेला मोहर काळा पडून खराब झाला. मोहर कुजल्याने सुरुवातीचे १५ ते २० टक्के येणारे पीक वाया गेले. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने पालवी व मोहर अशी संमिश्र स्थिती सध्या आहे. नोव्हेंबर संपत आला तरी थंडी गायब असून, उकाडा वाढला आहे. शिवाय अधूनमधून पाऊस पडत असून, ढगाळ वातावरण राहत आहे. ढगाळ हवामानामुळे मोहरावर तुडतुडा, उंट अळी, शेंडे पोखरणारी अळी, तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

हवामानातील बदलाचा अंदाज घेत कीटकनाशक फवारणी करावी लागते. आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोहर वाचविण्यासाठी २५ ते ३० टक्के खर्च केला आहे. महागडी, चांगल्या दर्जाची कीटकनाशके फवारली असली तरी दमट हवामान व पावसामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला आहे. यापुढे पाऊस झाला नाही तर पीक उशिरा का होईना येईल. मात्र, थंडी पडण्याची आवश्यकता आहे. थंडीमुळे गतवर्षी ज्या झाडांना फळधारणा झालेली नाही व सध्या पालवी न येता कडक पाला आहे त्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.

हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा उत्पादनही खालावले आहे, शिवाय पीक दिवसेंदिवस खर्चिक बनले आहे. कीटकनाशकांच्या दरात होणारी वाढ, वाढते इंधन दर यामुळे वाढलेला वाहतूक खर्च, यांत्रिक अवजारांसाठीही इंधन वापरावे लागत असल्याने एकूण खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत दर उपलब्ध होत नाही. याबाबत योग्य उपाययोजना शासकीय स्तरावर होणे गरजेचे आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा